शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भल्या मोठ्या क्षेत्रातही नगण्य उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:55 IST

नेहमीच चर्चेत असलेल्या कृषी विभागाच्या बिजाराममध्ये दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने कमी उत्पन्न दाखविले जाते. या बीजगुणन केंद्रावर शासन लाखो रुपयांचा निधी खर्च करते. सर्व सुविधा असतानाही उत्पन्नात घट का व्हावी? याचा अजून तरी ताळमेळ लागलेला नाही. प्रत्येक वेळी विचारणा केली असता कमी उत्पन्न झाल्याचे तेवढे मात्र संबंधित यंत्रणा सांगते.

ठळक मुद्देशासनाचा खर्च पाण्यात : ...म्हणे निसर्गाच्या अवकृपेनेच होेतेय उत्पन्नात घट

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नेहमीच चर्चेत असलेल्या कृषी विभागाच्या बिजाराममध्ये दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने कमी उत्पन्न दाखविले जाते. या बीजगुणन केंद्रावर शासन लाखो रुपयांचा निधी खर्च करते. सर्व सुविधा असतानाही उत्पन्नात घट का व्हावी? याचा अजून तरी ताळमेळ लागलेला नाही. प्रत्येक वेळी विचारणा केली असता कमी उत्पन्न झाल्याचे तेवढे मात्र संबंधित यंत्रणा सांगते.हिंगोलीत बिजारामचे सर्वाधिक क्षेत्र आहे. यामध्ये एकूण पाच तालुका बीज गुणन केंद्र आहेत. यामध्ये बासंबा, औंढा नागनाथ तालुक्यात गोळेगाव, वसमत, कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर या गावांचा समावेश आहे. एकट्या बासंबा येथे ३५.५० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ ३ हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य नाही. उर्वरित जमिनीवर सोयाबीन, ज्वारी, मूग, उडिदाची पेरणी केली होती. यावर लाखो रुपयाचा खर्चही करण्यात आला होता. तर सोयाबीन ४० क्विंटलच झाल्याचे सांगण्यात आले. इतर पिकांच्या उत्पन्नाचा तर अजून ताळमेळच नाही. म्हणे, याहीवर्षी अल्प पर्जन्यमानामुळेच उत्पन्न कमी झाल्याची ओरड या विभागातून होत आहे. विशेष म्हणजे याच भागात असलेल्या शेतकºयांना सोयाबीन पिकाचा एकरी पाच ते सहा पोत्यांचा उतारा आलेला आहे. मात्र या यंत्रणेकडे सर्व सुविधासह आधुनिक यंत्रही उपलब्ध असली तरी नेहमीच निसर्गाचे कारण सांगत उत्पन्न कामी सांगण्याचा फंडा लावला आहे. सर्व सुविधा असल्याने तरी या क्षेत्रात उतारा चांगला येणे गरजेचा आहे. निदान शासनाचा भांडवली खर्च तरी भरुन निघण्यास मदत होईल. शिवाय सुरक्षारक्षकही क्षेत्रात उपलब्ध नसल्याने क्षेत्रातील ज्वारी किंवा आदी पिकांची गुरांकडून नुकसान अथवा चोरी केली असली तरीही अद्याप कोणतेच टोकाचे पाऊल न उचलता पायबंद घातलेला नाही. त्याचा फायदा घेऊन बिजाराममधील पिकांचे आतोनात नुकसान केले जात आहे. त्यातच नियुक्ती केलेले सुरक्षारक्षकही कधीतरी या भागात फेरफटका मारत असल्याने त्यांचाही कोणावर वचक राहिलेला नाही. ही स्थिती केवळ बासंबा परिसरातीच नव्हे, तर पाचही ठिकाणच्या केंद्रातील वास्तव चित्र आहे. त्यामुळे परिसरात उत्पन्नाची चांगलीच चर्चा रंगत आहे.