शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

संपूर्ण मानवजातीला शांतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : मानवाने मागील काही वर्षांमध्ये अशक्यप्राय अशी क्रांती संशोधनाच्या माध्यमातून घडवून आणली आहे. या क्रांतीसोबत ...

ठळक मुद्देअजीज मोईनोद्दीन : जमात-ए-इस्लामी हिंदच्या अभियानाचा शहरातून शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मानवाने मागील काही वर्षांमध्ये अशक्यप्राय अशी क्रांती संशोधनाच्या माध्यमातून घडवून आणली आहे. या क्रांतीसोबत मानवाला शांतीची खूप गरज आहे. कोट्यवधी रुपये खर्च केले तरी शांती मिळायला तयार नाही. इस्लाम धर्माचे अत्यंत बारकाईने अध्ययन केल्यास शांतीचा मार्ग सापडेल, असे मत जमात-ए-इस्लामी हिंदचे अजीज मोईनोद्दीन यांनी व्यक्त केले.जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे १२ जानेवारीपासून ‘शांती, प्रगती व मुक्तीसाठी इस्लाम’ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेता विकास जैन, जे. के.जाधव, पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, लेखक डॉ. इक्राम अहेमद, डॉ. शादाब मुसा, इलियास खान फलाही, इम्रान अहेमद खान आदींची उपस्थिती होती. यावेळी अजीज मोईनोद्दीन पुढे म्हणाले की, जगभरात अशांतता पसरली आहे. मानवाने सुख-सोयीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला. अशक्यप्राय गोष्टी आता मानव काही सेकंदात करू शकतो. विज्ञानाच्या देणगीनंतरही त्याला शांती मिळायला तयार नाही. शांतीसाठी तो कोट्यवधी रुपये खर्च करायला तयार आहे. खरी शांती हवी असेल, तर एकदा इस्लामचे बारकाईने अध्ययन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.विज्ञानात गरुडझेप घेणाºया मानवाच्या चारित्र्य संवर्धनाचा आलेख शून्यावर आला आहे. वर्तमानपत्र उघडल्यावर समाजात जिकडे-तिकडे अराजकता पसरल्याचे दिसून येते. माणूस दिवसेंदिवस क्रूर होत चालला असल्याचे जाणवत आहेत. आज संपूर्ण मानवजातीला शांततेची गरज आहे. यासाठी सर्वांनी मिळून समाजातील वाईट प्रवृत्तींचा नायनाट करायला हवा, असे डॉ. इक्राम अहेमद यांनी नमूद केले. कार्यक्रमाची सुरुवात मुनाफ शाह यांनी चरित्र धर्मग्रंथाच्या पठणाने केली. प्रास्ताविक अफसर शेख यांनी केले. यावेळी देवसिंग पवार, सुनील वाघ उपस्थित होते. इलियास फलाही यांनी दुआ केली. आभार जव्वाद कादरी यांनी मानले.