औरंगाबाद : देशातील विविध प्रश्नांवर आज मध्यमवर्गीय नुसती चर्चा आणि टीका करतात आणि सोडून देतात. परंतु त्यामध्ये सुधारणा होण्यासाठी स्वत:चा वाटा काय राहील, यासाठी काहीही करताना दिसत नाही. देश चांगला पाहिजे, मात्र त्यासाठी आपले काहीही खर्च होणार नाही, अशा प्रवृत्तीमधून बाहेर पडण्याची गरज असल्याची भावना ‘एएमए’तर्फे आयोजित ‘रेअर शेअर’ कार्यक्रमात गुरुवारी सिडकोचे मुख्य प्रशासक सुनील केंद्रेकर यांनी व्यक्त केली.देवगिरी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंगमध्ये सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी प्रशांत देशपांडे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. सुनील देशपांडे, डॉ. उल्हास शिऊरकर, सतीश कागलीवाल यांची उपस्थिती होती. यावेळी सुनील केंद्रेकर यांनी शासकीय सेवेत कामकाज करताना आलेल्या अनेक अनुभवांवर प्रकाश टाकला. त्यांनी सध्याच्या परिस्थितीविषयी काहीशी चिंता व्यक्त केली. कोणत्याही बाबींची माहिती नसताना थेट टिपणी क रण्यावर भर दिला जात आहे. स्वत: झाडे लावायचे नाहीत, कचरा उचलायचा नाही; परंतु त्यावर टीका करायची आणि केवळ निराशावादी बोलायचे. यातून बाहेर पडले पाहिजे. देशासाठी काय चांगले करू शकतो, याचा विचार करण्याची गरज असल्याचे केंद्रेकर म्हणाले.आपल्याला हेच करायचे अशा प्रकारे करिअरचे मी कधीही प्लॅन केले नव्हते. शिवाय आजही मी पुढच्या मिनिटांचा विचार करतो. औरंगाबादेतच अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. मी नियमित विद्यार्थी नव्हतो. परंतु तरीही चांगले मार्क मिळविले. त्यावेळी घरून महिन्याला १२५ रुपये मिळायचे. अशा परिस्थितीत एक वेळ जेवून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्याचे केंद्रेकर यांनी सांगितले.
केवळ चर्चा करणारा मध्यमवर्गीय नको
By admin | Updated: May 29, 2015 01:03 IST