शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

निसर्ग तर कोपलाच, दुष्काळ निवारण पथकाचीही बीडला हुलकावणी

By admin | Updated: July 30, 2015 00:13 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड पावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटले; परंतु, वरुणराजा रुसलेलाच आहे. निसर्गाने अशी थट्टा मांडलेली असताना मायबाप सरकारला दुष्काळ पहायलाही वेळ नाही.

व्यंकटेश वैष्णव , बीड पावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटले; परंतु, वरुणराजा रुसलेलाच आहे. निसर्गाने अशी थट्टा मांडलेली असताना मायबाप सरकारला दुष्काळ पहायलाही वेळ नाही. दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी बीडला येणाऱ्या दिल्लीच्या पथकाचा दौरा रद्द झाल्याने सरकारी यंत्रणा कशी सुस्तावली आहे, याची प्रचिती जिल्हावासियांना आली आहे. जिल्हा मागील तीन वर्षांपासून दुष्काळी चटके सोसत आहे. खालावत चाललेल्या पाणीपातळीने तर टंचाईचे सावट आणखीच बिकट केले आहे. उद्धवस्थ झालेला शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. जिल्ह्यात सहा महिन्यात दीडशेवर शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. यावरुन जिल्ह्यावर ओढावलेल्या नैसर्गिक आपत्तीचे उग्ररुप अधोरेखित होते. चालू वर्षी बरोबर ७ जूनच्या मुहूर्तावर कोसळलेल्या सरींनी शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले होते. कर्ज काढून, सोने गहाण ठेवून शेतकऱ्यांनी बी- बियाणाची तरतूद केली. पेरलेले बियाणे कुठे उगले तर कुठे उगवले नाही. त्यानंतर गायब झालेला पाऊस पुन्हा बरसलाच नाही. त्यामुळे पाच लाख हेक्टरवरील खरीप पिके हातची गेली. दोन महिने उलटले तरीही पाऊस न झाल्याने आता दुबार पेरणीची संधीही गेली आहे. कोट्यवधींचे बियाणे ‘माती’त गाडलेल्या शेतकऱ्यांना पिकापेक्षा जित्राबाचीच जास्त चिंता आहे. जिल्ह्यावर ओढावलेल्या आपत्तीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्त राघवेंद्रसिंग व केंद्रीय फलोत्पादन आयुक्त अतुुल पाटणे हे ३१ जुलै व १ आॅगस्ट रोजी बीडमुक्कामी येणार होते. पीक- पाण्याची परिस्थिती थेट बांधावर जाऊन ते पाहणी करणार होते. त्याचा अहवाल केंद्र सरकारला जाणार होता. आठ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयास यासंदर्भातील पत्र आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासन तयारीला लागले होते. दुष्काळ निवारण पथकाला कुठल्या भागातील पिके दाखवायची? पाणीपातळी तपासण्यासाठी कोठे न्यायचे? इथपासून ते मुक्कामाची व्यवस्था कोठे करायची? इथपर्यंतचे नियोजन सुरुहोते. मात्र, बुधवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना पथकाचा दौरा रद्द झाल्याचे पत्र आले आहे. त्यामुळे पावसापाठोपाठ सरकारी यंत्रणाही बीडपर्यंत पोहोचण्यात विलंब करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.