शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
2
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
3
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
4
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
5
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
6
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
7
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
8
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
9
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
10
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
11
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
12
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
13
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
14
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
15
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
16
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
17
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
18
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
19
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
20
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
Daily Top 2Weekly Top 5

रक्ताचा एकही थेंब वाया जाऊ दिला जात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:02 IST

--- कोरोना प्रादुर्भावात रक्तसंकलन ३० टक्क्यांपर्यंत घटले होते. ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमामुळे हा तुटवडा भरून निघण्यास मोलाची मदत ...

---

कोरोना प्रादुर्भावात रक्तसंकलन ३० टक्क्यांपर्यंत घटले होते. ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमामुळे हा तुटवडा भरून निघण्यास मोलाची मदत होत आहे. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे ३ ते ४ जणांचा जीव वाचतो. संकलित होणाऱ्या रक्ताचा एकही थेंब वाया जाऊ दिला जात नाही.

--------

विभागीय रक्तसंक्रमण अधिकारी म्हणून औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचा कार्यभार असून, शासकीय आणि खाजगी अशा १७ रक्तपेढ्या आहेत. रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या औषधींसह अनेक गोष्टी कारखान्यात तयार होतात. परंतु आजही रक्त कोणत्या कारखान्यात तयार होत नाही. रक्तदान केल्याशिवाय गरजू रुग्णांना रक्त मिळू शकत नाही. त्यामुळे रक्तदानाला अधिक महत्त्व आहे. परंतु रक्तदान म्हटले की, सुटीच्या दिवशी करू, वेळ मिळाला तर करू असे म्हटले जाते. पण जेव्हा स्वत:ला, नातेवाईकांना रक्ताची गरज भासते, तेव्हा रक्ताचे महत्त्व व्यक्तीला कळते.

रक्तसंकलन केल्यानंतर ते ३० ते ३५ दिवस साठविता येते. रक्ताची मुदतबाह्य होण्याची तारीख जवळ आली की ज्या ठिकाणी गरज आहे, तेथे ते पोहोचविले जाते. शासकीय रक्तपेढ्यांसाठी रक्तदान करण्याकडे ओढा अधिक दिसतो. परंतु प्रत्येक रुग्ण हा शासकीय रुग्णालयातच दाखल होतो असे नाही. खाजगी रुग्णालयांतही रुग्ण दाखल होतात. तेथेही रक्ताची गरज भासते. खाजगी रक्तपेढ्यांना ‘एसबीटीसी’ने निश्चित केलेल्या दरानुसारच रक्त द्यावे लागते. शहरात रक्तपेढ्या आहेत. तर ग्रामीण भागात ६ शासकीय रक्त संकलन केंद्रे आहेत. ग्रामीण भागात रक्ताच्या गरजेसंदर्भात या केंद्रांना आधी माहिती द्यावी लागते. त्यानंतर रक्त उपलब्ध करून दिले जाते. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी अधिक लोकसंख्या आहे, तेथे रक्तपेढी सुरु करण्यासाठी संस्थांनी पुढे आले पाहिजे.