शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

‘मनपा नको, सातारा नगर परिषदच हवी’

By admin | Updated: May 26, 2015 00:52 IST

औरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषदेचा महापालिकेत समावेश करण्यात आला आहे; परंतु हा निर्णय रद्द करण्यात यावा आणि नगर परिषदच कायम ठेवण्यात यावी,

औरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषदेचा महापालिकेत समावेश करण्यात आला आहे; परंतु हा निर्णय रद्द करण्यात यावा आणि नगर परिषदच कायम ठेवण्यात यावी, या मागणीसाठी जोरदार घोषणा देत विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच सातारा- देवळाईवासीयांतर्फे सोमवारी बीड बायपासवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे बीड बायपासवर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्याने बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली.‘आधी शहरातील लोकांना सुविधा पुरवा, मग आमचा विचार करा’, ‘नगर परिषद आमच्या हक्काची’ आंदोलकांनी दिलेल्या अशा घोषणांनी बीड बायपास रोड दणाणून गेला. भर उन्हात आंदोलनात महिला वर्गाचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. प्रारंभी, जोरदार घोषणा देत आंदोलकांनी वाहतूक थांबवली. त्यामुळे बीड बायपासवरील दोन्ही बाजूंनी (पान २ वर)(पान १ वरून)वाहनांच्या रांगा लागल्या. आंदोलनकर्ते बाजूला झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होत असताना पुन्हा रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु पोलिसांनी आंदोलकांना अडविले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला. आंदोलनात जावेद पटेल, बाळासाहेब गायकवाड, डॉ. सुदर्शन मुंडे, स्वप्नील, शिरसाट, गजेंद्रसिंग राठोड, रोहन पवार, क्षितिज रोडे, अंकुश दाभाडे, दीपक गायकवाड, अजय चव्हाण, शरद शेवाळे, बाजीराव हिवाळे, अप्पासाहेब शिंदे, विकास कवडे, रुख्मिणी मोगल, रिमन जाधव, शोभा पवार, संध्या गायकवाड, संजीवनी हिवाळे, शेख जिया, शेख अकबर पटेल, सुवर्णा पाटील, नलिनी शेवाळे आदी सहभागी झाले.जनतेच्या भावनेचा कोणत्याही प्रकारे विचार न करता नगर परिषदेचा महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला. महापालिकेत समाविष्ट झालेल्या यापूर्वीच्या गावांचा कोणत्याही प्रकारे विकास झालेला नाही.महापालिकेत गेल्यानंतर मिळणारे पाणीही बंद झाले. त्यामुळे महापालिकेत समावेश झाल्याने सातारा- देवळाईचीही अशीच अवस्था होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते.