शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

साहित्य संमेलनातून परिवर्तननिष्ठ जाणिवा मांडण्याची गरज

By admin | Updated: January 1, 2017 23:47 IST

लातूर : अस्मितादर्श वाङ्मयीन चळवळीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत

लातूर : अस्मितादर्श वाङ्मयीन चळवळीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सृजनशील तत्वज्ञान वाङ्मयीन स्वरुपातून पुढे नेण्यासाठी ‘अस्मितादर्श’चा जन्म झाला आहे. परिवर्तननिष्ठ जाणिवा साहित्य संमेलनातून मांडणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी येथे रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. लातुरात १४ व १५ जानेवारी रोजी ३४ वे अस्मितादर्श साहित्य संमेलन होत आहे. त्यानिमित्त डॉ. पानतावणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, अस्मितादर्श साहित्य संमेलनात मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले जात नाहीत. सर्व कार्यक्रम बौद्धिक व वैचारिक स्वरुपाचे असतात. लेखक, वाचक संवाद, काव्य संमेलन, परिसंवाद, शोधनिबंध आदी कार्यक्रम या साहित्य संमेलनात होणार आहेत. ‘अस्मितादर्श’चे साहित्य संमेलन म्हणजे साहित्यिकांची कार्यशाळा आहे. पीडितांना बांधून ठेवणारी व्यवस्था, मनुषत्व नाकारणे यावर अस्मितादर्शच्या साहित्यिकांनी प्रहार केला. शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी आत्मविश्वास व नवीन जाणिवा तयार करणे हे अस्मितादर्श साहित्य संमेलनाचा मुख्य हेतू राहिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी तत्त्वज्ञानातून आलेल्या ‘अस्मितादर्श’ या वाङ्मयीन नियतकालिकाने मूल्याधिष्ठित साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात ऐतिहासिक कार्य केले आहे. आंबेडकरवादी साहित्याचा ध्येयवाद परजणाऱ्या अस्मितादर्शचे ३४ वे साहित्य संमेलन १४ व १५ जानेवारीला लातूरला होत असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. माधव गादेकर, स्वागताध्यक्ष जयप्रकाश दगडे, कार्याध्यक्ष प्रा. सुधीर अनवले, उपाध्यक्ष प्रा. हर्षवर्धन कोल्हापुरे, कार्यवाह डॉ. अशोक नारनवरे, कोषाध्यक्ष प्रा. युवराज धसवाडीकर, राजेंद्र लातूरकर, डॉ. विजय अजनीकर आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)