शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

उन्नत भारत अभियानाचे विद्यापीठ बनले नोडल केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:10 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उन्नत भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी हिताच्या आणि ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजनासाठी विभागीय नोडल केंद्र स्थापन केले आहे. यासाठी विद्यापीठ आणि आयआयटी दिल्ली यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली.

ठळक मुद्देराष्ट्रीय सेवा योजना : आयआयटी दिल्ली व विद्यापीठात सामंजस्य करार

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उन्नत भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी हिताच्या आणि ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजनासाठी विभागीय नोडल केंद्र स्थापन केले आहे. यासाठी विद्यापीठ आणि आयआयटी दिल्ली यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली.विद्यापीठाला उन्नत भारत अभियानाचे क्षेत्रीय नोडल केंद्र मंजूर झाल्याबद्दल कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. टी. आर. पाटील यांची उपस्थिती होती. कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उन्नत भारत अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या अध्यक्षपदी संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर आहेत. तर आयआयटी दिल्ली संस्था हा प्रकल्प राबवत आहे. या अभियानासाठी राज्यातील चार विद्यापीठांची, १२ जिल्ह्यांची आणि ६२६ गावांची निवड केली आहे. या सर्व अभियानाचे नोडल केंद्र औरंगाबादचे विद्यापीठ असणार आहे. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने उन्नत भारत अभियानात सुरुवातीला पाच गावे दत्तक घेतली होती. यामध्ये गेवराई कुबेर, मावसाळा, करोडी, चांदापूर आणि चिंचोली बुद्रुक या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये हे अभियान यशस्वी केल्यामुळे विद्यापीठाला नोडल केंद्र देण्यात आले आहे. तसेच २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ५५ महाविद्यालयांनी अभियानाचा प्रचार-प्रसार केला. त्याची दखल दिल्ली आयआयटीने घेतली असल्याचेही डॉ. चोपडे यांनी स्पष्ट केले. या अभियानासाठी लागणारा निधीही विद्यापीठाला प्राप्त झाला आहे. या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून रासेयोचे संचालक डॉ. टी. आर. पाटील हे काम पाहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.चौकटगावांमधील या समस्यांचे करणार निवारणउन्नत भारत अभियानामध्ये राज्यातील १२ जिल्ह्यांची निवड केली आहे. या जिल्ह्यांतील ६२६ गावांत अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी १३० शिक्षणसंस्था, महाविद्यालयांची निवड केली आहे. या अभियानात प्रामुख्याने गावातील स्वच्छतागृहे, पिण्याचे स्वच्छ पाणी, वीज, शेतसंबंधी विविध योजनांची अंमलबजावणी, सिंचन, तंत्रज्ञानाचा वापर, शिक्षणाचा प्रचार व प्रसार, आरोग्य सुविधांची उपलब्धी आणि गावातील आवश्यक असलेले कार्य करण्यात येणार असल्याचे डॉ. टी. आर. पाटील यांनी सांगितले.------------

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रuniversityविद्यापीठ