शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

आस्करच्या पुढील फेरीतही ‘धग’ बाजी मारेल

By admin | Updated: December 20, 2014 23:39 IST

गजेंद्र देशमुख , जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद या छोट्याशा खेड्यातील एका मुलीने आज मायानगरी मुंबईत स्वत:मधील कला व मेहनतीच्या जोरावर वेगळे स्थान निर्माण केले आहे.

गजेंद्र देशमुख , जालनाजिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद या छोट्याशा खेड्यातील एका मुलीने आज मायानगरी मुंबईत स्वत:मधील कला व मेहनतीच्या जोरावर वेगळे स्थान निर्माण केले आहे. २०१४ च्या आॅस्कर पुरस्कारातील पुढील प्रक्रियेतही धग या चित्रपटास स्थान मिळेल, असा विश्वास वैशालीने व्यक्त केला. वैशाली दाभाडे या सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने नाट्य तसेच चित्रपट सृष्टीत वेगळा ठसा उमटविला आहे. तिने अभिनय केलेल्या ‘धग’ या चित्रपटास जागतिक पातळीवर प्रसिद्ध अशा आॅस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. यानिमित्त तिच्याशी केलेली बातचीत...वैशालीने शालेय जीवनापासूनच नाटकांमध्ये अभिनय करत चित्रटपसृष्टी गाठली आहे. मी छोटीशी का होईना भूमिका साकारलेला चित्रपट आॅस्करसाठी नामांकन होत आहे, ही गोष्ट माझ्यासाठी तसेच जिल्ह्यासाठी मोठ्या आनंदाची तसेच अभिमानाची असल्याचे सांगितले. स्मशानातील म्हसनजोगींवर अधारीत धग हा चित्रपट असल्याचे वैशालीने सांगितले. गावातील कोणी व्यक्त मरण पावली तरच स्मशानभूमीत राहणाऱ्यांची चूल कशी पेटते, त्यांचा उदरनिर्वाह कसा चालतो या विषयावर हृदयस्पर्शी तसेच वास्तव परिस्थिती दाखविण्यात आली आहे. वैशालीचे शालेय शिक्षण भोकरदन तालुक्यात झाले. त्यानंतर औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात नाट्यशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला. यानंतर खरा चित्रपट व नाट्यसृष्टीतील स्ट्रगलला सुरुवात झाली. गॅदरिंंग, मुंबई, पुण्यात छोट्या नाटकांमध्ये अनेक भूमिका साकारल्या. संत सिद्धेश्वर चित्रपटात सर्वप्रथम भूमिका साकारली. येथून चित्रपटासृष्टीत पदार्पण झाले. एका छोट्याशा खेडेगावातून सुरु झालेला संघर्ष अद्यापही सुरुच आहे. आजरोजी मित्र परिवार तसेच ओळखीचा जोरावर काहीअंशी स्थिरता येत असल्याचे वैशाली सांगते. धग चित्रपटात एका पाहुण्या कलाकाराची भूमिका केली आहे. उषा जाधव, उपेंद्र लिमये, नागेश भोसले आदी कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याचे वैशालीने नमूद केले. आतापर्यंत धगसह राजवाडा, सिंघम रिटर्न, वात्सल्य, जाणिवा, ३१ आॅक्टोबर, फेकमफाक आदी चित्रपटात वैशालीने विविध भूमिका साकारल्या आहेत. व्हॅलेंटाईने हा आगामी चित्रपट येत आहे. यात लिड रोल असल्याचे तिने सांगितले. चिमणी पाखर, अशी ही धर्मकन्या या सह्याद्री वाहिनीवरील मालिकांमधूनही काम केले आहे. मुंबई ही मायानगरी आहे. चार ते पाच वर्षात अनेक अनुभव आले. मायानगरीत टिकून राहण्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज असल्याचे सांगून अद्यापही धडपड सुरु असल्याचे वैशालीची म्हणणे आहे. धग चित्रपटामुळे वेगळे वलय प्राप्त झाल्याचे ती सांगते. अनेक दिग्दर्शक आवर्जून विचारणा करतात. आज ना उद्या निश्चितच चित्रपटसृष्टी दखल घेईल, असा विश्वास वैशालीने लोकमतशी बोलताना व्यक्त केला.