शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
6
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
7
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
8
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
9
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
10
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
11
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
12
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
13
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
14
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
15
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
16
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
17
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
18
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
19
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
20
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?

सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 03:37 IST

ईव्हीएम मशीनमध्ये नक्की घोटाळा झाला आहे.

औरंगाबाद : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह मनसे, वंचित बहुजन आघाडी आदी सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. ते पत्रकारांशी बोलत होते. लवकरच आपण वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभेच्या १५ ते २० जागा लढविण्यास उत्सुक आहे. मी स्वत: विधानसभेची निवडणूक लढवावी की नाही, याचा निर्णय घेतलेला नाही, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

ईव्हीएम मशीनमध्ये नक्की घोटाळा झाला आहे. आम्ही दिलेले मत योग्य ठिकाणी जात नाही, हे वारंवार सिद्ध होत चाललेय; पण ना निवडणूक आयोग हे लक्षात घ्यायला तयार आहे ना सर्वोच्च न्यायालय. दोघांनीही आमच्यासह २२ पक्षांचे म्हणणे फेटाळले आहे, याकडे लक्ष वेधत राजू शेट्टी यांनी सांगितले की, मी भाजपची साथ सोडली याचा मला जराही पश्चात्ताप नाही. कारण हे सरकार शेतकरीविरोधी आहे, याबद्दल वादच नाही. यांच्याच काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुपटीने वाढल्या. कधी नव्हे एवढा कृषी खात्याचा जीडीपी ३ टक्क्यांपेक्षा खाली गेला, असेही ते यावेळी म्हणाले.

...तर बेमुदत घेरावमाझा पिंड विरोधी पक्षाचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य माणसांसाठी मी संघर्ष करीतच राहणार! सुरुवातीला भाजपशी दोस्ती करून पाहिली. कुंभाराने मडके घडवले; पण ते एवढे कच्चे निघेल, हे त्याला काय माहीत, असा टोला सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता शेट्टी यांनी मारला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीElectionनिवडणूक