शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

गांधी विचारांची जगाला गरज : तुषार गांधी

By admin | Updated: February 5, 2017 23:18 IST

लातूर : मान-सन्मानाचा वाद समाजात सतत वाढतो आहे. प्रसंगी भांडणे होतात. पण बापूंचे तेंव्हाच्या नेत्यांशी वाद असले तरी भांडणे नसत.

लातूर : मान-सन्मानाचा वाद समाजात सतत वाढतो आहे. प्रसंगी भांडणे होतात. पण बापूंचे तेंव्हाच्या नेत्यांशी वाद असले तरी भांडणे नसत. द्वेष, मत्सर त्यांच्या ठायीच नव्हता. बापू अशा हिंसक वादापासून चारहात दूरच होते. इतरांना प्रेम-सौहार्द देण्यातच ते धन्यता मानत. ते अहिंसावादी होते, गांधी विचार जपला जावा. गांधी विचारांची आज देशाला नव्हे जगाला गरज आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी येथे केले. स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने आयोजित ‘लेट अस किल गांधी’ या विषयावर ‘दयानंद’च्या सभागृहात व्याख्यान देताना रविवारी ते बोलत होते. मंचावर व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीनिवास लाहोटी, सुमती जगताप यांची उपस्थिती होती. तुषार गांधी म्हणाले, द्वेष मनातून जात नाही. गांधी हत्येच्या रुपाने तो समोर आला आहे. महात्मा गांधींना मारण्याचा पूर्वनियोजित कट होता. महात्मा गांधींची हत्या झाली असली, तरी गांधी विचाराची हत्या होऊ शकत नाही. कारण गांधी विचारात अहिंसेची ताकद आहे. बापूंचा हा विचार तरुण पिढीसमोर आणण्याची गरज आहे. मोहनदास करमचंद गांधी हा विषय केवळ पुस्तकापुरता मर्यादित नाही. गांधी कधी मारले जातात तर कधी जिवंत केले जातात. परंतु, सकारात्मक भावनेचा विचार अंगी बाळगून गांधी विचार जिवंत राहणे आवश्यक आहे. नेपोलियनच्या शब्दकोषात ‘अशक्य’ हा शब्द जसा नव्हता, तसा महात्मा गांधींच्या शब्दकोषात ‘सूड’ हा शब्द नव्हता. त्यामुळे शांततेच्या मार्गावरील गांधी विचार नव्याने कसा मांडता येईल, याचा विचार झाला पाहिजे. व्यक्तीपूजा ही महात्मा गांधींनाही मान्य नव्हती. म्हणूनच गांधी मरत नाहीत, त्यांना परत परत मारले जाते ही खरी शोकांतिका असल्याचे तुषार गांधी म्हणाले. व्याख्यानाला श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आमदार अमित देशमुख, माजी आ. पाशा पटेल, अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, अतुल देऊळगावकर आदींची यावेळी उपस्थिती होती. (प्रतिनिधी)