शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

कोरोनाची लक्षणे नाहीत, पण...; अर्ध्याहून अधिक शहर तापाने फणफणले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 14:48 IST

More than half the city was affected by viral fever एकीकडे रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले असले तरी, अर्ध्याहून अधिक शहरातील नागरिकांना सुरुवातीला कणकण, नंतर किरकोळ स्वरूपाचा ताप, तर काहींना फक्त सर्दी, अंग दुखणे यासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देकितीही औषध, गोळ्या घेतल्या तरी रुग्णांना अशक्तपणा आणि अंग दुखणे थांबायला तयार नाही.ज्या पद्धतीने रुग्ण येत आहेत, त्यांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

औरंगाबाद : शहर आणि परिसरात कोरोना विषाणूने थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिक भरडले जात आहेत. त्यातच आठ दिवसांपासून अर्ध्याहून अधिक शहराला ताप, अंगदुखी, सर्दी अशा व्हायरल आजाराने ग्रासले आहे. खासगी डॉक्‍टरांकडे लांबलचक रांगा दिसून येत आहेत. कोरोनाच्या भीतीने काही नागरिकांनी रांगा लावून टेस्ट करून घेतली. मात्र त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे डॉक्टरांनीही आता संसर्गजन्य आजार समजून औषधोपचार सुरू केले आहेत.

१५ मार्च रोजी औरंगाबाद शहरात 'कोरोना' संसर्गाला एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे नागरिकांनाही आता कोरोनाचे गुणधर्म चांगल्या प्रकारे कळू लागले आहेत. पूर्वी साधा ताप असला तरी कोरोनाची भीती वाटत होती. खासगी डॉक्टर पटकन कोरोना तपासणी करण्याचा सल्ला देत होते. कोरोना तपासणी टाळण्यासाठी अनेकजण दुखणे अंगावर काढत होते. मागील वर्षभराचा अनुभव पाठीशी असल्याने नागरिक आता न घाबरता महापालिकेच्या वेगवेगळ्या तपासणी केंद्रांवर रांगा लावून टेस्ट करीत आहेत. दररोज ५ हजार तपासण्या करण्यात येत आहेत. त्यात ७०० ते ८०० नागरिक पॉझिटिव्ह येत आहेत.

एकीकडे रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले असले तरी, अर्ध्याहून अधिक शहरातील नागरिकांना सुरुवातीला कणकण, नंतर किरकोळ स्वरूपाचा ताप, तर काहींना फक्त सर्दी, अंग दुखणे यासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. शहरातील प्रत्येक खासगी डॉक्टरकडे दिवसभरातून किमान शंभर रुग्ण व्हायरल आजाराचे येत आहेत. डॉक्टर रुग्णांना नेहमीप्रमाणे व्हायरल डिसीज समजून औषधोपचार करीत आहेत. तीन ते चार दिवसानंतरही ताप कमी न झाल्यास, कोरोना तपासणी सुद्धा करण्यात येत आहे. त्यात बहुतांशी नागरिक निगेटिव्ह येत आहेत. कितीही औषध, गोळ्या घेतल्या तरी रुग्णांना अशक्तपणा आणि अंग दुखणे थांबायला तयार नाही. ज्या पद्धतीने रुग्ण येत आहेत, त्यांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

रुग्णसंख्या प्रचंड वाढलीवातावरणातील बदलामुळे शहरात ताप असलेल्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. डायरिया आणि सर्दीच्या रुग्णांची ही संख्या वाढलेली दिसून येते. तीन ते पाच दिवसांमध्ये ताप कमी न झाल्यास रुग्णांनी पटकन कोरोना टेस्ट करून घ्यावी. काही साथीचे आजारही वाढत आहेत.- संजय पाटणे, अध्यक्ष, फिजिशियन असोसिएशन. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद