शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या हजारो शाळांची बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 13:45 IST

जिल्ह्यातील जवळपास दीड हजारांहून अधिक शाळांचा विद्युत प्रवाह खंडित करण्यात आला आहे

ठळक मुद्दे एक कोटीची रक्कम थकीत बिलासाठी स्वतंत्र तरतूद नाही

औरंगाबाद : शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी. तंत्रस्नेही बनावे. ‘सरल’ प्रणाली अंतर्गत शाळा, शिक्षक, विद्यार्थ्यांची माहिती, शालेय पोषण आहाराची दैनंदिन माहिती आॅनलाईन भरावी, असा शासन- प्रशासनाचा आग्रह आहे, तर दुसरीकडे, बिल न भरल्यामुळे जिल्ह्यातील जवळपास दीड हजारांहून अधिक शाळांचा विद्युत प्रवाह खंडित करण्यात आला आहे, अशा परिस्थितीत ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत सजग कसे करावे, असा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास अडीच हजार शाळा आहेत. यापैकी चारशे ते पाचशे शाळा ‘आयएसओ’ झाल्या. शासनाने अनेक शाळांना संगणक, एलसीडी, प्रोजेक्टर्स दिलेले आहेत. त्याद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती द्यावी, त्यासंबंधीचे शिक्षण द्यावे, यावर भर दिला जात आहे; परंतु ज्या शाळांमध्ये विद्युत व्यवस्थाच नसेल, तिथे या तंत्रस्नेही शिक्षक अथवा संगणक, एलसीडीचा काय उपयोग, असा सवाल शिक्षक- पालकांनी उपस्थित केला आहे. आजघडीला जिल्ह्यातील जवळपास दीड हजार शाळांकडे १ कोटी ७ लाख ८६ हजार ६७४ रुपये एवढे वीज बिल थकले आहे. एक तर ते बिल शिक्षकांनी वर्गणी जमा करून भरावे किंवा लोकसहभागातून ते भरावे, अशी जि.प. शिक्षण विभागाची अपेक्षा आहे.

शाळांच्या वीज बिलासाठी शिक्षण विभागाकडे स्वतंत्र तरतूद नाही. महावितरणच्या प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील ‘आयएसओ’ मानांकनप्राप्त ३४ जि.प. शाळांचे ३ लाख २२ हजार १६२ रुपये एवढे वीज बिल भरले. ही रक्कम महावितरण कर्मचाऱ्यांनी शहीद जवानाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी आपले एक दिवसाचे वेतन जमा केले होते. जमा १० लाख रुपयांतून ५ लाख रुपयांचा निधी शहीद जवान संदीप जाधव यांच्या कुटुंबाला दिला, तर उर्वरित रक्कम जि.प. शाळांचे वीज बिल भरण्यासाठी वापरण्यात आला. त्यामुळे सद्य:स्थितीत या शाळांमध्ये पुन्हा प्रकाश येऊ शकला. 

समग्र शिक्षा अभियानाचा उताराशिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल म्हणाले, पूर्वी शाळांना नियमित सादीलवार अनुदान मिळायचे. या अनुदानातून इतर साधनसामुग्री खरेदीसाठी तसेच वीज बिल भरण्यासाठी वापरले जात होते. त्यानंतर सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळा अनुदान दिले जात होते, तर आता समग्र शिक्षा अभियानातून विद्यार्थी संख्येनुसार शाळा अनुदान दिले जाते. नुकताच जवळपास २ कोटी रुपयांचा निधी शाळांना वितरित करण्यात आला आहे. त्यातून शाळांनी थकीत वीज बिल भरण्याच्या सूचना केल्या आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादzp schoolजिल्हा परिषद शाळाAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदmahavitaranमहावितरण