शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मानसिकता बदलण्याची गरज..

By admin | Updated: November 30, 2015 23:29 IST

जालना : संपूर्ण जिल्ह्यातील गावे पाणंदमुक्त करण्यासाठी सरपंचांसोबतच ग्रामस्थांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे

जालना : संपूर्ण जिल्ह्यातील गावे पाणंदमुक्त करण्यासाठी सरपंचांसोबतच ग्रामस्थांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे मत पाटोदा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भास्कर पेरे यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदच्या वतीने हगणदारी मुक्त गाव करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, उपाध्यक्ष अनिरूध्द खोतकर, अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, समाजकल्याण सभापती शहाजी राक्षे, दगडवाडीच्या सरपंच आशाताई पांडे आदींची उपस्थिती होती. पेरे म्हणाले, गावात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता वाढल्यानेच विविध आजार वाढले आहेत. गावाच्या सरपंचाने जर ठरविले संपूर्ण गाव हगणदारी मुक्त करणार तर ते होऊ शकते. त्यासाठी पहिल्यांदा सरपंचाने आपला सरपंचपणाची झूल अंगावरून उतरवून जास्तीस जास्ती नागरिकांशी संवाद साधून त्यांना हगणदारीमुक्तचे महत्व पटवून द्यावे.गावे हगणदारीमुक्त करणे हे फार अवघड काम आहे. त्यासाठी खूप परिश्रम घेण्याची गरज आहे.माझ्या गावात अडाणी बायकांनी कर्ज काढून त्यावेळ चार हजार रूपयात संडास बांधला आत्ता शासन १२ हजार रूपये देऊनही शौचालय बांधले जात नसल्याची खंत पेरे यांनी व्यक्त केली.सरपंचांनी पक्षभेदाभेद सोडून सर्वांना सोबत घेऊन गावात विकास करणे गरजचे आहे.यावेळी खासगावचे सरपंच संतोष लोखंडे यांनीही गावात केलेल्या विकासाबद्दल उपस्थित सरपंचाना मार्गदर्शन केले. यावेळी जि. प. उपाध्यक्ष अनिरूध्द खोतकर यांनी जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर महिला सरपंच निवडून आल्या आहेत. त्यांच्या पतींनी त्यांना सरपंच म्हणून वावरण्यासाठी मुभा देण्याची गरज आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी स्वच्छ भारतची संकल्पना पटवून सांगितली.जिल्ह्यातील गावांना हगणदारीमुक्त करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे चौधरी म्हणाले. जि.प. अध्यक्ष जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हातील १३८ गावांचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आदींसह जि.प. सदस्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)