शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भल्या मोठ्या क्षेत्रातही नगण्य उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:55 IST

नेहमीच चर्चेत असलेल्या कृषी विभागाच्या बिजाराममध्ये दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने कमी उत्पन्न दाखविले जाते. या बीजगुणन केंद्रावर शासन लाखो रुपयांचा निधी खर्च करते. सर्व सुविधा असतानाही उत्पन्नात घट का व्हावी? याचा अजून तरी ताळमेळ लागलेला नाही. प्रत्येक वेळी विचारणा केली असता कमी उत्पन्न झाल्याचे तेवढे मात्र संबंधित यंत्रणा सांगते.

ठळक मुद्देशासनाचा खर्च पाण्यात : ...म्हणे निसर्गाच्या अवकृपेनेच होेतेय उत्पन्नात घट

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : नेहमीच चर्चेत असलेल्या कृषी विभागाच्या बिजाराममध्ये दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने कमी उत्पन्न दाखविले जाते. या बीजगुणन केंद्रावर शासन लाखो रुपयांचा निधी खर्च करते. सर्व सुविधा असतानाही उत्पन्नात घट का व्हावी? याचा अजून तरी ताळमेळ लागलेला नाही. प्रत्येक वेळी विचारणा केली असता कमी उत्पन्न झाल्याचे तेवढे मात्र संबंधित यंत्रणा सांगते.हिंगोलीत बिजारामचे सर्वाधिक क्षेत्र आहे. यामध्ये एकूण पाच तालुका बीज गुणन केंद्र आहेत. यामध्ये बासंबा, औंढा नागनाथ तालुक्यात गोळेगाव, वसमत, कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर या गावांचा समावेश आहे. एकट्या बासंबा येथे ३५.५० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ ३ हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य नाही. उर्वरित जमिनीवर सोयाबीन, ज्वारी, मूग, उडिदाची पेरणी केली होती. यावर लाखो रुपयाचा खर्चही करण्यात आला होता. तर सोयाबीन ४० क्विंटलच झाल्याचे सांगण्यात आले. इतर पिकांच्या उत्पन्नाचा तर अजून ताळमेळच नाही. म्हणे, याहीवर्षी अल्प पर्जन्यमानामुळेच उत्पन्न कमी झाल्याची ओरड या विभागातून होत आहे. विशेष म्हणजे याच भागात असलेल्या शेतकºयांना सोयाबीन पिकाचा एकरी पाच ते सहा पोत्यांचा उतारा आलेला आहे. मात्र या यंत्रणेकडे सर्व सुविधासह आधुनिक यंत्रही उपलब्ध असली तरी नेहमीच निसर्गाचे कारण सांगत उत्पन्न कामी सांगण्याचा फंडा लावला आहे. सर्व सुविधा असल्याने तरी या क्षेत्रात उतारा चांगला येणे गरजेचा आहे. निदान शासनाचा भांडवली खर्च तरी भरुन निघण्यास मदत होईल. शिवाय सुरक्षारक्षकही क्षेत्रात उपलब्ध नसल्याने क्षेत्रातील ज्वारी किंवा आदी पिकांची गुरांकडून नुकसान अथवा चोरी केली असली तरीही अद्याप कोणतेच टोकाचे पाऊल न उचलता पायबंद घातलेला नाही. त्याचा फायदा घेऊन बिजाराममधील पिकांचे आतोनात नुकसान केले जात आहे. त्यातच नियुक्ती केलेले सुरक्षारक्षकही कधीतरी या भागात फेरफटका मारत असल्याने त्यांचाही कोणावर वचक राहिलेला नाही. ही स्थिती केवळ बासंबा परिसरातीच नव्हे, तर पाचही ठिकाणच्या केंद्रातील वास्तव चित्र आहे. त्यामुळे परिसरात उत्पन्नाची चांगलीच चर्चा रंगत आहे.