शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत राहिलो असतो तर नोबेल मिळाले असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 22:44 IST

अमेरिकेत संशोधनाचे कार्य केले. त्याठिकाणीच राहिलो असतो तर नोबेल मिळाले असते. त्या तोडीचे संशोधन केले आहे. अनेक नोबेल विजेत्यांनी माझ्या संशोधनाचे संदर्भ वापरले आहेत. मात्र, ज्ञानप्राप्तीनंतर तथागत गौतम बुद्धांवर शंका घेण्यात आली होती. तीच प्रवृत्ती विद्यापीठात आहे. त्यांना हिऱ्याची किंमत समजण्याची कुवत नसल्याची खंत मावळते कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी निरोपाच्या मनोगतात व्यक्त केली.

ठळक मुद्देबी.ए. चोपडे : विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त पदभार देवानंद शिंदे यांनी घेतला

औरंगाबाद : अमेरिकेत संशोधनाचे कार्य केले. त्याठिकाणीच राहिलो असतो तर नोबेल मिळाले असते. त्या तोडीचे संशोधन केले आहे. अनेक नोबेल विजेत्यांनी माझ्या संशोधनाचे संदर्भ वापरले आहेत. मात्र, ज्ञानप्राप्तीनंतर तथागत गौतम बुद्धांवर शंका घेण्यात आली होती. तीच प्रवृत्ती विद्यापीठात आहे. त्यांना हिऱ्याची किंमत समजण्याची कुवत नसल्याची खंत मावळते कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी निरोपाच्या मनोगतात व्यक्त केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अतिरिक्त कुलगुरूपदाचा पदभार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी मंगळवारी मावळते कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्याकडून स्वीकारला. यानंतर मावळते कुलगुरू व प्रकुलगुरूंना कार्यक्रमात निरोप देण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. चोपडे यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला. पाच वर्षांमध्ये खूप चांगल्या गोष्टी केल्या आहेत. मात्र, त्या समाजासमोर आल्या नाहीत. मोठ्या प्रमाणात निधी आणला. सत्य आहे त्याचीच बाजू घेतली. जाती-पातीचे राजकारण कधी केले नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. जेव्हा या विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार घेतला तेव्हा माझ्या हातात तीन केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूपदाचे कॉल लेटर होते. मात्र, केंद्रीय विद्यापीठांना डावलून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आणि मागास मराठवाड्याचा विकास करण्यासाठी या विद्यापीठाची निवड केली. देशातील क्रमांक एकचे विद्यापीठ बनविण्याचा ध्यास घेतला होता. तो ध्यास पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली; परंतु विद्यापीठात काही विघातक वृत्ती आहेत. त्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. तरीही विचलित न होता, काम करीत राहिलो. विद्यापीठाचा अर्थसंकल्प १२५ कोटी रुपयांनी वाढविला. याशिवाय नॅक, एनआयआरएफमध्ये झेप घेतली असल्याचेही डॉ. चोपडे यांनी सांगितले. प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर म्हणाले, कुलगुरूंनी माझ्यावर वडील बंधंूप्रमाणे प्रेम केल्यामुळे काम करता आले. कधीही कामात खोडा घातला नाही. त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी करता आल्याचे ते म्हणाले. व्यासपीठावर डॉ. साधना पांडे, नलिनी चोपडे उपस्थित होत्या. सूत्रसंचालन करून डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी आभार मानले.चौकट,मतभेद असू द्या, मनभेद नकोप्रत्येकाची क्षमता ही वेगवेगळी असते. प्रत्येकामध्ये मतभेद असले तरी चालतील. मात्र, मनभेद असू नयेत, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी अध्यक्षीय समारोपात केले. फुले-शाहू-आंबेडकर यांची कर्मभूमी असलेल्या विद्यापीठात काम करण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादuniversityविद्यापीठ