शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
3
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
4
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
5
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
6
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
7
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
8
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
9
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
10
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
11
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
12
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
13
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
15
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
16
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
17
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
18
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
19
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
20
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!

मानसिकता बदलण्याची गरज..

By admin | Updated: November 30, 2015 23:29 IST

जालना : संपूर्ण जिल्ह्यातील गावे पाणंदमुक्त करण्यासाठी सरपंचांसोबतच ग्रामस्थांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे

जालना : संपूर्ण जिल्ह्यातील गावे पाणंदमुक्त करण्यासाठी सरपंचांसोबतच ग्रामस्थांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे मत पाटोदा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भास्कर पेरे यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदच्या वतीने हगणदारी मुक्त गाव करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, उपाध्यक्ष अनिरूध्द खोतकर, अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, समाजकल्याण सभापती शहाजी राक्षे, दगडवाडीच्या सरपंच आशाताई पांडे आदींची उपस्थिती होती. पेरे म्हणाले, गावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता वाढल्यानेच विविध आजार वाढले आहेत. गावाच्या सरपंचाने जर ठरविले संपूर्ण गाव हगणदारी मुक्त करणार तर ते होऊ शकते. त्यासाठी पहिल्यांदा सरपंचाने आपला सरपंचपणाची झूल अंगावरून उतरवून जास्तीस जास्ती नागरिकांशी संवाद साधून त्यांना हगणदारीमुक्तचे महत्व पटवून द्यावे.गावे हगणदारीमुक्त करणे हे फार अवघड काम आहे. त्यासाठी खूप परिश्रम घेण्याची गरज आहे.माझ्या गावात अडाणी बायकांनी कर्ज काढून त्यावेळ चार हजार रूपयात संडास बांधला आत्ता शासन १२ हजार रूपये देऊनही शौचालय बांधले जात नसल्याची खंत पेरे यांनी व्यक्त केली.सरपंचांनी पक्षभेदाभेद सोडून सर्वांना सोबत घेऊन गावात विकास करणे गरजचे आहे.यावेळी खासगावचे सरपंच संतोष लोखंडे यांनीही गावात केलेल्या विकासाबद्दल उपस्थित सरपंचाना मार्गदर्शन केले. यावेळी जि. प. उपाध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर महिला सरपंच निवडून आल्या आहेत. त्यांच्या पतींनी त्यांना सरपंच म्हणून वावरण्यासाठी मुभा देण्याची गरज आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी स्वच्छ भारतची संकल्पना पटवून सांगितली.जिल्ह्यातील गावांना हगणदारीमुक्त करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे चौधरी म्हणाले. जि.प. अध्यक्ष जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हातील १३८ गावांचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आदींसह जि.प. सदस्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)