शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
3
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
4
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
5
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
6
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
7
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
8
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
9
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
10
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
11
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
12
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
14
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
15
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
16
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
17
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
18
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
19
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
20
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी

औरंगाबाद लॉकडाऊनच्या वळणावर; मात्र लावण्याबाबत अद्याप निर्णय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 12:08 IST

lockdown in Aurangabad व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये वाढलेले रुग्ण, त्यांचे व्यवस्थापन, पॉझिटिव्ह केसेस कमी झाल्या पाहिजेत, बेड्सची उपलब्धता याबाबत शासनाकडून विचारणा झाली.

ठळक मुद्देनागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदविला विरोधमुख्यमंत्र्यांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा

औरंगाबाद : जिल्ह्यात लॉकडाऊन करायचे की नाही, याचा शुक्रवारी निर्णय झालाच नाही. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थितीबद्दलचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतला. या व्हिडीओ कॉन्फरन्सला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिकुमार पांडेय आदी उपस्थित होते.

लॉकडाऊनबाबत शुक्रवारी निर्णय होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले होते. त्या अनुषंगाने शुक्रवारी मुख्यमंत्री आणि आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. मात्र, निर्णय होऊ शकला नाही. प्राप्त माहितीनुसार लॉकडाऊन लावण्यावरुन प्रशासन द्विधा मन:स्थितीत आहे.जिल्ह्यात ४ एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊनमध्ये शनिवार, रविवार असे दोन दिवस पूर्ण लॉकडाऊन आहे. सोमवारी होळीच्या निमित्ताने शासकीय सुटी आहे. हे तीन दिवस वगळून एक आठवडा लॉकडाऊन करावे काय, याबाबत चर्चा सुरू आहे. पण याबाबत अधिकृतपणे कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली नाही.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये वाढलेले रुग्ण, त्यांचे व्यवस्थापन, पॉझिटिव्ह केसेस कमी झाल्या पाहिजेत, बेड्सची उपलब्धता याबाबत शासनाकडून विचारणा झाली. लॉकडाऊनबाबतचा निर्णय व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये झाला नाही. औरंगाबाद लॉकडाऊनच्या वळणावर आहे, मात्र ते लावण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

विभागीय आयुक्त म्हणाले...विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी सांगितले, आता संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला आहे. नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. चाचणी करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. लॉकडाऊन करायचे की नाही, या निर्णयाबद्दल जिल्हाधिकारी माहिती देतील.

समाजमाध्यमांतून जिल्हाधिकाऱ्यांचा संवादजिल्हाधिकारी चव्हाण यांनी शुक्रवारी सकाळी समाजमाध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊनच्या संदर्भाने नागरिकांची मते जाणून घेतली. यावेळी अनेक नागरिकांनी लॉकडाऊनच्या विरोधात मते व्यक्त केली. काही निवडक प्रश्नांची उत्तरे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. लॉकडाऊन करायचे झाल्यास सर्व बाजूंचा विचार करण्यात येणार आहे. लोकांनी सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. होळी, धुळवड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. रुग्णांना असणाऱ्या लक्षणांवर त्याला कुठे ठेवायचे, याचा निर्णय होईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

अंशत: लॉकडाऊनची स्थिती अशी११ मार्चपासून ते ४ एप्रिल या कालावधीमध्ये अशंत: लॉकडाऊन केलेले आहे. १६ मार्चच्या आदेशानुसार रात्री ८ वाजल्यापासून ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली. ४ एप्रिलपर्यंत प्रत्येक शनिवारी व रविवारी पूर्ण लॉकडाऊन लावण्यात आलेले आहे. दरम्यान, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या महावीर चौकातील एन. ए. प्रिंटर्स, सेव्हन हिल येथील जागृत पेट्रोल पंप व हर्सूल टी पाॅईंट येथील एच. पी. कंपनीचा पेट्रोल पंप सील करण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद