शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

आता पाणीपुरवठा करणे मनपाची जबाबदारी नाही!

By admin | Updated: September 13, 2014 00:35 IST

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम सुरू झाल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा खंडित झाला तरी त्याची जबाबदारी पालिकेवर राहणार नाही, अशी बेताल उत्तरे मनपा अधिकाऱ्यांनी दिली.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम सुरू झाल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा खंडित झाला तरी त्याची जबाबदारी पालिकेवर राहणार नाही, अशी बेताल उत्तरे मनपा अधिकाऱ्यांनी महापौर कला ओझा, पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत दिली. या बैठकीला आयुक्त पी.एम. महाजन यांची उपस्थिती होती.अधिकाऱ्यांना आता पाणीपुरवठ्याच्या कटकटीतून मुक्तता मिळाल्यासारखे वाटत आहे, तर समांतरची कंत्राटदार कंपनी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीही (एसीडब्ल्यूयूसीएल) बेजबाबदारपणे वागू लागली आहे. पाणी न आल्यास जबाबदार कोण? यासाठी कंपनीने अधिकारी, अभियंते, लाईनमनची नावे जाहीर केलेली नाहीत, तर पालिका प्रशासनानेदेखील त्यांना या प्रकरणी विचारणा केलेली नाही. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांच्या नशिबी पाण्यासाठी परवड येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पाणीपुरवठा विभागाचे काम १ सप्टेंबरपासून एसीडब्ल्यूयूसीएल करीत आहे. १३ दिवसांमध्ये कंपनीच्या विरोधात नागरिकांकडून आलेल्या तक्रारींबाबत पालिका अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनी कुणाकडे तक्रार करावी आणि जबाबदार म्हणून कुणाला विचारावे हे कळण्यास मार्ग नाही. १३ दिवसांतच हा अनुभव आहे, तर कंपनी २० वर्षे काम कसे करणार आणि औरंगाबादकरांना त्याचे काय दुष्परिणाम भोगावे लागणार हे आत्ताच कसे कळणार? सभापती विजय वाघचौरे हे अधिकाऱ्यांची बेताल उत्तरे ऐकून संतापले. ते म्हणाले की, मनपाने योजनेचे खाजगीकरण केले आहे. पूर्ण पालिकेचे नाही. शहरातील सर्वसामान्यांना पाणीपुरवठ्याप्रकरणी ज्या अडचणी येतील त्याचे निरसन अधिकाऱ्यांना करावेच लागेल. प्रभागनिहाय प्रत्येक अधिकाऱ्यावर जबाबदारी दिलीच पाहिजे. कंपनीच्या अरेरावीपुढे नागरिक हतबल झाले, तर त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागतील. अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही. प्रभागनिहाय पाणीपुरवठा दक्षता समिती गठीत करण्याची त्यांनी मागणी केली. आयुक्त महाजन म्हणाले की, करारात जे नमूद असेल, त्याप्रमाणे कंपनीकडून काम करून घेतले जाईल.गुंठेवारीतील टँकर आणि जनकल्याण म्हणून पाठविण्यात येणारे मोफत टँकर्स ठेकेदाराने बंद केले. सिडको-हडको, उल्कानगरी परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याची तक्रार केली. एन-७ जलकुंभावर मिसारवाडीतील महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला होता. उल्कानगरी, जवाहर कॉलनीतील नागरिकांनी पाण्यासाठी उपमहापौरांना निवेदन दिले. शुक्रवारी शहरातील पाणीपुरवठा कोलमडला.