शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

‘झेडपी’त नवे गडी, नवे ‘राज’ !

By admin | Updated: March 29, 2017 00:14 IST

उस्मानाबाद : गुढी पाडव्याचा मुहूर्त साधात जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील आणि विषय समित्यांच्या सभापतींनी मंगळवारी पदाची सूत्रे हाती घेतली

उस्मानाबाद : गुढी पाडव्याचा मुहूर्त साधात जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील आणि विषय समित्यांच्या सभापतींनी मंगळवारी पदाची सूत्रे हाती घेतली. त्यामुळे आता जि.प.मध्ये ‘नवे गडी, नवे राज’ सुरू झाले असून या पदाधिकाऱ्यांसमोर आता प्रामुख्याने शाळांचा दर्जा उंचाविणे, शाळांचा वीजपुरवठा पूर्ववत करणे, दप्तर दिरंगाई दूर करून प्रशासनात सुसूत्रता आणणे आदी आव्हाने असणार आहे. नूतन पदाधिकारी ही आव्हाने कशाप्रकारे पेलावितात, हे येणाऱ्या काळात दिसून येणार आहे.जिल्हा परिषदेच्या २६ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. बहुमतासाठी त्यांना अवघ्या दोनच जागा कमी पडल्या होत्या. भाजपाच्या सहकार्याने राष्ट्रवादीने सत्तेच्या चाव्या हाती घेत अध्यक्षपदी वडगाव सिद्धेश्वर गटातील नेताजी पाटील तर उपाध्यक्षपदी तेर गटातून विजयी झालेल्या अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांना संधी देण्यात आली. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर अवघ्या तीन दिवसांत म्हणजेच २४ मार्च रोजी निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीने भाजपाच्या उपकाराची परतफेड दोन ‘तगडी’ सभापतीपदे देवून केली. अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापतींच्या निवडी होवूनही संबंधित पदाधिकाऱ्यांकडून पदाची सूत्रे हाती घेतली गेली नव्हती. गुढी पाडव्या दिवशी सूत्रे हाती घेण्याचे त्याच दिवशी निश्चित झाले होते. ठरल्यानुसार मंगळवारी नेताजी पाटील यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. तर अर्चनाताई पाटील यांनी उपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. अध्यक्ष, उपाध्यक्षांसोबतच सभापतींनीही पदभार स्वीकारला. त्यामुळे खऱ्याअर्थाने मंगळवारपासून जिल्हा परिषदेत ‘नवे गडी, नवे राज’ सुरू झाले आहे. असे असले तरी या नूतन पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. एकीकडे जि.प.च्या शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’ उपक्रम सुरू करण्यात येत आहे. तर दुसरीकडे विद्युत बिलाचा भरणा करण्यासाठी पैैसे नसल्याने कनेक्शन खंडित केले जात आहे. अशा शाळांची संख्या तब्बल साडेचारशेवर जावून ठेपली आहे. त्यामुळे या शाळांतील ई-लर्निंग सुविधा अक्षरश: धूळखात पडून आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता असलेली भाजपा सध्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या सोबतीने सत्तेत आहे. त्यामुळे हा प्रश्न तातडीने मार्गी लागेल, अशी अपेक्षा पालकांतून व्यक्त होत आहे. प्रशासनातील दप्तर दिरंगाईचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. एकेक फाईल, अनेक महिने फिरूनही त्यावर वेळीच तोडगा निघत नाही. यामध्ये विशेषत: सर्वसामान्यांची प्रचंड फरफट होते. ही बाब लक्षात घेवून सत्ताधाऱ्यांनी यातून तोडगा काढण्याचीही तितकीच गरज आहे. अन्यथ ‘पहिले पाडे पंचावन्न’, या म्हणीचा प्रत्येय नागरिकांना आल्याशिवाय रहाणार नाही. मागील पाच वर्षात राष्ट्रवादी विरोधी बाकावर होती. तेव्हा जि.प. सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे कक्ष बांधकामातील अनियमितता चव्हाट्यावर आणली होती. निविदा न काढताच कामे पूर्ण केल्याचा प्रकार घडला होता. हा प्रश्न आजही कायम आहे. त्यामुळे विद्यमान सत्ताधाऱ्यांना याचाही विचार करावा लागणार आहे.(प्रतिनिधी)