शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

स्वच्छतेचा नवा पॅटर्न! देवगिरी किल्ल्यावर प्लास्टिक बॉटल नेयची तर २० रुपये डिपॉझिट ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 12:23 IST

स्वच्छतेच्या स्तुत्य उपक्रमाचे काैतुक, गोवळकोंडा किल्ल्यातील स्वच्छतेचा पॅटर्न देवगिरी किल्ल्यावर

औरंगाबाद : पर्यटकांनी देवगिरी किल्ल्यावर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फेकू नयेत म्हणून गोवळकोंडा किल्ल्यावरच पॅटर्न भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणने गेल्या वर्षभरापूर्वी सुरू केला. पर्यटकांजवळ पाण्याची बाटली असेल तर त्यांच्याकडून सुरक्षा ठेव म्हणून २० रुपये घेतले जातात. किल्ला पाहून आल्यावर बाटली दाखवून ते २० रुपये परत घेतले जातात. हा उपक्रम यशस्वी होत असून किल्ल्यावरच्या खंदकातील कचऱ्याचे प्रमाण कमी झाल्याचे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले. तर या उपक्रमाचे सोशल मीडियावर काैतुकही होत आहे.

पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्मारकांच्या नावे समाजमाध्यमांवर पुरातत्त्व विभागाला टीकेचे धनी व्हावे लागते. मात्र देवगिरी किल्ल्यातील पाण्याच्या डिस्पोजल बाटली पर्यटकांना सोबत नेण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सुरक्षा ठेव योजनेचे सोशल मीडियाकर्मी काैतुक करत आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे अधीक्षक डाॅ. मिलन कुमार चावले हे हैदराबाद येथे कार्यरत असताना त्यांनी गोवळकाेंडा किल्ल्यावर स्वच्छतेसाठी त्यांनी पर्यटकांनी स्वच्छता पाळण्यासाठी डिस्पोजेबल वस्तू सोबत बाळगण्यासाठी सुरक्षा ठेवीची योजना राबवली. कालांतराने पर्यटकांकडून त्याला प्रतिसाद मिळत गेल्याने किल्ल्याच्या परिसरात स्वच्छतेला मदत झाली. खंदकातील कचरा बाहेर काढण्यात खूप अडचणी येतात. राज्यभरात किल्ल्यांवर असा उपक्रम राबवण्याची मागणी होत आहे.

लेणी, शाही हमामकडे जाण्यासाठी रस्ता करणे सुरूकिल्ल्याच्या परिसरातील लेण्यांतील मलबा हटवण्यात येत असून शाही हमामकडे जाण्यासाठी रस्ता केला जात आहे. वयोवृद्ध पर्यटक ज्यांना दाैलताबाद येथे आल्यावर किल्ला चढणे शक्य होत नाही. त्यांनाही इथे या वास्तू बघता येतील. पुढील सहा महिन्यांत हे काम पूर्ण होईल, असे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले.

कचरा कमी होण्यास मदत होईल वर्षभरापूर्वी डाॅ. मिलन कुमार चावले औरंगाबाद मंडळात रुजू झाल्यावर त्यांना खंदकात मोठ्या प्रमाणात पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फेकलेल्या दिसल्या. हा कचरा बाहेर काढण्यात खूप अडचणी आल्याने त्यांनी गोवळकोंडा पॅटर्न दाैलताबादला १८ मार्च २०२१ रोजी सुरू केला. त्यामुळे खंदकातील कचरा कमी होण्यास मदत झाली आहे, असे एस. बी. रोहणकर यांनी सांगितले.

टॅग्स :Doulatabad Fortदौलताबाद किल्लाAurangabadऔरंगाबादArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणtourismपर्यटन