शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

आठ महिन्यांपासून निधीच नाही, कोरोना लाटेचा मुकाबला करायचा कसा

By | Updated: November 26, 2020 04:12 IST

औरंगाबाद : महापालिका प्रशासन मागील ८ महिन्यांपासून कोरोनामध्ये नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी शासनाकडून आर्थिक साहाय्य मात्र ...

औरंगाबाद : महापालिका प्रशासन मागील ८ महिन्यांपासून कोरोनामध्ये नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी शासनाकडून आर्थिक साहाय्य मात्र पुरेसे मिळत नाही. मार्च महिन्यात कोरोनासाठी १७ कोटी रुपये महापालिकेला देण्यात आले. मागील सात महिन्यांपासून महापालिकेला एक रुपयाही निधी दिलेला नाही. ३२ कोटी रुपयांची बिले थकली आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करायचा कसा, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी कोरोनासंदर्भात सविस्तर माहिती दिली. प्रशासनाने शहरात तब्बल ३ लाख नागरिकांची कोरोना टेस्ट केली. २६ हजार नागरिक आतापर्यंत बाधित आढळले. त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. सीसीसी सेंटरमध्ये उपचार केलेल्या नागरिकांना सर्व सोयी-सुविधा देण्यात आल्या. कोट्यवधी रुपये महापालिकेने आतापर्यंत खर्च केले आहेत. मागील बिल थकीत असल्यामुळे कंत्राटदार दुसऱ्या लाटेसाठी काम करायला तयार नाहीत.

कोट्यवधी रुपयांची बिले थकीत

रुग्णवाहिकांचे तीन कोटी रुपयांचे बिल बाकी आहे. कोविड केअर सेंटर्समधील वीज बिलांचे सुमारे एक कोटीचे बिल प्रलंबित आहे. कोविड केअर सेंटर्स व क्वारंटाईन सेंटर्समधील रुग्णांना जेवण देण्यासाठी नेमलेल्या केटरर्सचे तीन कोटींचे बिल प्रलंबित आहे. अँटिजन कीटस्‌चे सात कोटी रुपये, अन्य वैद्यकीय उपकरणे व औषधींची तीन कोटी रुपयांची बिले प्रलंबित आहेत. महापालिकेलादेखील खर्च करण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे जिल्हा नियोजन समिती आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याकडून निधी मिळणे गरजेचे आहे. त्यांच्याकडून निधी मिळाला, तर कंत्राटदारांचे पेमेंट करता येईल. विहित नमुन्यात निधीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

आतापर्यंत फक्त १७ कोटी रुपये प्राप्त

आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आतापर्यंत महापालिकेला १२ कोटी रुपये मिळाले आहेत, तर जिल्हा नियोजन समितीकडून ५ कोटी रुपये मिळाले. ३२ कोटी रुपयांचा नवीन प्रस्ताव महापालिकेने दिला आहे. ऑक्सिजन प्लांटसाठी एक कोटी रुपयांची मागणी केली होती, हा निधी इतके दिवस मिळाला नाही; पण आता जिल्हाधिकाऱ्यांनी निधी देण्याची तयारी दाखवली आहे.