शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

रक्ताचा एकही थेंब वाया जाऊ दिला जात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:02 IST

--- कोरोना प्रादुर्भावात रक्तसंकलन ३० टक्क्यांपर्यंत घटले होते. ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमामुळे हा तुटवडा भरून निघण्यास मोलाची मदत ...

---

कोरोना प्रादुर्भावात रक्तसंकलन ३० टक्क्यांपर्यंत घटले होते. ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमामुळे हा तुटवडा भरून निघण्यास मोलाची मदत होत आहे. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे ३ ते ४ जणांचा जीव वाचतो. संकलित होणाऱ्या रक्ताचा एकही थेंब वाया जाऊ दिला जात नाही.

--------

विभागीय रक्तसंक्रमण अधिकारी म्हणून औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचा कार्यभार असून, शासकीय आणि खाजगी अशा १७ रक्तपेढ्या आहेत. रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या औषधींसह अनेक गोष्टी कारखान्यात तयार होतात. परंतु आजही रक्त कोणत्या कारखान्यात तयार होत नाही. रक्तदान केल्याशिवाय गरजू रुग्णांना रक्त मिळू शकत नाही. त्यामुळे रक्तदानाला अधिक महत्त्व आहे. परंतु रक्तदान म्हटले की, सुटीच्या दिवशी करू, वेळ मिळाला तर करू असे म्हटले जाते. पण जेव्हा स्वत:ला, नातेवाईकांना रक्ताची गरज भासते, तेव्हा रक्ताचे महत्त्व व्यक्तीला कळते.

रक्तसंकलन केल्यानंतर ते ३० ते ३५ दिवस साठविता येते. रक्ताची मुदतबाह्य होण्याची तारीख जवळ आली की ज्या ठिकाणी गरज आहे, तेथे ते पोहोचविले जाते. शासकीय रक्तपेढ्यांसाठी रक्तदान करण्याकडे ओढा अधिक दिसतो. परंतु प्रत्येक रुग्ण हा शासकीय रुग्णालयातच दाखल होतो असे नाही. खाजगी रुग्णालयांतही रुग्ण दाखल होतात. तेथेही रक्ताची गरज भासते. खाजगी रक्तपेढ्यांना ‘एसबीटीसी’ने निश्चित केलेल्या दरानुसारच रक्त द्यावे लागते. शहरात रक्तपेढ्या आहेत. तर ग्रामीण भागात ६ शासकीय रक्त संकलन केंद्रे आहेत. ग्रामीण भागात रक्ताच्या गरजेसंदर्भात या केंद्रांना आधी माहिती द्यावी लागते. त्यानंतर रक्त उपलब्ध करून दिले जाते. ग्रामीण भागात ज्या ठिकाणी अधिक लोकसंख्या आहे, तेथे रक्तपेढी सुरु करण्यासाठी संस्थांनी पुढे आले पाहिजे.