शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

‘मनपा नको, सातारा नगर परिषदच हवी’

By admin | Updated: May 26, 2015 00:52 IST

औरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषदेचा महापालिकेत समावेश करण्यात आला आहे; परंतु हा निर्णय रद्द करण्यात यावा आणि नगर परिषदच कायम ठेवण्यात यावी,

औरंगाबाद : सातारा- देवळाई नगर परिषदेचा महापालिकेत समावेश करण्यात आला आहे; परंतु हा निर्णय रद्द करण्यात यावा आणि नगर परिषदच कायम ठेवण्यात यावी, या मागणीसाठी जोरदार घोषणा देत विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच सातारा- देवळाईवासीयांतर्फे सोमवारी बीड बायपासवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे बीड बायपासवर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्याने बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली.‘आधी शहरातील लोकांना सुविधा पुरवा, मग आमचा विचार करा’, ‘नगर परिषद आमच्या हक्काची’ आंदोलकांनी दिलेल्या अशा घोषणांनी बीड बायपास रोड दणाणून गेला. भर उन्हात आंदोलनात महिला वर्गाचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. प्रारंभी, जोरदार घोषणा देत आंदोलकांनी वाहतूक थांबवली. त्यामुळे बीड बायपासवरील दोन्ही बाजूंनी (पान २ वर)(पान १ वरून)वाहनांच्या रांगा लागल्या. आंदोलनकर्ते बाजूला झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होत असताना पुन्हा रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु पोलिसांनी आंदोलकांना अडविले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला. आंदोलनात जावेद पटेल, बाळासाहेब गायकवाड, डॉ. सुदर्शन मुंडे, स्वप्नील, शिरसाट, गजेंद्रसिंग राठोड, रोहन पवार, क्षितिज रोडे, अंकुश दाभाडे, दीपक गायकवाड, अजय चव्हाण, शरद शेवाळे, बाजीराव हिवाळे, अप्पासाहेब शिंदे, विकास कवडे, रुख्मिणी मोगल, रिमन जाधव, शोभा पवार, संध्या गायकवाड, संजीवनी हिवाळे, शेख जिया, शेख अकबर पटेल, सुवर्णा पाटील, नलिनी शेवाळे आदी सहभागी झाले.जनतेच्या भावनेचा कोणत्याही प्रकारे विचार न करता नगर परिषदेचा महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला. महापालिकेत समाविष्ट झालेल्या यापूर्वीच्या गावांचा कोणत्याही प्रकारे विकास झालेला नाही.महापालिकेत गेल्यानंतर मिळणारे पाणीही बंद झाले. त्यामुळे महापालिकेत समावेश झाल्याने सातारा- देवळाईचीही अशीच अवस्था होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते.