शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
4
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
5
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
6
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
7
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
8
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
9
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
10
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
11
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
12
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
13
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
14
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
15
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
16
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
17
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
18
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
19
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
20
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सपाकडून आघाडीबाबत सकारात्मक प्रतिसाद नाही : शिवपाल

By | Updated: December 4, 2020 04:12 IST

लखनौ : उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीकडून आघाडी करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळणे दुर्भाग्यपूर्ण आहे, असे प्रगतिशील समाजवादी पार्टी—लोहिया (प्रसपा) ...

लखनौ : उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीकडून आघाडी करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळणे दुर्भाग्यपूर्ण आहे, असे प्रगतिशील समाजवादी पार्टी—लोहिया (प्रसपा) प्रमुख शिवपाल सिंह यांनी म्हटले आहे.

शिवपाल यांनी म्हटले आहे की, समाजवादी पार्टीने आतापर्यंत माझ्या प्रस्तावावर कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही किंवा त्या पक्षाच्या नेतृत्वाशी कसलीही चर्चा झालेली नाही. माझी इच्छा असूनही चर्चा पुढे सरकत नाही, हे दुर्भाग्यपूर्ण आहे.

समाजवादी पार्टीपासून वेगळे होऊन प्रसपाची स्थापना करणाऱ्या शिवपाल यांनी यापूर्वी अनेकदा सपाशी आघाडी करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यानंतर सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही म्हटले होते की, प्रसपा त्यांच्याबरोबर आली तर त्यांच्या नेत्याला कॅबिनेट मंत्रिपद दिले जाईल. आम्हाला प्रसपाशी आघाडी करण्यात कोणतीही अडचण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

शिवपाल यांनी स्पष्ट केले आहे की, आघाडी केली तरी प्रसपाचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहील. या पक्षाचे एकांगी विलीनीकरण करण्याचा प्रस्तावही त्यांनी फेटाळून लावला आहे. प्रसपा आपले पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वास देऊ इच्छिते की, त्यांच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

आम्ही पक्षसंघटन मजबूत करण्यावर सतत काम करीत आहोत. येत्या २४ डिसेंबर रोजी प्रसपा संपूर्ण उत्तर प्रदेशातील प्रत्येक गावात पदयात्रांचे आयोजन करीत आहे. प्रत्येक गावात पोहोचणे व पक्षाचे विचार जनतेपर्यंत घेऊन जाणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असेही त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टी तसेच शिवपाल यांच्या प्रगतिशील समाजवादी पार्टी—लोहिया (प्रसपा)ने तयारी सुरू केली आहे.

.................

गैरभाजप पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन

प्रगतिशील समाजवादी पार्टी—लोहिया (प्रसपा) प्रमुख शिवपाल सिंह यांनी म्हटले आहे की, गैरभाजप पक्षांनी एकत्र येण्याचे मी पुन्हा एकदा आवाहन करीत आहे. वेगवेगळ्या माध्यमांतून व संवादाच्या विविध व्यासपीठांवरून मी अनेकदा ही बाब सांगितलेली आहे की, समाजवादी विचारधारा असलेल्यांनी एका व्यासपीठावर यावे व सर्वांचा सन्मान होईल तसेच राज्याचा विकास होईल, असे काम करावे.