शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 18:34 IST

भाजपच्या आमदारांना बलात्कार, खून, दरोड्यांच्या प्रकरणात अटक केली जात आहे. यामुळे हे शिवशाहीचे नव्हे तर गुंडशाहीचे सरकार असल्याची खरमरीत टीका राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भाजपवर केली.

ठळक मुद्दे२०१४ मध्ये जनतेला लॉलीपॉप दाखवून सत्ता हस्तगत केली. मात्र, आता मोदी लाट ओसरली भाजपची उलटगिनती सुरू झाली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

औरंगाबाद : राज्यात सर्वत्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, भाजपच्या आमदारांना बलात्कार, खून, दरोड्यांच्या प्रकरणात अटक केली जात आहे. यामुळे हे शिवशाहीचे नव्हे तर गुंडशाहीचे सरकार असल्याची खरमरीत टीका राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भाजपवर केली. २०१४ मध्ये जनतेला लॉलीपॉप दाखवून सत्ता हस्तगत केली. मात्र, आता मोदी लाट ओसरली असून, भाजपची उलटगिनती सुरू झाली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील आठ आणि सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन अशा एकूण १२ लोकसभा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा औरंगाबादेतील सुभेदारी विश्रामगृहात घेतला. पहिल्या दिवशी मराठवाडा पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी नगर आणि सोलापूर जिल्ह्यांचा आढावा घेतला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भाजपवर कडवट टीका केली. 

भाजपचा खरा चेहरा समोर आला

भाजपचे आमदार खून, बलात्कारांच्या आरोपात अटक होत आहेत. समाजातील नामचीन गुंडांना पक्षात आणून भाजपने आमदार, खासदार बनवले असल्यामुळे दुसरे काय घडणार, असा सवालही कदम यांनी केला. भाजपचा खरा चेहरा समाजासमोर उघडा पडला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारनेही कधी सुडाचे राजकारण केले नाही. मात्र, त्यास भाजप अपवाद आहे. शिवसेनेतील काही नेत्यांना पदाची, पैशाची लालूच दाखवून फोडण्याचे घाणेरडे राजकारणही भाजपने खेळले आहे. याची किंमत भाजपला चुकवावीच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपचा खरा चेहरा समोर आल्यामुळे जनतेला शिवसेनेकडून सर्वांधिक अपेक्षा आहेत. या आपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि पदाधिकारी रात्रंदिवस मेहनत घेण्यास तयार असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे लक्ष विचलित करण्याचा डावशिवसेना स्वबळावर लढणार आहे. भाजपसोबत एक हजार एक टक्के युती होणार नाही. सध्या भाजपवाले युती होणारच म्हणून शिवसेना पदाधिकाऱ्यांचे लक्ष विचलित करण्याची चाल खेळत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप स्वतंत्र लढली तर दोन आकडी संख्याही गाठता येणार नाही. यात शिवसेनेचे कोणतेही नुकसान नाही. संभाव्य लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या नुकसानीमुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकायला सुरुवात झाल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले. युती होणार नसल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा फायदा होईल, हा दावाही चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमBJPभाजपाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूकState Governmentराज्य सरकार