शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

\ दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाचे तांडव

By admin | Updated: April 12, 2015 00:51 IST

जालना : शहरासह जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे तांडव कायम होते. अनेक घरांवरील पत्रे उडाली, विद्युत खांब व तारा निखळल्याने वीजपुरवठा खंडित झाला

जालना : शहरासह जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे तांडव कायम होते. अनेक घरांवरील पत्रे उडाली, विद्युत खांब व तारा निखळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. गेल्या चोवीस तासापासून अंधारात असलेले जालना शहर शनिवारी सायंकाळनंतर उजळले.दुपारपर्यंत कडक ऊन होते. मात्र नंतर ढगाळ वातावरण झाले. वादळी वाऱ्यासह शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.शुक्रवारी शहरात काही ठिकाणी उन्मळून पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम आजही सुरू होते. ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक होता. प्रचंड वेगात पाऊस झाला. तीर्थपुरी, दैठणा, जोगलादेवी या तीन ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. अन्य ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. ३.३० ते ४.१५ च्या दरम्यान. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. विद्युत तारा निखळल्या, विद्युत खांब कोसळले. त्यामुळे गावातील वीजपुरवठा खंडित होता. अवकाळी पावसामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली. जालना तालुक्यातील गोलापांगरी, बठाण, इंदेवाडी, अंतरवाला, सामनगाव, रामनगरसह बाजी उम्रद, जळगाव, सावरगाव, हडप, भाटेपुरी, हातवन, खनेपुरी यासह अनेक गावात वादळी पावसाने हजेरी लावली. भोकरदन तालुक्यातील लेहा, शेलूद येथे पाऊस झाला. अंबड व बदनापूर तालुक्यात पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातील हसनाबाद व परिसरात दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली. भोकरदन रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडी उन्मळून पडल्याने वाहतुक ठप्प झाली होती.या अवकाळी पावसाने शुक्रवारी रात्री शहरात निम्म्यापेक्षा अधिक भागात अंधार होता. अनेक रस्त्यांवर विद्युत तारा निखळलेल्या होत्या. महावितरणच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांसह खाजगी कामगारांनी आज पहाटे ३ वाजेपर्यंत विविध भागात काम करून बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरळीत केला. दरम्यान, शनिवारी वादळी वाऱ्यामुळे पुन्हा काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यासाठी रात्री उशिरापर्यंत दुरूस्तीचे काम सुरू होते. पिंपळगाव रेणुकाई येथे अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाली. येथील माया कैलास घोटे वय १६ या मुलीच्या अंगावर घरातील भींत पडल्याने ती दबली होती. गावातील शिवाजी सास्ते, गजानन गाडेकर , तुकाराम गाढे यांनी भर पावसात भिंतीचा मलबा बाजूला करून त्या मायाचे प्राण वाचविले. जखमी मायाला उपचारासाठी हलविण्यात आले. तसेच येथून जवळच असलेल्या वरूड येथील सुभद्राबाई आनंदा वाघ ह्या शेतातून घराकडे येत असताना रस्त्यावरील खांब त्यांच्या अंगावर पडल्याने त्या गंभीररित्या जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.