शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

आता पाणीपुरवठा करणे मनपाची जबाबदारी नाही!

By admin | Updated: September 13, 2014 00:35 IST

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम सुरू झाल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा खंडित झाला तरी त्याची जबाबदारी पालिकेवर राहणार नाही, अशी बेताल उत्तरे मनपा अधिकाऱ्यांनी दिली.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम सुरू झाल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा खंडित झाला तरी त्याची जबाबदारी पालिकेवर राहणार नाही, अशी बेताल उत्तरे मनपा अधिकाऱ्यांनी महापौर कला ओझा, पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत दिली. या बैठकीला आयुक्त पी.एम. महाजन यांची उपस्थिती होती.अधिकाऱ्यांना आता पाणीपुरवठ्याच्या कटकटीतून मुक्तता मिळाल्यासारखे वाटत आहे, तर समांतरची कंत्राटदार कंपनी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीही (एसीडब्ल्यूयूसीएल) बेजबाबदारपणे वागू लागली आहे. पाणी न आल्यास जबाबदार कोण? यासाठी कंपनीने अधिकारी, अभियंते, लाईनमनची नावे जाहीर केलेली नाहीत, तर पालिका प्रशासनानेदेखील त्यांना या प्रकरणी विचारणा केलेली नाही. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांच्या नशिबी पाण्यासाठी परवड येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पाणीपुरवठा विभागाचे काम १ सप्टेंबरपासून एसीडब्ल्यूयूसीएल करीत आहे. १३ दिवसांमध्ये कंपनीच्या विरोधात नागरिकांकडून आलेल्या तक्रारींबाबत पालिका अधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनी कुणाकडे तक्रार करावी आणि जबाबदार म्हणून कुणाला विचारावे हे कळण्यास मार्ग नाही. १३ दिवसांतच हा अनुभव आहे, तर कंपनी २० वर्षे काम कसे करणार आणि औरंगाबादकरांना त्याचे काय दुष्परिणाम भोगावे लागणार हे आत्ताच कसे कळणार? सभापती विजय वाघचौरे हे अधिकाऱ्यांची बेताल उत्तरे ऐकून संतापले. ते म्हणाले की, मनपाने योजनेचे खाजगीकरण केले आहे. पूर्ण पालिकेचे नाही. शहरातील सर्वसामान्यांना पाणीपुरवठ्याप्रकरणी ज्या अडचणी येतील त्याचे निरसन अधिकाऱ्यांना करावेच लागेल. प्रभागनिहाय प्रत्येक अधिकाऱ्यावर जबाबदारी दिलीच पाहिजे. कंपनीच्या अरेरावीपुढे नागरिक हतबल झाले, तर त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागतील. अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही. प्रभागनिहाय पाणीपुरवठा दक्षता समिती गठीत करण्याची त्यांनी मागणी केली. आयुक्त महाजन म्हणाले की, करारात जे नमूद असेल, त्याप्रमाणे कंपनीकडून काम करून घेतले जाईल.गुंठेवारीतील टँकर आणि जनकल्याण म्हणून पाठविण्यात येणारे मोफत टँकर्स ठेकेदाराने बंद केले. सिडको-हडको, उल्कानगरी परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याची तक्रार केली. एन-७ जलकुंभावर मिसारवाडीतील महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला होता. उल्कानगरी, जवाहर कॉलनीतील नागरिकांनी पाण्यासाठी उपमहापौरांना निवेदन दिले. शुक्रवारी शहरातील पाणीपुरवठा कोलमडला.