तुळजापूर : दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ प्रशासनाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे प्रश्न त्वरित सोडवावेत, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी तुळजापूर तहसीलवर मोर्चा काढण्यात आला़राष्ट्रवादीचे नेते जीवनराव गोरे, माजी आ़ नरेंद्र बोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर येथे मंगळवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला़ पावसाने ओढ दिल्याने तालुका व परिसरात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी आत्महत्या करीत असून, चाऱ्याचे भाव ३० हजारावर गेले आहेत़ चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्कलनिहाय चारा छावण्या उभा कराव्यात, शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करू नये, रबी हंगामासाठी ३० हजार रूपये अनुदान द्यावे, प्रत्येक गावात रोहयोची कामे सुरू करावीत, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, जलसंधारणासाठी नाला सरळीकरण, रूंदीकरणाची कामे प्रत्येक गावात सुरू करावीत, शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, पाण्यासाठी टँकर सुरू करण्यासह तात्पुरत्या नळयोजनांची कामे करावीत, तुळजापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, आदी विविध मागण्या आंदोलकांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत़ या मोर्चात प्रदेश सरचिटणीस गोकुळ शिंदे, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, युवक तालुकाध्यक्ष आदित्य बोरगावकर, शहराध्यक्ष राजामामा भोसले, सज्जन साळुंके, दीपक आलुरे,वसंत वडगावकर, विजय सरडे, विनोद गंगणे, आनंद कंदले, अविनाश गंगणे, महेश चोपदार, संदीप गंगणे, राहूल साठे, आप्पा पवार, शरद जगदाळे, मनोज माडजे, आबा कापसे, अजय मिसाळ, चित्ररंजन सरडे, दीपक आलुरे, उत्तमराव लोमटे, दिनकर पाटील, निवृत्ती माडजे, बलभिम लोंढे, नवनाथ पाटील, चांदपाशा नदाफ, शफीभाई, महेश कदम, नारायण नन्नवरे, राजकुमार गोरे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते़
तुळजापुरात राष्ट्रवादीचा मोर्चा
By admin | Updated: August 12, 2015 00:58 IST