शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

राष्ट्रवादीचे आंदोलन १० दिवसांसाठी स्थगित

By admin | Updated: September 3, 2016 00:28 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील पाणीटंचाई, पिकांचे पंचनामे, प्रलंबीत अनुदान, बळीराजा चेतना अभियानाकडे प्रशासनाकडून होत असलेला कानाडोळा

उस्मानाबाद : जिल्ह्यातील पाणीटंचाई, पिकांचे पंचनामे, प्रलंबीत अनुदान, बळीराजा चेतना अभियानाकडे प्रशासनाकडून होत असलेला कानाडोळा यासह इतर विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्यात येणार होते़ मात्र, पालकमंत्री डॉ़ दीपक सावंत यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून वरील प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिल्याने राष्ट्रवादीने हे आंदोलन १० दिवसांसाठी स्थगित केले आहे़ शासन-प्रशासन प्रलंबीत प्रश्नाबाबत काय कार्यवाही करते ? हे पाहून त्यानंतर पुढील धोरण ठरविण्यात येणार असल्याचे आ़ राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले़शुक्रवारी राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ १९ आॅगस्ट रोजी निवेदन देवून कृत्रिम पाऊस पाडण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा तसेच पाणीटंचाई निवारणार्थ बैठक बोलाविण्याची विनंती केली होती़ त्यानंतर २९ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून पालकमंत्री, कृषीमंत्र्यांसह संपर्क मंत्र्यांनी जिल्ह्यात येवून बैठका घ्याव्यात आणि प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा ६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता़ राज्य शासनाने दुष्काळ निवारणार्थ ५५० कोटीचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे़ मात्र, याबाबतचा निधी अद्यापही प्राप्त झालेला नाही़ टँकर अधिग्रहण बंद केल्याने अनेक गावांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असून, पिकांचे पंचनामे प्रलंबीत अनुदान आदी प्रश्न कायम असल्यानेच राष्ट्रवादीने आंदोलनाची भूमिका घेतली होती़ मात्र, पालकमंत्री डॉ़ दीपक सावंत यांनी गुरूवारी बैठक घेवून विविध प्रश्नावर सकारात्मक प्रतिसाद दिला़ प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पिकांचे पंचनामे अद्यापही सुरू झालेले नाहीत़ तसेच बाधित क्षेत्राचा अहवाल १५ दिवसात देणे क्रमप्राप्त असताना महसूल व कृषी विभागाने कार्यवाही केलेली नाही़ नुकसानीची २५ टक्के रक्कम एक महिन्यात आगावू देण्याचे शासनाचे धोरण असताना त्याकडेही कानाडोळा केल्याचा मुद्दा उपस्थित केला असता शनिवारपासून पंचनामे सुरू करण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. याबरोबरच आवश्यक तेथे टँकर आणि अधिग्रहण करण्याच्या सूचनाही दिल्या़ २०१५-१६ चा जिरायती पीकविमा तातडीने देण्याची ग्वाही देण्यात आली असून, बागायती तसेच फळपिकांच्या अनुदानाचा प्रश्न आयुक्त तसेच मंत्रालय स्तरावर असून, याबाबत आठड्यात माहिती देवू, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले असल्याचे ते म्हणाले़ महाराष्ट्र बँकेकडे १४६ गावे दत्तक आहेत़ मात्र, या बँकेकडून कसलेही कर्जवाटप केले जात नाही़ यामुद्द्यावर सदर गावे इतर बँकांना दत्तक देण्याबाबतची कार्यवाही करू, असे पालकमंत्र्यांनी सांगत पीककर्ज व्याज पडताळणीचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या़ (प्रतिनिधी)५५० कोटीचे विशेष पॅकेज कसे वापरणार? याचे सादरीकरण करण्याचे निर्देश शासनाने दिले होते़ मात्र, जिल्हा प्रशासनाने याबाबतही कानाडोळा केला़ आता यासंबंधी १५ दिवसात बैठक घेण्याचे तसेच ठोस कार्यक्रम सादर करण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे़ बळीराजा चेतना अभियानच्या नियमित बैठका घेवू, असा शब्दही दिला असल्याचे ते म्हणाले़ तेर, ढोकी, तडवळा, येडशी या तेरणा प्रकल्पावरून पाणीपुरवठा होणाऱ्या गावांना पाणी कुठून आणायचे ? याबाबत उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर बैठक घेण्याची ग्वाहीही पालकमंत्र्यांनी दिल्याने आश्वासनानुसार कार्यवाही होते की नाही ते पाहून आंदोलनाबाबतचे पुढील धोरण ठरवू, असे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.