शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

‘पुरातत्व’च नव्हे; स्थानिकांचीही पाठ !

By admin | Updated: September 12, 2014 00:26 IST

लातूर : पर्यटनस्थळांच्या विकासासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबविल्या जात असल्याचा बोलबाला होत असला तरी इतिहासकालीन महत्व असलेल्या लातूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्षच आहे.

लातूर : पर्यटनस्थळांच्या विकासासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबविल्या जात असल्याचा बोलबाला होत असला तरी इतिहासकालीन महत्व असलेल्या लातूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्षच आहे. शिवाय, स्थानिक पर्यटकही या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याचे प्रमाण नगण्य आहे. उदगीर व औशाचा भुईकोट किल्ला व खरोसा लेण्यांच्या विकासाकडे कमालीचे दुर्लक्षच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ६९.३३ टक्के लोकांनी पर्यटनस्थळांचा विकास होत नसल्याचे मत या सर्वेक्षणातून नोंदविले आहे. तर ८.६७ लोकांनी विकास होत असल्याचे म्हटले आहे. तर २६.६७ टक्के लोकांनी काही प्रमाणात पुरातत्व खात्याचे लक्ष असल्याचे मत या सर्वेक्षणात व्यक्त केले आहे. उदगीर व औशाचा भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. त्यामुळेच ही दोन्ही शहरे ऐतिहासिक म्हणून प्रसिद्ध आहेत. तर खरोशातील लेण्यांमुळे या गावाची ओळख जागतिक स्तरावर आहे. परंतु, हा ऐतिहासिक ठेवा जपण्यात जसे स्थानिक कमी पडत आहेत, तसे पुरातत्व विभागही उदासीन असल्याचे चित्र आहे. या पर्यटनस्थळांच्या देखभाल दुरुस्ती व पर्यटकांच्या भेटीबाबत ‘लोकमत’ने लातूर शहर, औसा शहर आणि खरोसा गावातील १५० लोकांशी सर्वेक्षणाद्वारे संवाद साधला. लातूर जिल्ह्यातील औसा व उदगीर येथील भुईकोट किल्ल्यांना पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत का, या प्रश्नावर उदगीर किल्ल्याला १६ टक्के, तर औसा येथील किल्ल्याला ८४ टक्के लोकांनी पर्यटक भेटी देतात, असे मत नोंदविले आहे. तर ५० टक्के लोकांनी पर्यटक भेटी देत नसल्याचे म्हटले आहे. खरोसा लेणी आपण पाहिली आहे का, असाही प्रश्न सर्वेक्षणात विचारला होता. त्यात ६२ टक्के लोकांनी होय म्हटले आहे. तर ३८ टक्के लोकांनी ‘नाही’ या पर्यायावर टीकमार्क केली आहे. आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना पर्यटकांच्या ठिकाणी भेट देण्यासाठी नेले आहे का, या प्रश्नाच्या उत्तरात ४० टक्के लोकांनी ‘होय’ म्हटले असून, ६० टक्के लोकांनी ‘नाही’ असेच नमूद केले आहे. या तिन्ही पर्यटनस्थळी सोयी-सुविधा उपलब्ध आहेत का, या प्रश्नावर ९ टक्के लोक ‘होय’ म्हणतात. तर ४० टक्के लोक ‘नाही’ म्हणतात. ५१ टक्के लोकांनी सोयी सुविधा काही प्रमाणात उपलब्ध असल्याचे मत नोंदविले आहे. पर्यटनस्थळांच्या देखभाल दुरुस्तीकडे पुरातत्व खात्याचे लक्ष आहे का, या प्रश्नाच्या उत्तरात केवळ ११ टक्के लोकांनी ‘होय’ म्हटले आहे. तर ६९ टक्के लोकांनी ‘नाही’चा शेरा दिला आहे. २० टक्के लोकांनी काही प्रमाणात पुरातत्व खात्याचे लक्ष असल्याचे नमूद केले आहे. (प्रतिनिधी)औसा तालुक्यातील ५० टक्के लोकांनी आत जाऊन हा किल्ला पाहिला नाही. फक्त किल्ल्याच्या तटबंदीचे दर्शन घेतले आहे. तर खरोसा येथे असलेल्या लेण्यांजवळील डोंगरावर रेणुकादेवीचे मंदिर आहे. नवरात्र महोत्सव व कोजागिरी पौर्णिमेला येथे यात्रा असते. त्यामुळे लेण्यांना ८० टक्के लोक भेटी देतात.उदगीर हे ऐतिहासिक शहर आहे. उदयगिरी किल्ल्यामुळे उदगीर शहर प्रसिद्ध आहे. या किल्ल्यावर १७६० ला लढाई झाली होती. किल्ल्यामध्येच उदागीरबाबांचे मंदिर आहे. उदगीरचा हा भुईकोट किल्ला यादव काळातला. लढाईसाठी या किल्ल्याचा फायदा झाला. निजामाला उदगीरातच नमविले गेले. पण त्याला कायमचे वेसन घालण्यात कमी पडलो. या किल्ल्यातून एक भुयारी मार्ग बीदरच्या किल्ल्यापर्यंत जातो. हा मार्ग अंदाजे ६० ते ७० कि.मी. लांब आहे. ४लातूर जिल्ह्याचा उदगीर एक तालुका. हे शहर उदयगिरी किल्ल्यामुळे प्रसिद्ध आहे. शिक्षणाच्या बाबतीतही पुढारलेले शहर असले तरी ऐतिहासिक ठेव्यामुळे या शहराची ख्याती सर्वदूर आहे. उदगीरचा भुईकोट किल्ला यादव काळातला. त्याचा लढाईसाठी फायदा झाला. निजामाला उदगीरातच नमविले असल्याचा संदर्भ आहे.औसा येथील भुईकोट किल्ला १४६० ते १४८० च्या सुमारास बांधण्यात आला. या किल्ल्यामध्ये लढाई झाली नसल्याचे सांगण्यात येते. परंतु, इथे अनेक राजे-महाराजे, सरदार राहिले असल्याचा उल्लेख दस्तावेजात आहे. ५ हेक्टर ५३ आर क्षेत्र परिसर या किल्ल्याचा आहे. चोहोबाजूंनी दुहेरी तटबंदी व १२० फुट रुंदीचा खंदक, अनेक महाल, भुयारी मार्ग असणारा हा किल्ला आहे. औसा व खरोसा येथील काही लोकांशी सर्वेक्षणाव्यतिरिक्त संवाद साधला. त्यातील बऱ्याच जणांनी किल्ल्याला व लेण्यांना भेटी दिल्या नसल्याचे सांगितले. शिवाय, पुरातत्व खात्याकडून देखभाल व दुरुस्ती होत नसल्याची नाराजी व्यक्त केली. पर्यटकांसाठी तेथे सोय नसल्याने भेटी देण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे पर्यटनस्थळाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करून पर्यटकांना आकर्षित करण्याची गरज असल्याची मागणीही औसा व खरोसा येथील नागरिकांनी केली.