शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:49 IST

जिल्ह्यात सर्वत्र सरकारच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी आंदोलन केले. त्यांनतर संबंधित अधिका-यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात सर्वत्र सरकारच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी आंदोलन केले. त्यांनतर संबंधित अधिका-यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.घनसावंगीमध्ये आ. राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखाली एल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी जि.प. उपाध्यक्ष सतीश टोपे, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांच्यासह पदाधिकारी व जालना, अंबड, घनसावंगी, बदनापूर, भोकरदन, मंठा, परतूर व जाफ्राबाद तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने एल्गार आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदारांमार्फत विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.केंद्रात व राज्यात युती सरकार सत्तेत आल्यापासून ३ वर्षांत राज्यामधील शेतकºयांच्या प्रश्नांवर प्रचंड आंदोलने होऊन युती सरकारने अजूनही याबाबत योग्य ती पावले उचललेली नाहीत. राज्यातील शेतक-यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून जाचक अटींचा भडीमार करुन अनेक तारखा देऊनही अद्याप एकाही शेतक-याची कर्जमाफी न झालेली नाही. ही कर्जमाफी फसवी असल्याचे लक्षात आले आहे. नुकतीच शासनाची पैसेवारीवारी ५० पैशांवर असल्याचा अहवाल दिला आहे. खरिपाच्या काळामध्ये शेतक-यांचे झालेले नुकसान तसेच पीक विमा मिळण्याच्या आशा देखील पूर्णत: धुळीस मिळाल्या आहेत. त्यातच कापसाला ३१००-३२०० चा भाव मिळत असल्याने शेतक-यांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात १५ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्याने देशात सर्वाधिक आत्महत्या केलेले राज्य म्हणून महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. राज्यामध्ये युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने कर्जमाफी करुन ज्या राजाने रयतेसाठी जीवाचे रान केले अशा राजाला या सरकारने बदनाम करण्याचे काम केले. सरकारने घोषणा करुनही कर्जमाफीची अंमलबजावणी होताना दिसत नाही. राज्यातील आॅनलाईन कर्जमाफी प्रक्रियेमध्ये आतापर्यंत राज्यातील ८९ लाख शेतक-यांपैकी फक्त ५० टक्के शेतकºयांचे अर्ज आॅनलाईन करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.