शहरं
Join us  
Trending Stories
1
उरफाटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
2
"त्याला कशाला दोष देता?"; सुनील गावसकरांनी घेतली गौतम गंभीरची बाजू, दोषी कोण तेही सांगितलं
3
एकाच झटक्यात चांदी १६०० रुपयांपेक्षा अधिक महागली, सोन्याचे दरही वाढले; पाहा १४ ते २४ कॅरेट Gold रेट
4
लडाखबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय; उपराज्यपालांकडून 'हे' अधिकार काढून घेतले...
5
Cyclone Ditva: 'दितवाह' चक्रीवादळ भारताच्या दिशेने; श्रीलंकेत ४६ जणांचा बळी, 'या' राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा!
6
"थकून घरी गेल्यावर नवरा बायकोने मच्छरदाणीत झोपा"; बांधकाम कामगारांवर बोलताना गिरीश महाजन यांचा सल्ला
7
बँक ग्राहकांनो लक्ष द्या! डिसेंबरमध्ये तब्बल १८ दिवस बँका बंद; सलग ५ दिवसांच्या सुट्ट्यांमुळे कामे खोळंबणार!
8
“OBC आरक्षणावरील टांगती तलवार कायम; भाजपा सरकारने दिशाभूल केली”; विजय वडेट्टीवारांची टीका
9
Meesho IPO: ₹२.८४ कोटींचे होणार ₹५२४५ कोटी; Meesho IPO बदलणार 'या' लोकांचं नशीब
10
Deepika TC : "फेकलेली फळं खाऊन..."; शेतमजूर बापाची लेक वर्ल्ड चॅम्पियन, दीपिका टीसीचा संघर्षमय प्रवास
11
Datta Jayanti 2025: 'दत्त येवोनिया उभा ठाकला' हा अनुभव तुम्हालाही येईल, 'अशी' घाला आर्त साद!
12
संपत्ती लपवणाऱ्यांना आयकर विभागाचा दंडुका; विदेशी संपत्ती लपवणारे २५ हजार करदाते ‘रडार’वर
13
“राज्याची तिजोरी जनतेचीच; शेतकरी, कष्टकरी, लाडक्या बहिणींसाठीच खर्च होणार”: एकनाथ शिंदे
14
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
15
SMAT 2025 : प्रितीच्या संघातील पठ्ठ्याचा स्फोटक अवतार! शाहरुखच्या मिस्ट्री स्पिनरची धुलाई (VIDEO)
16
SMAT: मध्य प्रदेश जिंकलं, पण चर्चा वेंकटेश अय्यरची; बिहारच्या संघाला दाखवला हिसका!
17
Gurucharitra Parayan: ७ दिवस शक्य नाही, मग ३ दिवसांत श्रीगुरुचरित्र पारायण करता येते; कसे? पाहा, नियम
18
पैसा तिप्पट करणारी गुंतवणूक! 'या' ५ म्युच्युअल फंडांनी ३ वर्षांत दिले ३१% पेक्षा जास्त रिटर्न!
19
VIDEO: तरुणाने उंचावरून घेतली उडी, पण वेळेवर पॅराशूट उघडलंच नाही, त्यापुढे जे झालं....
20
धक्कादायक! अंत्यसंस्कारासाठी जात असताना डंपर कारवर उलटला, एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:49 IST

जिल्ह्यात सर्वत्र सरकारच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी आंदोलन केले. त्यांनतर संबंधित अधिका-यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात सर्वत्र सरकारच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी आंदोलन केले. त्यांनतर संबंधित अधिका-यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.घनसावंगीमध्ये आ. राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली एल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी जि.प. उपाध्यक्ष सतीश टोपे, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांच्यासह पदाधिकारी व जालना, अंबड, घनसावंगी, बदनापूर, भोकरदन, मंठा, परतूर व जाफ्राबाद तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने एल्गार आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदारांमार्फत विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.केंद्रात व राज्यात युती सरकार सत्तेत आल्यापासून ३ वर्षांत राज्यामधील शेतकºयांच्या प्रश्नांवर प्रचंड आंदोलने होऊन युती सरकारने अजूनही याबाबत योग्य ती पावले उचललेली नाहीत. राज्यातील शेतक-यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून जाचक अटींचा भडीमार करुन अनेक तारखा देऊनही अद्याप एकाही शेतक-याची कर्जमाफी न झालेली नाही. ही कर्जमाफी फसवी असल्याचे लक्षात आले आहे. नुकतीच शासनाची पैसेवारीवारी ५० पैशांवर असल्याचा अहवाल दिला आहे. खरिपाच्या काळामध्ये शेतक-यांचे झालेले नुकसान तसेच पीक विमा मिळण्याच्या आशा देखील पूर्णत: धुळीस मिळाल्या आहेत. त्यातच कापसाला ३१००-३२०० चा भाव मिळत असल्याने शेतक-यांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात १५ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्याने देशात सर्वाधिक आत्महत्या केलेले राज्य म्हणून महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. राज्यामध्ये युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कर्जमाफी करुन ज्या राजाने रयतेसाठी जीवाचे रान केले अशा राजाला या सरकारने बदनाम करण्याचे काम केले. सरकारने घोषणा करुनही कर्जमाफीची अंमलबजावणी होताना दिसत नाही. राज्यातील आॅनलाईन कर्जमाफी प्रक्रियेमध्ये आतापर्यंत राज्यातील ८९ लाख शेतक-यांपैकी फक्त ५० टक्के शेतकºयांचे अर्ज आॅनलाईन करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.