शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी; काँग्रेसचे आंदोलन

By admin | Updated: January 3, 2017 00:06 IST

जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेऊन ५० दिवस पूर्ण झाले आहेत.

जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेऊन ५० दिवस पूर्ण झाले आहेत. अद्याप सामान्य लोकांसह शेतकऱ्यांच्या अडचणीत संपलेल्या नाहीत. या निर्णयाच्या निषेधार्थ तालुका व जिल्हास्तरावर तसेच काँग्रेसच्या महिला आणि युवक शाखेतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी आ. विक्रम काळे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, औरंगाबादचे माजी महापौर अशोक सायन्ना, शकुंतला शर्मा, विमल आगलावे, शीतल तनपुरे, आर. आर. खडके, राजेंद्र राख, शहराध्यक्ष अब्दुल हफीज, शेख महेमूद, ज्ञानेश्वर भांदरगे, प्रशांत वाढेकर उपस्थित होेते. माजी आ. काळे म्हणाले, सरकारला नोटांमधील एखादी मालिका रद्द करता येऊन शकते. संपूर्ण नोटा बंद करण्याचा कायद्याने सरकारला अधिकारी नाही. एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा पंतप्रधान मोदी यांनी चलनातून बाद करुन कायद्याचा भंग केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच याविरोधात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या तीन उद्देशांसाठी केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यातील एकही उद्देश सफल झाला नसल्याचा आरोप करुन परदेशात असलेला भारतीयांचा पैसा हाच काळा पैसा असून, तो पंतप्रधान मोदींनी देशात आणावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आगामी अर्थसंकल्पात दरडोई विकास निर्देशांक हा २ टक्क्यांनी घसरलेला दिसून येईल. एफडीआय, स्टॉक एक्सचेंज आदींतून काळा पैसा हा परदेशांत गेलेला आहे. तो भारतात आणण्यात यावा. तसेच काळा पैसा हा रोखी स्वरुपात नसून मालमत्ता वा भूखंडामध्ये गुंतविलेला आहे.त्याविरोधात कुठलिही कार्यवाही होताना दिसून येत नाही. पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांची माफी मागावी आणि नोटाबंदीच्या काळात बँक वा परिसरात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. माजी आ. जेथलिया म्हणाले, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली असून, शेतमालाचे भाव घसरले आहेत. त्यामुळे काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. तर डाळिंब असो वा कापूस शेतकऱ्यांना रोख पैसा मिळत नसल्याने तो संकटात सापडला आहे. तर व्यापारी चेकद्वारे पेमेंट करीत असून, तो वटण्यास आठ दिवस लागत आहे, असा आरोप भीमराव डोंगरे यांनी केला. (प्रतिनिधी)