शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

रक्ताचा एकही थेंब वाया जाऊ दिला जात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:02 IST

--- कोरोना प्रादुर्भावात रक्तसंकलन ३० टक्क्यांपर्यंत घटले होते. ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमामुळे हा तुटवडा भरून निघण्यास मोलाची मदत ...

---

कोरोना प्रादुर्भावात रक्तसंकलन ३० टक्क्यांपर्यंत घटले होते. ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमामुळे हा तुटवडा भरून निघण्यास मोलाची मदत होत आहे. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे ३ ते ४ जणांचा जीव वाचतो. संकलित होणाऱ्या रक्ताचा एकही थेंब वाया जाऊ दिला जात नाही.

--------

विभागीय रक्तसंक्रमण अधिकारी म्हणून औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचा कार्यभार असून, शासकीय आणि खाजगी अशा १७ रक्तपेढ्या आहेत. रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या औषधींसह अनेक गोष्टी कारखान्यात तयार होतात. परंतु आजही रक्त कोणत्या कारखान्यात तयार होत नाही. रक्तदान केल्याशिवाय गरजू रुग्णांना रक्त मिळू शकत नाही. त्यामुळे रक्तदानाला अधिक महत्त्व आहे. परंतु रक्तदान म्हटले की, सुटीच्या दिवशी करू, वेळ मिळाला तर करू असे म्हटले जाते. पण जेव्हा स्वत:ला, नातेवाईकांना रक्ताची गरज भासते, तेव्हा रक्ताचे महत्त्व व्यक्तीला कळते.

रक्तसंकलन केल्यानंतर ते ३० ते ३५ दिवस साठविता येते. रक्ताची मुदतबाह्य होण्याची तारीख जवळ आली की ज्या ठिकाणी गरज आहे, तेथे ते पोहोचविले जाते. शासकीय रक्तपेढ्यांसाठी रक्तदान करण्याकडे ओढा अधिक दिसतो. परंतु प्रत्येक रुग्ण हा शासकीय रुग्णालयातच दाखल होतो असे नाही. खाजगी रुग्णालयांतही रुग्ण दाखल होतात. तेथेही रक्ताची गरज भासते. खाजगी रक्तपेढ्यांना ‘एसबीटीसी’ने निश्चित केलेल्या दरानुसारच रक्त द्यावे लागते. शहरात रक्तपेढ्या आहेत. तर ग्रामीण भागात ६ शासकीय रक्त संकलन केंद्रे आहेत. ग्रामीण भागात रक्ताच्या गरजेसंदर्भात या केंद्रांना आधी माहिती द्यावी लागते. त्यानंतर रक्त उपलब्ध करून दिले जाते. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी अधिक लोकसंख्या आहे, तेथे रक्तपेढी सुरु करण्यासाठी संस्थांनी पुढे आले पाहिजे.