शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

गरज एक लाख ५० हजार डोसची; मिळाले १९ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस मिळावा म्हणून जवळपास एक लाख ५० हजार नागरिक प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत ...

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस मिळावा म्हणून जवळपास एक लाख ५० हजार नागरिक प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत १०० ते १२५ दिवस उलटले तरी अनेकांना लस मिळालेली नाही. दरम्यान, बुधवारी मध्यरात्री औरंगाबाद जिल्ह्याला फक्त १९ हजार लसींचा साठा देण्यात आला. त्यातील सात हजार महापालिकेच्या वाट्याला, तर १२ हजार ग्रामीणसाठी वितरित करण्यात आल्या. शहरात हा साठा अवघ्या तासाभरातच संपणार आहे.

मागील दोन ते अडीच महिन्यांपासून लसीचा तुटवडा भासत आहे. केंद्र शासनाकडून अत्यंत कमी प्रमाणात डोस देण्यात येत आहेत. शहरी भागात पाच दिवसांपासून लसीकरण बंद होते. दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची संख्या तब्बल ८२ हजारांपर्यंत पोहोचली आहे. प्रतीक्षा यादी वाढत असल्याने महापालिकेने साठा मुबलक प्रमाणात द्यावा, अशी मागणी शासनाकडे केली होती. मात्र, प्रत्यक्षात बुधवारी रात्री १० वाजता सात हजार लसींचा साठा देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण भागातही प्रतीक्षा यादी जवळपास ७० हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्यांना १२ हजार डोस देण्यात आले. अवघ्या दोनच दिवसांत हे डोस संपतील. त्यानंतर लसचा पुन्हा तुटवडा भासणार हे निश्चित.

असा रंगला लसींचा खेळ

मंगळवारी आरोग्य उपसंचालक कार्यालयाचा मोठा ट्रक पुण्याला लस आणण्यासाठी रवाना करण्यात आला. बुधवारी सायंकाळी औरंगाबाद जिल्ह्यासाठी शासनाकडून साठा देण्यात आला. मात्र, औरंगाबाद शहराला किती डोस मिळाले, ग्रामीणसाठी किती याचा आकडा रात्री उशिरापर्यंत लपवून ठेवण्यात आला. महापालिका, जिल्हा प्रशासनालाही आकडा कळविण्यात येत नव्हता. महापालिकेला मध्यरात्री आकडा सांगण्यात आला.

महापालिका करणार शासनाकडे तक्रार

मध्यरात्री २ ते ३ वाजता महापालिकेला तुटपुंज्या स्वरूपात साठा देण्यात येतो. लस किती येणार हे अगोदरच सांगितले तर मनपाला दुसऱ्या दिवशी किती ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करायचे, याचे नियोजन करता येते. आरोग्य उपसंचालक कार्यालयातील अधिकारी आकडा लपवून ठेवतात. त्यामुळे मनपाला दुसऱ्या दिवशी नियोजन करताना अडचणी निर्माण होत आहेत. यासंदर्भात थेट शासनाकडेच मनपा तक्रार करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.