शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
5
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
6
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
7
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
8
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
9
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
10
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
11
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
12
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
13
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
14
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
15
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
16
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
17
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
18
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
19
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
20
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची लक्षणे नाहीत, पण...; अर्ध्याहून अधिक शहर तापाने फणफणले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 14:48 IST

More than half the city was affected by viral fever एकीकडे रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले असले तरी, अर्ध्याहून अधिक शहरातील नागरिकांना सुरुवातीला कणकण, नंतर किरकोळ स्वरूपाचा ताप, तर काहींना फक्त सर्दी, अंग दुखणे यासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देकितीही औषध, गोळ्या घेतल्या तरी रुग्णांना अशक्तपणा आणि अंग दुखणे थांबायला तयार नाही.ज्या पद्धतीने रुग्ण येत आहेत, त्यांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

औरंगाबाद : शहर आणि परिसरात कोरोना विषाणूने थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिक भरडले जात आहेत. त्यातच आठ दिवसांपासून अर्ध्याहून अधिक शहराला ताप, अंगदुखी, सर्दी अशा व्हायरल आजाराने ग्रासले आहे. खासगी डॉक्‍टरांकडे लांबलचक रांगा दिसून येत आहेत. कोरोनाच्या भीतीने काही नागरिकांनी रांगा लावून टेस्ट करून घेतली. मात्र त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे डॉक्टरांनीही आता संसर्गजन्य आजार समजून औषधोपचार सुरू केले आहेत.

१५ मार्च रोजी औरंगाबाद शहरात 'कोरोना' संसर्गाला एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे नागरिकांनाही आता कोरोनाचे गुणधर्म चांगल्या प्रकारे कळू लागले आहेत. पूर्वी साधा ताप असला तरी कोरोनाची भीती वाटत होती. खासगी डॉक्टर पटकन कोरोना तपासणी करण्याचा सल्ला देत होते. कोरोना तपासणी टाळण्यासाठी अनेकजण दुखणे अंगावर काढत होते. मागील वर्षभराचा अनुभव पाठीशी असल्याने नागरिक आता न घाबरता महापालिकेच्या वेगवेगळ्या तपासणी केंद्रांवर रांगा लावून टेस्ट करीत आहेत. दररोज ५ हजार तपासण्या करण्यात येत आहेत. त्यात ७०० ते ८०० नागरिक पॉझिटिव्ह येत आहेत.

एकीकडे रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले असले तरी, अर्ध्याहून अधिक शहरातील नागरिकांना सुरुवातीला कणकण, नंतर किरकोळ स्वरूपाचा ताप, तर काहींना फक्त सर्दी, अंग दुखणे यासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. शहरातील प्रत्येक खासगी डॉक्टरकडे दिवसभरातून किमान शंभर रुग्ण व्हायरल आजाराचे येत आहेत. डॉक्टर रुग्णांना नेहमीप्रमाणे व्हायरल डिसीज समजून औषधोपचार करीत आहेत. तीन ते चार दिवसानंतरही ताप कमी न झाल्यास, कोरोना तपासणी सुद्धा करण्यात येत आहे. त्यात बहुतांशी नागरिक निगेटिव्ह येत आहेत. कितीही औषध, गोळ्या घेतल्या तरी रुग्णांना अशक्तपणा आणि अंग दुखणे थांबायला तयार नाही. ज्या पद्धतीने रुग्ण येत आहेत, त्यांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

रुग्णसंख्या प्रचंड वाढलीवातावरणातील बदलामुळे शहरात ताप असलेल्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. डायरिया आणि सर्दीच्या रुग्णांची ही संख्या वाढलेली दिसून येते. तीन ते पाच दिवसांमध्ये ताप कमी न झाल्यास रुग्णांनी पटकन कोरोना टेस्ट करून घ्यावी. काही साथीचे आजारही वाढत आहेत.- संजय पाटणे, अध्यक्ष, फिजिशियन असोसिएशन. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद