शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

कबड्डी खेळ जोपासण्याची गरज

By admin | Updated: July 15, 2014 00:48 IST

सतीश जोशी, परभणी परभणी जिल्ह्याचे कबड्डीमध्ये राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील कबड्डीच्या कार्यकर्ते, पंच, खेळाडू आणि प्रशिक्षकांनी

सतीश जोशी, परभणीपरभणी जिल्ह्याचे कबड्डीमध्ये राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील कबड्डीच्या कार्यकर्ते, पंच, खेळाडू आणि प्रशिक्षकांनी आपल्या कर्तृत्वाने राष्ट्रीयस्तरावर छाप टाकलीच नाही तर या जिल्ह्याने महाराष्ट्राला अनेक चांगले खेळाडू दिले. हा खेळ जोपासण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय खेळाडू तथा छत्रपती पुरस्कार विजेते मंगल पांडे यांनी व्यक्त केली.कबड्डी दिनाच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते. ते म्हणाले की, कबड्डीचे सर्वेसर्वा बुवा साळवी यांचा १५ जुलै हा जन्मदिवस कबड्डी दिन म्हणून साजरा होतो. किशोर आणि कुमार गटातील महाराष्ट्रातील उदयोन्मूख गुणवंत कबड्डीपटूंना ५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती या दिनाच्या निमित्ताने देण्यात येते. आता हे स्वरुप व्यापक होत असून कार्यकर्ते, पंच, जिल्हा यांना आता विविध पुरस्कार दिले जात आहेत. महाराष्ट्राची कबड्डी ही आता आंतराष्ट्रीयस्तरावर गेली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे खेळताना परभणी जिल्ह्यातील खेळाडूंनी अनेक विजेतेपद मिळवून दिले. किशोर गटात परभणीचा संघ दरवर्षी तृतीय येतो, कुमार गटात एकदा द्वितीय तर एकदा तृतीय आला. प्रा. चंद्रकांत सातपुते, गुलाब भिसे (कोल्हावाडी), भारत धनले (खेडूळा), माधव शिंदे (तरोडा), राजेश बोबडे (गोपा), दिलीप निर्मळे (धारासूर), प्रकाश हरगावकर (पाथरी), तुकाराम शिंदे (रामपुरी) यांनी ग्रामीण भागात कबड्डी जीवंत ठेवली. नवनाथ भालेराव, प्रा. माधव शेजूळ, यु. डी. इंगळे, ज्ञानेश्वर गिरी, आयुब पठाण, गोविंद अवचार, डिगांबर कापसे, डिगांबर जाधव, माणिक राठोड यांचेही जिल्ह्याच्या कबड्डी विकासात योगदान आहे. माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, डॉ. भीमराव निर्वळ, सुरेश जाधव, आर. टी. ढोबळे, प्रा. उद्धवराव सोळंके, श्रीमंत कदम, प्रसाद कुलकर्णी यांचेही सल्लागार म्हणून मार्गदर्शन लाभते. परभणी जिल्ह्याने आतापर्यंत ५० ते ६० राष्ट्रीय खेळाडू दिले आहेत. परभणीचे डिगांबर कापसे हे २००१ साली महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने विजेतेपद पटकाविले होते. थोडक्यात काय तर कार्यकर्ते, पंच, प्रशिक्षक, खेळाडू म्हणून भूमिका बजावताना परभणी जिल्ह्यास राज्य व राष्ट्रीयस्तरावर बहुमान प्राप्त करुन दिला, असेही मंगल पांडे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मंगल पांडे यांच्या रुपाने परभणी जिल्ह्यास पहिल्यांदाच खेळातील बहुमानाचा छत्रपती पुरस्कार मिळाला आहे. मंगल पांडे यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते, प्रशिक्षक, पंच, खेळाडूमुळे परभणी जिल्ह्याला बहुमान प्राप्त झाला.बुवा ऊर्फ शंकरराव साळवी यांचा जन्मदिवस हा १५ जुलै रोजी कबड्डीदिन म्हणून साजरा होतो. कबड्डीला आंतराष्ट्रीयस्तरावर नेण्यासाठी बुवांनी आयुष्यभर प्रयत्न केले. आज कबड्डी, खो-खो, कुस्ती या सारखे ग्रामीण खेळ जोपासण्याची गरज असून शासनाप्रमाणेच राजकीय नेते मंडळी, पक्षांनी देखील त्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. छत्रपती पुरस्कार विजेते मंगल पांडे यांच्याशी कबड्डी दिनानिमित्त केलेली बातचीत.