शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

‘झेडपी’त नवे गडी, नवे ‘राज’ !

By admin | Published: March 29, 2017 12:12 AM

उस्मानाबाद : गुढी पाडव्याचा मुहूर्त साधात जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील आणि विषय समित्यांच्या सभापतींनी मंगळवारी पदाची सूत्रे हाती घेतली

उस्मानाबाद : गुढी पाडव्याचा मुहूर्त साधात जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील आणि विषय समित्यांच्या सभापतींनी मंगळवारी पदाची सूत्रे हाती घेतली. त्यामुळे आता जि.प.मध्ये ‘नवे गडी, नवे राज’ सुरू झाले असून या पदाधिकाऱ्यांसमोर आता प्रामुख्याने शाळांचा दर्जा उंचाविणे, शाळांचा वीजपुरवठा पूर्ववत करणे, दप्तर दिरंगाई दूर करून प्रशासनात सुसूत्रता आणणे आदी आव्हाने असणार आहे. नूतन पदाधिकारी ही आव्हाने कशाप्रकारे पेलावितात, हे येणाऱ्या काळात दिसून येणार आहे.जिल्हा परिषदेच्या २६ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. बहुमतासाठी त्यांना अवघ्या दोनच जागा कमी पडल्या होत्या. भाजपाच्या सहकार्याने राष्ट्रवादीने सत्तेच्या चाव्या हाती घेत अध्यक्षपदी वडगाव सिद्धेश्वर गटातील नेताजी पाटील तर उपाध्यक्षपदी तेर गटातून विजयी झालेल्या अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांना संधी देण्यात आली. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर अवघ्या तीन दिवसांत म्हणजेच २४ मार्च रोजी निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीने भाजपाच्या उपकाराची परतफेड दोन ‘तगडी’ सभापतीपदे देवून केली. अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापतींच्या निवडी होवूनही संबंधित पदाधिकाऱ्यांकडून पदाची सूत्रे हाती घेतली गेली नव्हती. गुढी पाडव्या दिवशी सूत्रे हाती घेण्याचे त्याच दिवशी निश्चित झाले होते. ठरल्यानुसार मंगळवारी नेताजी पाटील यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. तर अर्चनाताई पाटील यांनी उपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. अध्यक्ष, उपाध्यक्षांसोबतच सभापतींनीही पदभार स्वीकारला. त्यामुळे खऱ्याअर्थाने मंगळवारपासून जिल्हा परिषदेत ‘नवे गडी, नवे राज’ सुरू झाले आहे. असे असले तरी या नूतन पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. एकीकडे जि.प.च्या शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’ उपक्रम सुरू करण्यात येत आहे. तर दुसरीकडे विद्युत बिलाचा भरणा करण्यासाठी पैैसे नसल्याने कनेक्शन खंडित केले जात आहे. अशा शाळांची संख्या तब्बल साडेचारशेवर जावून ठेपली आहे. त्यामुळे या शाळांतील ई-लर्निंग सुविधा अक्षरश: धूळखात पडून आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता असलेली भाजपा सध्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या सोबतीने सत्तेत आहे. त्यामुळे हा प्रश्न तातडीने मार्गी लागेल, अशी अपेक्षा पालकांतून व्यक्त होत आहे. प्रशासनातील दप्तर दिरंगाईचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. एकेक फाईल, अनेक महिने फिरूनही त्यावर वेळीच तोडगा निघत नाही. यामध्ये विशेषत: सर्वसामान्यांची प्रचंड फरफट होते. ही बाब लक्षात घेवून सत्ताधाऱ्यांनी यातून तोडगा काढण्याचीही तितकीच गरज आहे. अन्यथ ‘पहिले पाडे पंचावन्न’, या म्हणीचा प्रत्येय नागरिकांना आल्याशिवाय रहाणार नाही. मागील पाच वर्षात राष्ट्रवादी विरोधी बाकावर होती. तेव्हा जि.प. सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे कक्ष बांधकामातील अनियमितता चव्हाट्यावर आणली होती. निविदा न काढताच कामे पूर्ण केल्याचा प्रकार घडला होता. हा प्रश्न आजही कायम आहे. त्यामुळे विद्यमान सत्ताधाऱ्यांना याचाही विचार करावा लागणार आहे.(प्रतिनिधी)