शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
4
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
5
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
6
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
7
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
8
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
9
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
10
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
11
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
12
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
13
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
14
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
15
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
16
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
17
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
18
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
19
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
20
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण

...तर पाणीच मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:18 AM

मराठवाड्यातील जनता व लोकप्रतिनि-धींच्या दुर्लक्षामुळेच दुष्काळप्रवण मराठवाड्यावर इतर विभागांकडून अन्याय केला जातो. मराठवाड्याचे हक्काचे पाणीदेखील पळवून नेले जाते. त्यामुळे वेळीच जागृत होऊन एकत्र आले नाही, तर मराठवाड्याला गरजेपुरतेसुद्धा पाणी मिळणार नाही, अशी चिंता व्यक्त करीत या प्रश्नावर लोकचळवळ उभी राहण्याची अपेक्षा जलतज्ज्ञ व अभ्यासकांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देजलतज्ज्ञ व अभ्यासकांचे मत : मराठवाडा अनुशेष निर्मूलन व विकास मंच बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील जनता व लोकप्रतिनि-धींच्या दुर्लक्षामुळेच दुष्काळप्रवण मराठवाड्यावर इतर विभागांकडून अन्याय केला जातो. मराठवाड्याचे हक्काचे पाणीदेखील पळवून नेले जाते. त्यामुळे वेळीच जागृत होऊन एकत्र आले नाही, तर मराठवाड्याला गरजेपुरतेसुद्धा पाणी मिळणार नाही, अशी चिंता व्यक्त करीत या प्रश्नावर लोकचळवळ उभी राहण्याची अपेक्षा जलतज्ज्ञ व अभ्यासकांनी व्यक्त केली.मराठवाडा अनुशेष निर्मूलन व विकास मंचतर्फे आयोजित सर्वपक्षीय बैठक ‘एमजीएम’च्या आइन्स्टाईन सभागृहात पार पडली. यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड. देवयानी डोणगावकर, माजी खा. उत्तमसिंग पवार, शंकर नागरे, प्रा. प्रदीप पुरंदरे, सुभाष लोमटे, विजयअण्णा बोराडे, जे. के. जाधव, या. रा. जाधव, जावेद कुरेशी, सरोज मसलगे, डॉ. संजय लाखे पाटील, राजेंद्र दाते पाटील, प्रा. मनोहर लोंढे, विजय निकाळजे, जि. प. सदस्य रमेश गायकवाड आदी सहभागी झाले होते.‘मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न’ या विषयावर चर्चा करताना डॉ. लाखे म्हणाले की, दांडेकर समितीनंतर राज्यकर्त्यांनी मराठवाड्याकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी लोकचळवळ उभी राहणे गरजेचे आहे.रमेश गायकवाड यांनी जल आराखड्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत त्यांनी घेतलेल्या एक हजारांहून अधिक आक्षेपांवर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. वैधानिक विकास मंडळाचे सदस्य शंकर नागरे यांनी जायकवाडी धरणामध्ये दरवर्षी सरासरी ३३ टीएमसीची तूट पडत असल्याचे सांगितले. ‘मराठवाड्याला इतर राज्यांच्या बरोबरीने आणायचे असल्यास २०२५ पर्यंत अतिरिक्त १५० टीएमसी पाणी इतर नदी खोºयांतून आणण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.प्रा. पुरंदरे यांनी मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी गोदावरी लवादाचे पुनर्विलोकन करणे, भूजलावर लक्ष केंद्रित करणे, जल कायद्यांचे नियम तयार करणे व मृदा व जल संधारणांच्या कामावर भर देणे असा चतु:सूत्री कार्यक्रम सुचविला.‘बाहेरून पाणी आणण्याआधी मराठवाड्यात उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करून वापर करण्याची गरज आहे. प्रकल्पांची निगा राखून पाणी वाटप होत नसल्यामुळे जायकवाडीच्या पाण्याचा लाभ शेतकºयांना होत नाही. ते पाणी सर्वांपर्यंत पोहचले पाहिजे’, याकडे प्रा. प्रदीप पुरंदरे यांनी लक्ष वेधले. बैठकीमध्ये प्रशांत पाटील यांनीदेखील पाणी बचत व जलसंधारणाच्या कामासंबंधी माहिती दिली. आयोजकांनी आमदार, खासदार, महापौर, पक्षप्रमुखांना बैठकीला येण्याचे निमंत्रण दिले होते. परंतु, राजकीय प्रतिनिधी पाठ फिरवली.जलआराखडा मारक की तारक?गोदावरी खोºयाचा जलआराखडा हा मराठवाड्यासाठी मारक असल्याची तक्रार करीत रमेश गायकवाड यांनी आराखडा समितीचे सदस्य असलेल्या प्रा. पुरंदरे यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. ‘मराठवाड्याचे प्रतिनिधी असूनही प्रा. पुरंदरे मराठवाड्याला न्याय मिळवून देऊ शकले नाहीत, असे गायकवाड म्हणाले. हा आक्षेप फेटाळून लावत पुरंदरे यांनी आराखडा व्यवस्थित न समजून घेता करण्यात येणारे हे बिनबुडाचे आरोप आहेत, असे म्हटले.