शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

भल्या मोठ्या क्षेत्रातही नगण्य उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:55 IST

नेहमीच चर्चेत असलेल्या कृषी विभागाच्या बिजाराममध्ये दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने कमी उत्पन्न दाखविले जाते. या बीजगुणन केंद्रावर शासन लाखो रुपयांचा निधी खर्च करते. सर्व सुविधा असतानाही उत्पन्नात घट का व्हावी? याचा अजून तरी ताळमेळ लागलेला नाही. प्रत्येक वेळी विचारणा केली असता कमी उत्पन्न झाल्याचे तेवढे मात्र संबंधित यंत्रणा सांगते.

ठळक मुद्देशासनाचा खर्च पाण्यात : ...म्हणे निसर्गाच्या अवकृपेनेच होेतेय उत्पन्नात घट

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नेहमीच चर्चेत असलेल्या कृषी विभागाच्या बिजाराममध्ये दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने कमी उत्पन्न दाखविले जाते. या बीजगुणन केंद्रावर शासन लाखो रुपयांचा निधी खर्च करते. सर्व सुविधा असतानाही उत्पन्नात घट का व्हावी? याचा अजून तरी ताळमेळ लागलेला नाही. प्रत्येक वेळी विचारणा केली असता कमी उत्पन्न झाल्याचे तेवढे मात्र संबंधित यंत्रणा सांगते.हिंगोलीत बिजारामचे सर्वाधिक क्षेत्र आहे. यामध्ये एकूण पाच तालुका बीज गुणन केंद्र आहेत. यामध्ये बासंबा, औंढा नागनाथ तालुक्यात गोळेगाव, वसमत, कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर या गावांचा समावेश आहे. एकट्या बासंबा येथे ३५.५० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ ३ हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य नाही. उर्वरित जमिनीवर सोयाबीन, ज्वारी, मूग, उडिदाची पेरणी केली होती. यावर लाखो रुपयाचा खर्चही करण्यात आला होता. तर सोयाबीन ४० क्विंटलच झाल्याचे सांगण्यात आले. इतर पिकांच्या उत्पन्नाचा तर अजून ताळमेळच नाही. म्हणे, याहीवर्षी अल्प पर्जन्यमानामुळेच उत्पन्न कमी झाल्याची ओरड या विभागातून होत आहे. विशेष म्हणजे याच भागात असलेल्या शेतकºयांना सोयाबीन पिकाचा एकरी पाच ते सहा पोत्यांचा उतारा आलेला आहे. मात्र या यंत्रणेकडे सर्व सुविधासह आधुनिक यंत्रही उपलब्ध असली तरी नेहमीच निसर्गाचे कारण सांगत उत्पन्न कामी सांगण्याचा फंडा लावला आहे. सर्व सुविधा असल्याने तरी या क्षेत्रात उतारा चांगला येणे गरजेचा आहे. निदान शासनाचा भांडवली खर्च तरी भरुन निघण्यास मदत होईल. शिवाय सुरक्षारक्षकही क्षेत्रात उपलब्ध नसल्याने क्षेत्रातील ज्वारी किंवा आदी पिकांची गुरांकडून नुकसान अथवा चोरी केली असली तरीही अद्याप कोणतेच टोकाचे पाऊल न उचलता पायबंद घातलेला नाही. त्याचा फायदा घेऊन बिजाराममधील पिकांचे आतोनात नुकसान केले जात आहे. त्यातच नियुक्ती केलेले सुरक्षारक्षकही कधीतरी या भागात फेरफटका मारत असल्याने त्यांचाही कोणावर वचक राहिलेला नाही. ही स्थिती केवळ बासंबा परिसरातीच नव्हे, तर पाचही ठिकाणच्या केंद्रातील वास्तव चित्र आहे. त्यामुळे परिसरात उत्पन्नाची चांगलीच चर्चा रंगत आहे.