शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

गांधी विचारांची जगाला गरज : तुषार गांधी

By admin | Updated: February 5, 2017 23:18 IST

लातूर : मान-सन्मानाचा वाद समाजात सतत वाढतो आहे. प्रसंगी भांडणे होतात. पण बापूंचे तेंव्हाच्या नेत्यांशी वाद असले तरी भांडणे नसत.

लातूर : मान-सन्मानाचा वाद समाजात सतत वाढतो आहे. प्रसंगी भांडणे होतात. पण बापूंचे तेंव्हाच्या नेत्यांशी वाद असले तरी भांडणे नसत. द्वेष, मत्सर त्यांच्या ठायीच नव्हता. बापू अशा हिंसक वादापासून चारहात दूरच होते. इतरांना प्रेम-सौहार्द देण्यातच ते धन्यता मानत. ते अहिंसावादी होते, गांधी विचार जपला जावा. गांधी विचारांची आज देशाला नव्हे जगाला गरज आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी येथे केले. स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने आयोजित ‘लेट अस किल गांधी’ या विषयावर ‘दयानंद’च्या सभागृहात व्याख्यान देताना रविवारी ते बोलत होते. मंचावर व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीनिवास लाहोटी, सुमती जगताप यांची उपस्थिती होती. तुषार गांधी म्हणाले, द्वेष मनातून जात नाही. गांधी हत्येच्या रुपाने तो समोर आला आहे. महात्मा गांधींना मारण्याचा पूर्वनियोजित कट होता. महात्मा गांधींची हत्या झाली असली, तरी गांधी विचाराची हत्या होऊ शकत नाही. कारण गांधी विचारात अहिंसेची ताकद आहे. बापूंचा हा विचार तरुण पिढीसमोर आणण्याची गरज आहे. मोहनदास करमचंद गांधी हा विषय केवळ पुस्तकापुरता मर्यादित नाही. गांधी कधी मारले जातात तर कधी जिवंत केले जातात. परंतु, सकारात्मक भावनेचा विचार अंगी बाळगून गांधी विचार जिवंत राहणे आवश्यक आहे. नेपोलियनच्या शब्दकोषात ‘अशक्य’ हा शब्द जसा नव्हता, तसा महात्मा गांधींच्या शब्दकोषात ‘सूड’ हा शब्द नव्हता. त्यामुळे शांततेच्या मार्गावरील गांधी विचार नव्याने कसा मांडता येईल, याचा विचार झाला पाहिजे. व्यक्तीपूजा ही महात्मा गांधींनाही मान्य नव्हती. म्हणूनच गांधी मरत नाहीत, त्यांना परत परत मारले जाते ही खरी शोकांतिका असल्याचे तुषार गांधी म्हणाले. व्याख्यानाला श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आमदार अमित देशमुख, माजी आ. पाशा पटेल, अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, अतुल देऊळगावकर आदींची यावेळी उपस्थिती होती. (प्रतिनिधी)