शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

मानसिकता बदलण्याची गरज..

By admin | Updated: November 30, 2015 23:29 IST

जालना : संपूर्ण जिल्ह्यातील गावे पाणंदमुक्त करण्यासाठी सरपंचांसोबतच ग्रामस्थांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे

जालना : संपूर्ण जिल्ह्यातील गावे पाणंदमुक्त करण्यासाठी सरपंचांसोबतच ग्रामस्थांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे मत पाटोदा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भास्कर पेरे यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदच्या वतीने हगणदारी मुक्त गाव करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, उपाध्यक्ष अनिरूध्द खोतकर, अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, समाजकल्याण सभापती शहाजी राक्षे, दगडवाडीच्या सरपंच आशाताई पांडे आदींची उपस्थिती होती. पेरे म्हणाले, गावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता वाढल्यानेच विविध आजार वाढले आहेत. गावाच्या सरपंचाने जर ठरविले संपूर्ण गाव हगणदारी मुक्त करणार तर ते होऊ शकते. त्यासाठी पहिल्यांदा सरपंचाने आपला सरपंचपणाची झूल अंगावरून उतरवून जास्तीस जास्ती नागरिकांशी संवाद साधून त्यांना हगणदारीमुक्तचे महत्व पटवून द्यावे.गावे हगणदारीमुक्त करणे हे फार अवघड काम आहे. त्यासाठी खूप परिश्रम घेण्याची गरज आहे.माझ्या गावात अडाणी बायकांनी कर्ज काढून त्यावेळ चार हजार रूपयात संडास बांधला आत्ता शासन १२ हजार रूपये देऊनही शौचालय बांधले जात नसल्याची खंत पेरे यांनी व्यक्त केली.सरपंचांनी पक्षभेदाभेद सोडून सर्वांना सोबत घेऊन गावात विकास करणे गरजचे आहे.यावेळी खासगावचे सरपंच संतोष लोखंडे यांनीही गावात केलेल्या विकासाबद्दल उपस्थित सरपंचाना मार्गदर्शन केले. यावेळी जि. प. उपाध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर महिला सरपंच निवडून आल्या आहेत. त्यांच्या पतींनी त्यांना सरपंच म्हणून वावरण्यासाठी मुभा देण्याची गरज आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी स्वच्छ भारतची संकल्पना पटवून सांगितली.जिल्ह्यातील गावांना हगणदारीमुक्त करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे चौधरी म्हणाले. जि.प. अध्यक्ष जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हातील १३८ गावांचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आदींसह जि.प. सदस्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)