शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

जलवाहिनीचे काम मंदावले, चौपदरीकरण ठप्प; पैठणला जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांना लागले ३ तास

By विकास राऊत | Updated: March 21, 2024 12:27 IST

एनएचएआय आणि एमजेपी यांचे दुर्लक्ष असल्यामुळे या दोन्ही कामांचा सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याची कैफियत बुधवारी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली.

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण आणि नाथषष्ठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना पैठणला पोहोचण्यासाठी तीन तास लागले. या रस्त्यावरील नवीन जलवाहिनी आणि रस्ता रुंदीकरणाचे चौपदरीकरणाचे काम मनमानीपणे सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

एनएचएआय आणि एमजेपी यांचे दुर्लक्ष असल्यामुळे या दोन्ही कामांचा सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याची कैफियत बुधवारी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली. जलवाहिनी आणि रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांनी स्पॉटवर बोलावून घेतले. त्या प्रतिनिधींना खडे बोल सुनावले. दोन दिवसांत कामात सुधारणा न झाल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिला.

पैठण येेथे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा ताफा सकाळी छत्रपती संभाजीनगरवरून पैठणकडे निघाला. पैठण रस्त्यालगत शहर पाणीपुरवठा योजनेच्या नवीन जलवाहिनीचे आणि छत्रपती संभाजीनगर ते पैठण या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सोबतच सुरू असल्याचे त्यांनी पाहिले. रस्त्याच्या कामासाठी वळण असल्याचे फलक नाहीत. जलवाहिनीसाठी कुठेही खड्डे खोदलेले आहेत. हा सगळा प्रकार जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिला. हे काम करताना काेणतेही नियोजन नसल्याचेही निदर्शनास आले. शहर पाणीपुरवठा योजनेचे जलवाहिनीचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे, तर पैठण रस्ता रुंदीकरणासाठी जागोजागी खोदून ठेवला आहे. दोन्ही बाजूने रस्ता खोदून ठेवल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. कोणत्याच ठिकाणी वाहतूक सुरळीत करताना पोलिस नाहीत, कंत्राटदाराचे कर्मचारी नाहीत. रस्त्यावर धुळीचे साम्राज्य असून, त्यामुळे दुचाकी, तीनचाकीतून जाणाऱ्यांचे हाल होत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

अपघात, जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार रोजरस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अवजड वाहतूक बेशिस्त झालेली आहे, तसेच खोदकामामुळे जलवाहिन्या फुटत आहेत. दोन दिवसांपूर्वी जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले, तसेच रस्त्याच्या कामामुळे डायव्हर्जन न दिल्यामुळे रोज अपघात होत आहेत. या सगळ्या प्रकाराकडे कोण पाहणार, असा प्रश्न आहे.

गुन्हा दाखल करण्याचा इशारापुढील आठवड्यात पैठण येथे नाथषष्ठीचा उत्सव असून, लाखो भाविक या रस्त्यावरून ये-जा करणार आहेत. त्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हाधिकारी स्वामी यांनी जलवाहिनी आणि रस्ता रस्ता रुंदीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार आणि एनएचएआयच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. दोन दिवसांत दोन्ही कामांमध्ये सुधारणा दिसून न आल्यास नागरिक, भाविकांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरवून विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिला.

जलवाहिनीच्या कामामुळे मंदावली गतीशहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या चौपदरीकरणाचे कामही मंदावले आहे. जलवाहिनीचे काम होत नाही तोवर रस्त्याच्या कामाला गती मिळणार नाही.-रवींद्र इंगोले, प्रकल्प संचालक, एनएचएआय

कोण करीत आहे कामजलवाहिनीचे काम : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) मार्फत जीव्हीपीआर ही कंत्राटदार संस्था करीत आहे. २७८० कोटींची ही योजना आहे. २९ कि.मी. पर्यंत मुख्य जलवाहिनीचे काम झाले आहे. रस्त्याचे काम: नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियामार्फत सेठी कंत्राटदार संस्था रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम करीत आहे. २७० कोटींचा हा प्रकल्प असून, ३० टक्केही काम पूर्ण झालेले नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद