शहरं
Join us  
Trending Stories
1
Train Update : वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
2
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
3
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
4
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
5
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
6
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
7
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
8
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
9
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
10
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
11
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
12
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
13
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
15
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
16
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
17
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
18
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
19
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
20
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण

अमेरिकेत राहिलो असतो तर नोबेल मिळाले असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 22:44 IST

अमेरिकेत संशोधनाचे कार्य केले. त्याठिकाणीच राहिलो असतो तर नोबेल मिळाले असते. त्या तोडीचे संशोधन केले आहे. अनेक नोबेल विजेत्यांनी माझ्या संशोधनाचे संदर्भ वापरले आहेत. मात्र, ज्ञानप्राप्तीनंतर तथागत गौतम बुद्धांवर शंका घेण्यात आली होती. तीच प्रवृत्ती विद्यापीठात आहे. त्यांना हिऱ्याची किंमत समजण्याची कुवत नसल्याची खंत मावळते कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी निरोपाच्या मनोगतात व्यक्त केली.

ठळक मुद्देबी.ए. चोपडे : विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त पदभार देवानंद शिंदे यांनी घेतला

औरंगाबाद : अमेरिकेत संशोधनाचे कार्य केले. त्याठिकाणीच राहिलो असतो तर नोबेल मिळाले असते. त्या तोडीचे संशोधन केले आहे. अनेक नोबेल विजेत्यांनी माझ्या संशोधनाचे संदर्भ वापरले आहेत. मात्र, ज्ञानप्राप्तीनंतर तथागत गौतम बुद्धांवर शंका घेण्यात आली होती. तीच प्रवृत्ती विद्यापीठात आहे. त्यांना हिऱ्याची किंमत समजण्याची कुवत नसल्याची खंत मावळते कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी निरोपाच्या मनोगतात व्यक्त केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अतिरिक्त कुलगुरूपदाचा पदभार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी मंगळवारी मावळते कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्याकडून स्वीकारला. यानंतर मावळते कुलगुरू व प्रकुलगुरूंना कार्यक्रमात निरोप देण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. चोपडे यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला. पाच वर्षांमध्ये खूप चांगल्या गोष्टी केल्या आहेत. मात्र, त्या समाजासमोर आल्या नाहीत. मोठ्या प्रमाणात निधी आणला. सत्य आहे त्याचीच बाजू घेतली. जाती-पातीचे राजकारण कधी केले नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. जेव्हा या विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार घेतला तेव्हा माझ्या हातात तीन केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूपदाचे कॉल लेटर होते. मात्र, केंद्रीय विद्यापीठांना डावलून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आणि मागास मराठवाड्याचा विकास करण्यासाठी या विद्यापीठाची निवड केली. देशातील क्रमांक एकचे विद्यापीठ बनविण्याचा ध्यास घेतला होता. तो ध्यास पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली; परंतु विद्यापीठात काही विघातक वृत्ती आहेत. त्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. तरीही विचलित न होता, काम करीत राहिलो. विद्यापीठाचा अर्थसंकल्प १२५ कोटी रुपयांनी वाढविला. याशिवाय नॅक, एनआयआरएफमध्ये झेप घेतली असल्याचेही डॉ. चोपडे यांनी सांगितले. प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर म्हणाले, कुलगुरूंनी माझ्यावर वडील बंधंूप्रमाणे प्रेम केल्यामुळे काम करता आले. कधीही कामात खोडा घातला नाही. त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी करता आल्याचे ते म्हणाले. व्यासपीठावर डॉ. साधना पांडे, नलिनी चोपडे उपस्थित होत्या. सूत्रसंचालन करून डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी आभार मानले.चौकट,मतभेद असू द्या, मनभेद नकोप्रत्येकाची क्षमता ही वेगवेगळी असते. प्रत्येकामध्ये मतभेद असले तरी चालतील. मात्र, मनभेद असू नयेत, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी अध्यक्षीय समारोपात केले. फुले-शाहू-आंबेडकर यांची कर्मभूमी असलेल्या विद्यापीठात काम करण्याची संधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादuniversityविद्यापीठ