शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

नवरात्रात प्रशासनाची ‘सत्त्वपरीक्षा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:11 IST

सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वळण रस्त्याचे काम घटस्थापनेपूर्वी पूर्ण झाले नाही तर शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याची सत्त्वपरीक्षा प्रशासनाला द्यावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील वळण रस्त्याचे काम घटस्थापनेपूर्वी पूर्ण झाले नाही तर शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याची सत्त्वपरीक्षा प्रशासनाला द्यावी लागणार आहे. यामध्ये एकीकडे पोलिसांची डोकेदुखी वाढणार, वाहनधारकांचे हाल होणार, तर दुसरीकडे भक्तांची तारांबळ उडणार आहे. हे संकट सोडविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे; परंतु महामार्ग वळणरस्ता तीन दिवसांत सुरू झाला तर काहीअंशी वाहतूक कोंडी सुटू शकते.शहरातून जाणाºया सोलापूर-धुळे महामार्गावर असणाºया बार्शी नाका येथील बिंदुसरा नदीवरील जुना पूल धोकादायक झाल्याने वाहतूक बंद केली आहे, तर पर्यायी पूल गतमहिन्यात झालेल्या पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी तोडगा काढून अवजड वाहतूक गढी व मांजरसुंबा मार्गे वळविली. तसेच काही वाहने जालना रोडवरील मोंढा टी पॉर्इंटवरून एमआयडीसी, खंडेश्वरी मंदिर परिसर मार्गे तेलगावकडे वळविली. अशीच तेलगाव नाक्याकडून येणारी वाहने वळविण्यात आली आहेत.दरम्यान, अवघ्या तीन दिवसांवर नवरात्रौत्सव येऊन ठेपला आहे. ज्या मार्गे वाहतूक वळविली आहे, अशा मार्गावरच ग्रामदैवत खंडेश्वरी देवीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर नऊ दिवस मोठी यात्रा भरते. लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. विशेष म्हणजे रस्त्यावरच काही दुकाने लावली जातात. नवरात्रौत्सवात या परिसरात छोट्या-मोठ्या वाहनांनाही वाहतुकीस मज्जाव करण्यात येतो. केवळ भक्तांना येथे पायी प्रवेश दिला जातो. यामुळे काही अंशी वाहतूक सुरळीत ठेवण्यात पोलिसांना यश येते; परंतु सद्य:स्थितीत खंडेश्वरी देवी मंदिरासमोरील रस्त्यावरून अवजड वाहतूक सुरू असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. आता ही वाहतूक कोंडी सोडवायची कशी, असा यक्षप्रश्न वाहतूक पोलिसांसह प्रशासनाला पडला आहे.नवरात्रौत्सवातील बंदोबस्ताचे नियोजन झाले आहे. वाहतूक वळविण्यासंदर्भात पाहणी केली आहे. रस्ता दुरुस्ती संदर्भात संबंधित विभागांना भेटणार आहे. सकारात्मक विचाराने काम सुरू असल्याचे पोलीस उप अधीक्षक सुधीर खिरडकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.