शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

महापालिका खरेदी करणार ९० लाखांचे पंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:02 IST

औरंगाबाद : मंगळवारी (दि. ७) शहरात दीड तास ढगफुटीसारखा पाऊस झाला. शंभरपेक्षा अधिक वसाहतींमध्ये दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी ...

औरंगाबाद : मंगळवारी (दि. ७) शहरात दीड तास ढगफुटीसारखा पाऊस झाला. शंभरपेक्षा अधिक वसाहतींमध्ये दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचले होते. अग्निशमन विभागाला घरांमध्ये शिरलेले पाणी काढण्यासाठी ४८ तास लागले होते. डिझास्टर मॅनेजमेंटअंतर्गत महापालिका प्रशासनाने यापूर्वीच दिल्ली येथील कंपनीला १५ मोठे आणि १५ लहान पंप खरेदीसाठी ऑर्डर दिली आहे. या पंपखरेदीवर जवळपास ९० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

शहरात कोणत्याही वसाहतीत पावसाचे पाणी साचले, तर पहिला कॉल अग्निशमन विभागाला येतो. अनेक वसाहतींमध्ये पावसाचे पाणी शिरल्यानंतर अग्निशमन विभागाची प्रचंड दमछाक होते. मुळात घरांमध्ये शिरलेले पावसाचे पाणी काढण्याचे काम अग्निशमन विभागाचे नाही. रस्त्यावर झाड कोसळले असेल तेथे, पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे, वाहून जाणाऱ्यांना वाचविणे, आदी कामे त्यांच्याकडून अपेक्षित आहेत. महापालिकेची वॉर्ड कार्यालये डिझास्टर मॅनेजमेंटसाठी सक्रिय नसल्यामुळे दिवसेंदिवस अग्निशमन विभागावरील ताण वाढतो. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी अग्निशमन विभागाच्या कामाचा सखोल अभ्यास करून वॉर्ड कार्यालयांवर डिझास्टर मॅनेजमेंटची काही जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला. तातडीने पाण्याचा उपसा करणारे मोठे १५ आणि लहान १५ पंप खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. निविदा काढण्यात आली. दिल्ली येथील राहुल इंजिनिअरिंग ही कंपनी निविदा प्रक्रियेत पात्र ठरली. कंपनीला वर्क ऑर्डरही दिली.

मात्र, मागील दोन महिन्यांपासून कंपनी पंपांचा पुरवठा करण्यास टाळाटाळ करीत आहे. कंपनीने साहित्य पुरवठा करण्यासाठी १५० दिवसांचा अवधी वाढवून मागितला. महापालिकेने ६० दिवसांमध्येच साहित्य पुरवठा करावा लागेल, अशी अट घातली आहे.

काम अधिक लवकर होईल

महापालिकेच्या प्रत्येक वॉर्ड कार्यालयात एक मोठा आणि एक छोटा पंप ठेवण्यात येणार आहे. नऊ वॉर्ड कार्यालयांना हे पंप देण्याची योजना आहे. आपल्या परिसरात कुठेही पावसाचे पाणी साचले, तर वॉर्ड कार्यालयांनीच ते पाणी काढावे, असा दंडक घालण्यात येणार आहे. अग्निशमन विभागाकडे १२ पंप राहतील.

साहित्य मिळविण्याचे प्रयत्न

महापालिकेकडे जुने १० पंप आहेत. त्यांची कार्यशक्ती संपली आहे. वारंवार ते बंद पडतात. अलीकडेच ४ पंप दुरुस्त करून आणण्यात आले. नवीन मोठे पंप आहेत. त्यांमध्ये पाणी ओढण्याची क्षमता चारपट आहे. हे साहित्य लवकरात लवकर मिळविण्यासाठी यांत्रिकी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.

- अमोल कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता, यांत्रिकी विभाग, महापालिका.