शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

पुढचा आठवडा महत्वाचा; महापालिका ॲक्शन मोडमध्ये, शहरातील प्रत्येक घर कोविड सेंटर समजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 19:23 IST

Corona Virus: ९० टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये राहतील, ज्या रुग्णाला किंचितही त्रास होत असेल तर त्याला त्वरित रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे बहुतांश बाधित रुग्ण घरातच राहतील. महापालिका प्रशासन प्रत्येक रुग्णावर लक्ष ठेवणार आहे, त्यासाठी वाॅररूम तयार करण्यात येत असल्याची माहिती मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.

रविवारपर्यंत शहरात ४४८ बाधित रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. प्रत्येक रुग्ण पाच ते आठ दिवस होम आयसोलेशनमध्ये राहणार आहेत. तातडीच्या सेवेसाठी रुग्णांना किमान सहा मोबाइल नंबर दिले जातील. वाॅररूममधील ऑपरेटर आणि तज्ज्ञ डॉक्टर दिवसभरातून दोन वेळेस संबंधित रुग्णांशी संपर्क साधून चर्चा करतील. स्मार्ट सिटीच्या इमारतीमधून वाॅररूम काम करणार आहे. गरज पडल्यास काही रुग्णांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मदत केली जाईल. ज्या रुग्णाला किंचितही त्रास होत असेल तर त्याला त्वरित रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ‘एमएचएमएच’ आठ दिवसांमध्ये अपडेट करून नागरिकांच्या सेवेत देण्यात येईल. या ॲपमुळे बाधित रुग्णांना शहरात कोणत्या ठिकाणी बेड रिकामे आहेत, त्याची माहिती मिळेल, असेही पाण्डेय यांनी सांगितले.

पुढचे सात दिवस महत्त्वाचेआज ज्या पद्धतीने रुग्णवाढ होत आहे, ते पाहता पुढील पाच ते सात दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. दररोज दोन हजार रुग्ण बाधित आढळून येतात का, याकडे प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे. महापालिकेकडे स्वतःच्या ५७५ ऑक्सिजन खाटा तयार आहेत. मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये साडेतीनशे रुग्ण झाल्यानंतर पुढील केंद्र सुरू करण्यात येतील. महापालिकेला संपूर्ण औषधी जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत मिळणार आहे.

महापालिकेचा १५ कलमी कार्यक्रमकोरोनाच्या तिसऱ्या लाटेत महापालिकेने पंधरा कलमी कार्यक्रम निश्चित केला आहे. बूस्टर डोस, बाधित रुग्णांवर लक्ष ठेवणे, गरजेनुसार कोविड सेंटर वाढविणे, कर्मचारी संख्या वाढविण्याची तयारी, आरोग्य कर्मचाऱ्यांना दोन दिवस घाटीत प्रशिक्षण, ऑक्सिजन टँक, सिलिंडर भरून ठेवणे, ॲम्ब्युलन्स तयार ठेवणे, बाधित रुग्णांना समुपदेशन, होम आयसोलेशनसाठी खासगी रुग्णालयांनी पॅकेज तयार करावे, बाधित रुग्णाला पाच दिवसांतून एकदा तरी मनपा कर्मचाऱ्यांनी तपासणे, मनपा अधिकारी, कर्मचारी यांना संसर्ग होऊ नये, याची काळजी घेणे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद