शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
3
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
4
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
5
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
6
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
7
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
8
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
9
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
10
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
11
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
12
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
13
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
14
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
15
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
16
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
17
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
18
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
19
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
20
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला

प्रतीक्षा महासणांची, दसरा-दिवाळीसाठी बाजारपेठेत नवीन स्टॉक दाखल

By प्रशांत तेलवाडकर | Updated: September 20, 2022 18:20 IST

परराज्यात खरेदीला गेलेले व्यापारी परतीच्या वाटेवर

औरंगाबाद : दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त दसरा-दिवाळी सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या आधीपेक्षा यंदा २५ ते ३० टक्के व्यवसाय वाढेल, अशी व्यापाऱ्यांना आशा आहे. यामुळे बाजारपेठेत मोठी लगबग सुरू आहे. विविध सामान खरेदीसाठी परराज्यात गेलेले व्यापारी आता परतीच्या मार्गावर असून, नवीन स्टॉक बाजारात दाखल होऊ लागला आहे. कोट्यवधींची उलाढाल येत्या काळात होणार असल्याने ग्राहकराजाच्या स्वागतासाठी दुकाने सजू लागली आहेत.

वर्षभरातील निम्मी उलाढाल फक्त दसरा-दिवाळी दरम्यान होत असते. यामुळे सर्व व्यावसायिक व उद्योगाच्या नजरा या दोन महासणांवर टिकून असतात. यात विशेषत: कापड बाजार, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स, मोबाईल, भेटवस्तू, किराणा बाजार, मिठाई उद्योग, भांडी बाजार, वाहन बाजारात मोठी उलाढाल होते. सणासुदीत नवीन कपडे खरेदीला प्राधान्य दिले जाते. नवीन डिझाईनच्या कपडे, साडी खरेदीसाठी व्यापारी मुंबई, इंदोर, सूरत, कोलकत्ता इ. ठिकाणी गेले होते, अशी माहिती व्यापारी अजय तलरेजा यांनी दिली.

इलेक्ट्रॉनिक्स बाजारात दसरा- दिवाळी दरम्यान जिल्ह्यात १२ हजार टीव्ही विकतील, असा अंदाज संघटनेचे माजी अध्यक्ष अरुण जाधव यांनी वर्तवला. यातही ४३ इंच, ५० इंच, ५५ इंच व ६५ इंचांचे टीव्ही जास्त विकतील. फुल एचडी, फोर के व गुगल या एलईडी टीव्हीला डिमांड राहणार आहे.

याशिवाय वाहन बाजारातही नवीन दुचाकी उपलब्ध झाल्या आहेत. प्रतीक्षायादी नाही. यामुळे यंदा दसरा -दिवाळी दरम्यान ४ हजार दुचाकी विक्री होतील, अशी शक्यता वितरक हेमंत खिंवसरा यांनी व्यक्त केली. मोबाईलमध्येही नवनवीन मॉडेल लाँच होत आहेत. फाईव्ह जी मॉडेलची सध्या चलती आहे.

एक हजार कोटींची होणार उलाढालबाजारपेठेत दसऱ्याच्या नवीन स्टॉकची पहिली व दुसरी खेप दाखल झाली आहे. काहींनी दुकानाला नवीन फर्निचर, रंगरंगोटी केली आहे. कोणत्याही वस्तूंचा तुटवडा जाणवणार नाही. मुबलक स्टॉक आला असून बाजारपेठेत दसरा-दिवाळीदरम्यान सुमारे एक हजार कोटींची उलाढाल होईल.- विजय जैस्वाल, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ

२५ टक्के अधिक मालवाहतूकपुणे, मुंबई, सूरत येथून मालवाहतूक होत आहे. नेहमीपेक्षा २० ते २५ टक्के मालवाहतूक वाढली आहे. काही मालवाहतूकदारांच्या गोदामात माल ठेवण्यासाठी जागा नाही, अशी परिस्थिती आहे.- फय्याज खान, अध्यक्ष, मालवाहतूकदार संघटना

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजार