शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

स्वच्छतेचा नवा पॅटर्न! देवगिरी किल्ल्यावर प्लास्टिक बॉटल नेयची तर २० रुपये डिपॉझिट ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 12:23 IST

स्वच्छतेच्या स्तुत्य उपक्रमाचे काैतुक, गोवळकोंडा किल्ल्यातील स्वच्छतेचा पॅटर्न देवगिरी किल्ल्यावर

औरंगाबाद : पर्यटकांनी देवगिरी किल्ल्यावर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फेकू नयेत म्हणून गोवळकोंडा किल्ल्यावरच पॅटर्न भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणने गेल्या वर्षभरापूर्वी सुरू केला. पर्यटकांजवळ पाण्याची बाटली असेल तर त्यांच्याकडून सुरक्षा ठेव म्हणून २० रुपये घेतले जातात. किल्ला पाहून आल्यावर बाटली दाखवून ते २० रुपये परत घेतले जातात. हा उपक्रम यशस्वी होत असून किल्ल्यावरच्या खंदकातील कचऱ्याचे प्रमाण कमी झाल्याचे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले. तर या उपक्रमाचे सोशल मीडियावर काैतुकही होत आहे.

पर्यटनस्थळे, ऐतिहासिक स्मारकांच्या नावे समाजमाध्यमांवर पुरातत्त्व विभागाला टीकेचे धनी व्हावे लागते. मात्र देवगिरी किल्ल्यातील पाण्याच्या डिस्पोजल बाटली पर्यटकांना सोबत नेण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सुरक्षा ठेव योजनेचे सोशल मीडियाकर्मी काैतुक करत आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणचे अधीक्षक डाॅ. मिलन कुमार चावले हे हैदराबाद येथे कार्यरत असताना त्यांनी गोवळकाेंडा किल्ल्यावर स्वच्छतेसाठी त्यांनी पर्यटकांनी स्वच्छता पाळण्यासाठी डिस्पोजेबल वस्तू सोबत बाळगण्यासाठी सुरक्षा ठेवीची योजना राबवली. कालांतराने पर्यटकांकडून त्याला प्रतिसाद मिळत गेल्याने किल्ल्याच्या परिसरात स्वच्छतेला मदत झाली. खंदकातील कचरा बाहेर काढण्यात खूप अडचणी येतात. राज्यभरात किल्ल्यांवर असा उपक्रम राबवण्याची मागणी होत आहे.

लेणी, शाही हमामकडे जाण्यासाठी रस्ता करणे सुरूकिल्ल्याच्या परिसरातील लेण्यांतील मलबा हटवण्यात येत असून शाही हमामकडे जाण्यासाठी रस्ता केला जात आहे. वयोवृद्ध पर्यटक ज्यांना दाैलताबाद येथे आल्यावर किल्ला चढणे शक्य होत नाही. त्यांनाही इथे या वास्तू बघता येतील. पुढील सहा महिन्यांत हे काम पूर्ण होईल, असे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले.

कचरा कमी होण्यास मदत होईल वर्षभरापूर्वी डाॅ. मिलन कुमार चावले औरंगाबाद मंडळात रुजू झाल्यावर त्यांना खंदकात मोठ्या प्रमाणात पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फेकलेल्या दिसल्या. हा कचरा बाहेर काढण्यात खूप अडचणी आल्याने त्यांनी गोवळकोंडा पॅटर्न दाैलताबादला १८ मार्च २०२१ रोजी सुरू केला. त्यामुळे खंदकातील कचरा कमी होण्यास मदत झाली आहे, असे एस. बी. रोहणकर यांनी सांगितले.

टॅग्स :Doulatabad Fortदौलताबाद किल्लाAurangabadऔरंगाबादArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणtourismपर्यटन