शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ना गणित, भौतिकशास्त्र डावलले; उलट इंजिनिअरिंगचे शिक्षण सुलभ केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 14:18 IST

Changed Engineering Eligibility is beneficial तज्ज्ञ म्हणतात एआयसीटीईच्या नव्या तरतुदींमुळे अभियांत्रिकी शिक्षण सुलभ

ठळक मुद्देगणित, भौतिकशास्त्रासाठी ब्रीज कोर्स करावा लागणारनव्या शैक्षणिक धोरणाची ही पहिली स्टेप आहे.

लातूर : अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी प्रवेशासाठी गणित आणि भौतिकशास्त्र विषय बंधनकारक नसल्याची केलेली तरतूद शिक्षण घेण्यासाठी सुलभ झाली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना गणित, भौतिकशास्त्र विषयांचा ब्रीज कोर्स करावा लागणार आहे. ना गणित, भौतिकशास्त्र डावलले, उलट इंजिनिअरिंगचे शिक्षण सुलभ केले आहे, असे मत अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांनी व्यक्त केले आहे.

विद्यार्थ्यांना पाहिजे तो कोर्स निवडण्यासाठी संधी दिली पाहिजे. पूर्वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय अनिवार्य होते. आता रसायनशास्त्र ऐच्छिक विषय आहे. इलिजिबिलिटी वाढविण्यासाठी एयआयसीटीईने ही तरतूद केली आहे; परंतु प्रवेश झाल्यानंतर भौतिकशास्त्र आणि गणिताचा ब्रीज कोर्स विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. तंत्रनिकेतनच्या मुलांना पदवी अभियांत्रिकीला प्रवेश दिल्यानंतर ब्रीज कोर्स करावा लागतो. त्याच धर्तीवर ज्या विद्यार्थ्यांना अकरावी, बारावीला भौतिकशास्त्र, गणित नाही, त्यांना ब्रीज कोर्स करावा लागेल. ही येऊ घातलेली पद्धत अभियांत्रिकी शिक्षण सुलभ असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करण्यासाठी भौतिकशास्त्र, गणित हे विषय राहणार आहेत. प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांची पात्रता वाढविण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने गणित, भौतिकशास्त्राऐवजी अन्य विषयांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतला आहे, जो विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. इंजिनिअरिंगचा प्रवेश सुलभ करणारा आहे. कालानुरूप केलेला बदल फायद्याचाच असतो. पीसीएम ग्रुपने पात्रता भरत नसेल, तर अन्य १४ संबंधित विषयाचे गुण ग्राह्य धरले जातील. त्यामुळे हा निर्णय चांगला असल्याचे बिडवे अभियांत्रिकीचे प्रा. डाॅ. संजय मंत्री म्हणाले.

नव्या शैक्षणिक धोरणाची ही पहिली स्टेप आहे. कला, वाणिज्य, विज्ञान असे अकरावी, बारावीला पुढील काळात राहणार नाही. बारावीनंतरच विद्यार्थ्यांना विषय निवडता येणार आहेत. त्याअनुषंगाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. पीसीएम ग्रुपमध्ये ५० गुण भरत नसतील तर इलेक्ट्राॅनिक्स, काॅम्प्युटर अशा संबंधित विषयांचे गुण मोजले जातील आणि विद्यार्थी पात्र ठरेल. विद्यार्थ्यांची पात्रता वाढविणारा हा निर्णय आहे. - प्रा. श्रीकांत तांदळे, बिडवे अभियांत्रिकी काॅलेज.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीlaturलातूर