शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गरज एक लाख ५० हजार डोसची; मिळाले १९ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस मिळावा म्हणून जवळपास एक लाख ५० हजार नागरिक प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत ...

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस मिळावा म्हणून जवळपास एक लाख ५० हजार नागरिक प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत १०० ते १२५ दिवस उलटले तरी अनेकांना लस मिळालेली नाही. दरम्यान, बुधवारी मध्यरात्री औरंगाबाद जिल्ह्याला फक्त १९ हजार लसींचा साठा देण्यात आला. त्यातील सात हजार महापालिकेच्या वाट्याला, तर १२ हजार ग्रामीणसाठी वितरित करण्यात आल्या. शहरात हा साठा अवघ्या तासाभरातच संपणार आहे.

मागील दोन ते अडीच महिन्यांपासून लसीचा तुटवडा भासत आहे. केंद्र शासनाकडून अत्यंत कमी प्रमाणात डोस देण्यात येत आहेत. शहरी भागात पाच दिवसांपासून लसीकरण बंद होते. दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची संख्या तब्बल ८२ हजारांपर्यंत पोहोचली आहे. प्रतीक्षा यादी वाढत असल्याने महापालिकेने साठा मुबलक प्रमाणात द्यावा, अशी मागणी शासनाकडे केली होती. मात्र, प्रत्यक्षात बुधवारी रात्री १० वाजता सात हजार लसींचा साठा देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण भागातही प्रतीक्षा यादी जवळपास ७० हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्यांना १२ हजार डोस देण्यात आले. अवघ्या दोनच दिवसांत हे डोस संपतील. त्यानंतर लसचा पुन्हा तुटवडा भासणार हे निश्चित.

असा रंगला लसींचा खेळ

मंगळवारी आरोग्य उपसंचालक कार्यालयाचा मोठा ट्रक पुण्याला लस आणण्यासाठी रवाना करण्यात आला. बुधवारी सायंकाळी औरंगाबाद जिल्ह्यासाठी शासनाकडून साठा देण्यात आला. मात्र, औरंगाबाद शहराला किती डोस मिळाले, ग्रामीणसाठी किती याचा आकडा रात्री उशिरापर्यंत लपवून ठेवण्यात आला. महापालिका, जिल्हा प्रशासनालाही आकडा कळविण्यात येत नव्हता. महापालिकेला मध्यरात्री आकडा सांगण्यात आला.

महापालिका करणार शासनाकडे तक्रार

मध्यरात्री २ ते ३ वाजता महापालिकेला तुटपुंज्या स्वरूपात साठा देण्यात येतो. लस किती येणार हे अगोदरच सांगितले तर मनपाला दुसऱ्या दिवशी किती ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करायचे, याचे नियोजन करता येते. आरोग्य उपसंचालक कार्यालयातील अधिकारी आकडा लपवून ठेवतात. त्यामुळे मनपाला दुसऱ्या दिवशी नियोजन करताना अडचणी निर्माण होत आहेत. यासंदर्भात थेट शासनाकडेच मनपा तक्रार करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.