शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

दुसऱ्या दिवशीच्या मुलाखतीही स्थगित

By admin | Updated: November 26, 2014 01:11 IST

औरंगाबाद : काल पहिल्या दिवशी उपकुलसचिव पदाच्या मुलाखती रद्द कराव्या लागल्या, तर आज दुसऱ्या दिवशी सहायक कुलसचिव पदाच्या मुलाखती स्थगित करण्याच्या

औरंगाबाद : काल पहिल्या दिवशी उपकुलसचिव पदाच्या मुलाखती रद्द कराव्या लागल्या, तर आज दुसऱ्या दिवशी सहायक कुलसचिव पदाच्या मुलाखती स्थगित करण्याच्या नामुष्कीला विद्यापीठ प्रशासनाला सामोरे जावे लागले. दरम्यान, सहायक कुलसचिव पदासाठी ४ डिसेंबर रोजी उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी होणार असून त्यानंतर मग मुलाखतीचा दिवस ठरविला जाईल. सोमवारी उपकुलसचिव पदासाठी एकही उमेदवार पात्र नसल्याचे छाननी समितीच्या निदर्शनास आल्यानंतर कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या आदेशानुसार मुलाखतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. आज दुसऱ्या दिवशी सहायक कुलसचिवपदासाठी मुलाखती आयोजित केल्या. तत्पूर्वी, छाननी समितीने उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी केली. तेव्हा अनेक उमेदवारांच्या कागदपत्रांद्वारे काही तांत्रिक बाबी समोर आल्या. याचा अर्थ ते उमेदवार अपात्र नव्हते. विद्यापीठ प्रशासनाने सहायक कुलसचिव पदासाठी दिलेल्या जाहिरातीमध्ये अनेक संदिग्धता होत्या. त्यानुसार उमेदवारांनी अर्ज केले होते. संबंधित उमेदवारांचे शैक्षणिक, अनुभव व अन्य प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणीसाठी आज मंगळवारी पुरेसा अवधी नसल्यामुळे छाननी समितीच्या निर्णयानंतर कुलगुरूंनी आजच्या मुलाखती स्थगित केल्या. ४ डिसेंबर रोजी सहायक कुलसचिव पदाच्या उमेदवारांची छाननी समितीसमोर कागदपत्रांची तपासणी होईल. त्यानंतर मुलाखतीची तारीख निश्चित केली जाणार आहे. छाननी समितीसमोर हजर झालेल्या खुल्या प्रवर्गातील ४० पेक्षा जास्त व विमुक्त भटक्या जमाती प्रवर्गातील ११ उमेदवारांच्या कागदपत्रांची आज सकाळी तपासणी सुरू झाली. तेव्हा दुसरीकडे कुलसचिव डॉ. धनराज माने, व्यवस्थापन समितीचे ज्येष्ठ सदस्य डॉ. शिवाजी मदन, प्राचार्य डॉ. दत्तात्रय आघाव, राज्यपालांचे प्रतिनिधी उल्हास उढाण, शासनाचे प्रतिनिधी डॉ. गुप्ता हे मुलाखत समितीचे सदस्य उमेदवारांच्या प्रतीक्षेत बसले होते. दुपारनंतर त्यांना आजच्या मुलाखती स्थगित केल्याचा निरोप मिळाला. सलग दोन दिवस विद्यापीठात मुलाखतीची संपूर्ण यंत्रणा सज्ज असताना पात्र- अपात्रेवरून अखेर मुलाखती रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर आली. ४मुलाखत समितीचे सदस्य तथा राज्यपालांचे प्रतिनिधी उल्हास उढाण यांनी कुलगुरू डॉ. चोपडे यांच्याकडे काही सूचना मांडल्या. विद्यापीठाची नामुष्की टाळण्यासाठी यापुढे कोणत्याही भरतीसाठी जाहिरात देताना त्यामध्ये उमेदवारांच्या पात्रतेसंबंधी स्पष्ट उल्लेख असावा. ४जाहिरातीमध्ये कुठल्याही प्रकारची संदिग्धता राहू नये. यामुळे विद्यापीठाचा वेळ व पैसा वाचेल. बदनामी होणार नाही. शिवाय, उमेदवारांचाही मानसिक त्रास वाचेल.४प्रशासनाच्या अशा ढिसाळ कारभारावर कुलगुरू डॉ. चोपडे यांनी आज तीव्र नापसंती व्यक्त केली. यापुढे गांभीर्यपूर्वक काम करण्याच्या सूचना कुलगुरूंनी प्रशासनातील सर्वच अधिकाऱ्यांना दिल्या.