शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

'ब्राह्मण' समाजाला आरक्षणाची गरज नाही आम्ही स्वबळावर प्रगती साधणार; ब्राह्मण समाज समन्वय समितीचा निर्णय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 20:32 IST

ब्राह्मण समाजाने कधी आरक्षण मागितले नाही. आणि भविष्यात कधी आरक्षण मागणार नाही. अशी स्पष्ट व ठोस भूमिका ब्राह्मण समाज समन्वय समितीने घेतली आहे. 

ठळक मुद्देसमाजातील युवकांनी नोकरीच्या मागे न धावता व्यवसाय व उद्योगात यावे, यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असा निर्णय ब्राह्मण समाज समन्वय समितीने घेतला आहे. शहरातील ब्राह्मण समाजातील विविध २५ संघटनांनी एकत्र येऊन ब्राह्मण समाज समन्वय समितीची स्थापना दोन वर्षापूर्वी करण्यात आली.

औरंगाबाद : ब्राह्मण समाज कधीच आरक्षण मागणार नाही. स्वबळावर समाजाची व देशाचा प्रगती साधणार आहे. ब्राह्मण युवकांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृती ते वस्तीगृहापर्यंतची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच समाजातील युवकांनी नोकरीच्या मागे न धावता व्यवसाय व उद्योगात यावे, यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असा निर्णय ब्राह्मण समाज समन्वय समितीने घेतला आहे. 

शहरातील ब्राह्मण समाजातील विविध २५ संघटनांनी एकत्र येऊन ब्राह्मण समाज समन्वय समितीची स्थापना दोन वर्षापूर्वी करण्यात आली. संघटनेच्या वतीने येत्या ५ नोव्हेंबर रोजी दिवाळी स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत समितीचे अध्यक्ष अनिल पैठणकर यांनी सांगितले की, ब्राह्मण समाजालाही आता आरक्षण हवे, अशा चुकीच्या बातम्या मध्यंतरी पसरल्या होत्या. मात्र, ब्राह्मण समाजाने कधी आरक्षण मागितले नाही. आणि भविष्यात कधी आरक्षण मागणार नाही. अशी स्पष्ट व ठोस भूमिका ब्राह्मण समाज समन्वय समितीने घेतली आहे. 

समाज स्वबळावर प्रगती साधण्यास सक्षम आहे. समाजातील नवपिढीला आत्मनिर्भर व सक्षम बनविण्यासाठी समितीने कार्य हाती घेतले आहे. समाजात अनेक गरीब कुटूंब आहेत त्यातील हुशार, गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, अर्थसहाय्य करण्यात येत आहे. तसेच समाजाने व्यावसायिक व उद्योजकांची संघटना तयार केली आहे. याद्वारे युवकांना कौशल्यप्रशिक्षण देणे व नोकरीला लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच समाजातील जास्तीतजास्त युवकांनी व्यवसाय सुरु करावा तसेच उद्योग उभारावा यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने संघटनात्मक कार्य सुरु आहे. 

बीबीएनचे मंगेश पळसकर यांनी सांगितले की, ब्राह्मण बिझनेस नेटवर्कच्या माध्यमातून आजपर्यंत ३० कोटीची उलाढाल झाली आहे. तसेच आता व्यवसाय व उद्योगासाठी लागणारे भांडवल उभे करुन देण्यासाठी दोन बँकाही तयार झाल्या आहेत. यामुळे भविष्यात ब्राह्मण समाजातील युवक नोकरीपेक्षा उद्योेग व्यवसायात अधिक प्रमाणात पुढे येतील, असेही पळसकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधण्यासाठी अनेक उद्योजक,व्यावसायिक पुढे आले आहेत. संपूर्ण समाजाच्या सहकार्याने येत्या दोन वर्षात शहरात भव्य वसतीगृह उभारण्यात येईल,अशी माहिती समितीचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे यांनी दिली.