शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

ना गणित, भौतिकशास्त्र डावलले; उलट इंजिनिअरिंगचे शिक्षण सुलभ केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 14:18 IST

Changed Engineering Eligibility is beneficial तज्ज्ञ म्हणतात एआयसीटीईच्या नव्या तरतुदींमुळे अभियांत्रिकी शिक्षण सुलभ

ठळक मुद्देगणित, भौतिकशास्त्रासाठी ब्रीज कोर्स करावा लागणारनव्या शैक्षणिक धोरणाची ही पहिली स्टेप आहे.

लातूर : अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी प्रवेशासाठी गणित आणि भौतिकशास्त्र विषय बंधनकारक नसल्याची केलेली तरतूद शिक्षण घेण्यासाठी सुलभ झाली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना गणित, भौतिकशास्त्र विषयांचा ब्रीज कोर्स करावा लागणार आहे. ना गणित, भौतिकशास्त्र डावलले, उलट इंजिनिअरिंगचे शिक्षण सुलभ केले आहे, असे मत अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांनी व्यक्त केले आहे.

विद्यार्थ्यांना पाहिजे तो कोर्स निवडण्यासाठी संधी दिली पाहिजे. पूर्वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय अनिवार्य होते. आता रसायनशास्त्र ऐच्छिक विषय आहे. इलिजिबिलिटी वाढविण्यासाठी एयआयसीटीईने ही तरतूद केली आहे; परंतु प्रवेश झाल्यानंतर भौतिकशास्त्र आणि गणिताचा ब्रीज कोर्स विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. तंत्रनिकेतनच्या मुलांना पदवी अभियांत्रिकीला प्रवेश दिल्यानंतर ब्रीज कोर्स करावा लागतो. त्याच धर्तीवर ज्या विद्यार्थ्यांना अकरावी, बारावीला भौतिकशास्त्र, गणित नाही, त्यांना ब्रीज कोर्स करावा लागेल. ही येऊ घातलेली पद्धत अभियांत्रिकी शिक्षण सुलभ असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करण्यासाठी भौतिकशास्त्र, गणित हे विषय राहणार आहेत. प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांची पात्रता वाढविण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने गणित, भौतिकशास्त्राऐवजी अन्य विषयांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतला आहे, जो विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. इंजिनिअरिंगचा प्रवेश सुलभ करणारा आहे. कालानुरूप केलेला बदल फायद्याचाच असतो. पीसीएम ग्रुपने पात्रता भरत नसेल, तर अन्य १४ संबंधित विषयाचे गुण ग्राह्य धरले जातील. त्यामुळे हा निर्णय चांगला असल्याचे बिडवे अभियांत्रिकीचे प्रा. डाॅ. संजय मंत्री म्हणाले.

नव्या शैक्षणिक धोरणाची ही पहिली स्टेप आहे. कला, वाणिज्य, विज्ञान असे अकरावी, बारावीला पुढील काळात राहणार नाही. बारावीनंतरच विद्यार्थ्यांना विषय निवडता येणार आहेत. त्याअनुषंगाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. पीसीएम ग्रुपमध्ये ५० गुण भरत नसतील तर इलेक्ट्राॅनिक्स, काॅम्प्युटर अशा संबंधित विषयांचे गुण मोजले जातील आणि विद्यार्थी पात्र ठरेल. विद्यार्थ्यांची पात्रता वाढविणारा हा निर्णय आहे. - प्रा. श्रीकांत तांदळे, बिडवे अभियांत्रिकी काॅलेज.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीlaturलातूर