शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीचे काम मंदावले, चौपदरीकरण ठप्प; पैठणला जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांना लागले ३ तास

By विकास राऊत | Updated: March 21, 2024 12:27 IST

एनएचएआय आणि एमजेपी यांचे दुर्लक्ष असल्यामुळे या दोन्ही कामांचा सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याची कैफियत बुधवारी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली.

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण आणि नाथषष्ठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना पैठणला पोहोचण्यासाठी तीन तास लागले. या रस्त्यावरील नवीन जलवाहिनी आणि रस्ता रुंदीकरणाचे चौपदरीकरणाचे काम मनमानीपणे सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

एनएचएआय आणि एमजेपी यांचे दुर्लक्ष असल्यामुळे या दोन्ही कामांचा सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याची कैफियत बुधवारी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली. जलवाहिनी आणि रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांनी स्पॉटवर बोलावून घेतले. त्या प्रतिनिधींना खडे बोल सुनावले. दोन दिवसांत कामात सुधारणा न झाल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिला.

पैठण येेथे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा ताफा सकाळी छत्रपती संभाजीनगरवरून पैठणकडे निघाला. पैठण रस्त्यालगत शहर पाणीपुरवठा योजनेच्या नवीन जलवाहिनीचे आणि छत्रपती संभाजीनगर ते पैठण या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सोबतच सुरू असल्याचे त्यांनी पाहिले. रस्त्याच्या कामासाठी वळण असल्याचे फलक नाहीत. जलवाहिनीसाठी कुठेही खड्डे खोदलेले आहेत. हा सगळा प्रकार जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिला. हे काम करताना काेणतेही नियोजन नसल्याचेही निदर्शनास आले. शहर पाणीपुरवठा योजनेचे जलवाहिनीचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे, तर पैठण रस्ता रुंदीकरणासाठी जागोजागी खोदून ठेवला आहे. दोन्ही बाजूने रस्ता खोदून ठेवल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. कोणत्याच ठिकाणी वाहतूक सुरळीत करताना पोलिस नाहीत, कंत्राटदाराचे कर्मचारी नाहीत. रस्त्यावर धुळीचे साम्राज्य असून, त्यामुळे दुचाकी, तीनचाकीतून जाणाऱ्यांचे हाल होत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

अपघात, जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार रोजरस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अवजड वाहतूक बेशिस्त झालेली आहे, तसेच खोदकामामुळे जलवाहिन्या फुटत आहेत. दोन दिवसांपूर्वी जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले, तसेच रस्त्याच्या कामामुळे डायव्हर्जन न दिल्यामुळे रोज अपघात होत आहेत. या सगळ्या प्रकाराकडे कोण पाहणार, असा प्रश्न आहे.

गुन्हा दाखल करण्याचा इशारापुढील आठवड्यात पैठण येथे नाथषष्ठीचा उत्सव असून, लाखो भाविक या रस्त्यावरून ये-जा करणार आहेत. त्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हाधिकारी स्वामी यांनी जलवाहिनी आणि रस्ता रस्ता रुंदीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार आणि एनएचएआयच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. दोन दिवसांत दोन्ही कामांमध्ये सुधारणा दिसून न आल्यास नागरिक, भाविकांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरवून विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिला.

जलवाहिनीच्या कामामुळे मंदावली गतीशहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या चौपदरीकरणाचे कामही मंदावले आहे. जलवाहिनीचे काम होत नाही तोवर रस्त्याच्या कामाला गती मिळणार नाही.-रवींद्र इंगोले, प्रकल्प संचालक, एनएचएआय

कोण करीत आहे कामजलवाहिनीचे काम : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) मार्फत जीव्हीपीआर ही कंत्राटदार संस्था करीत आहे. २७८० कोटींची ही योजना आहे. २९ कि.मी. पर्यंत मुख्य जलवाहिनीचे काम झाले आहे. रस्त्याचे काम: नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियामार्फत सेठी कंत्राटदार संस्था रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम करीत आहे. २७० कोटींचा हा प्रकल्प असून, ३० टक्केही काम पूर्ण झालेले नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद