शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

नवरात्रोत्सवातील अन्नछत्रेही आचारसंहितेच्या कचाट्यात

By admin | Updated: September 13, 2014 23:35 IST

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सव २५ सप्टेंबरपासून सुरू होत असून, या कालावधीत पायी येणाऱ्या भाविकांसाठी तुळजापूरकडे येणाऱ्या रस्त्यांवर

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सव २५ सप्टेंबरपासून सुरू होत असून, या कालावधीत पायी येणाऱ्या भाविकांसाठी तुळजापूरकडे येणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अन्नछत्र उभारले जातात. परंतु निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू केली असल्याने यातील राजकीय लोकांच्या अन्नछत्रावर आता बंधने आली आहेत. राजकीय नेत्यांनी अशी अन्नछत्रे उभारल्यास संबंधितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. शासनाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तयारीबाबतची माहिती दिली. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी भालचंद्र चाकूरकर, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी के. बी. कोंडेकर आदींची उपस्थिती होती. डॉ. नारनवरे म्हणाले, जिल्ह्यात चार विधानसभा मतदार संघ असून, यातील उस्मानाबाद, तुळजापूर व परंडा हे खुले तर उमरगा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. उमरगा विधानसभा मतदार संघासाठी उपविभागीय अधिकारी रविंद्र गुरव, तुळजापूरसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. घुगे, उस्मानाबादसाठी उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड तर पंरडयासाठी उपविभागीय अधिकारी संतोष राऊत यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात बी.एल.ओ मार्फत मतदारांना व्होटर स्लिप वाटप करण्यात येत असल्याचे सांगून जिल्ह्यात एकही मतदान केंद्र अतिसंवेदनशील नसल्याचे डॉ. नारनवरे म्हणाले. लोकसभेसाठी सर्वच मतदारांना टपाली मतपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, अनेकांचे पत्ते चुकीचे असल्याने या निवडणुकीत टपाली मतदान कमी झाले. मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी सैन्य दलातील तसेच शासकीय नोकरदारांचे बदलले पत्ता संबधित खात्याकडून नव्याने घेण्यात आले असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २० सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द होणार आहे. यानंतर २७ सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्र सादर करणे तर २९ सप्टेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची शेवटची तारीख १ आॅक्टोबर असून, १५ आॅक्टोबर रोजी मतदान तर १९ रोजी मतमोजणी होणार असल्याचे पत्र परिषदेत सांगण्यात आले. मतदार यादीत कुणाची नावे चुकलेली असल्यास किंवा नावनोंदणी करायची राहिली असल्यास त्यांनी विहित नमुन्यातील फॉर्म भरून देऊन ती करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ हजार ७०० बॅलेट युनिट व २ हजार २०० कंट्रोल युनिट एवढ्या व्होटींग मशीन प्राप्त झाल्या असून, सदरील मशिनची प्रथमस्तरीय तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विधानसभेसाठी १२ लाख २१ हजार २५८ मतदार असून, यात ६ लाख ५७ हजार ५१६ पुरुष, ५ लाख ६३ हजार ७२७ स्त्री व १५ इतर मतदारांचा समावेश आहे. याशिवाय चार मतदारसंघासाठी १ हजार ३५९ मतदान केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. ४उमरग्यात ३०१, तुळजापूर ३७०, उस्मानाबाद ३४५ तर परंडयात ३४३ असे एकुण चार विधानसभा मतदारसंघासाठी एकूण १ हजार ३५९ मतदान केंद्रे आहेत.