शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘बाणगंगा’च्या आखाड्यात राष्ट्रवादी-सेना आमने सामने!

By admin | Updated: May 23, 2015 00:39 IST

उस्मानाबाद : भूम तालुक्यातील ईडा जवळा येथील बाणगंगा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे.

उस्मानाबाद : भूम तालुक्यातील ईडा जवळा येथील बाणगंगा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. चाचणी गळीत हंगाम झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही प्रमुख पक्ष आमने- सामने आहेत. सतरा जागांसाठी राष्ट्रवादीकडून २१ तर शिवसेनेकडून २७ नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत. १० जूनपर्यंत उमेदवारी मागे घेण्यासाठी मुदत असल्याने प्रमुख लढतींचे चित्र यानंतरच स्पष्ट होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. राहुल मोटे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या बाणगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. कारखाना ताब्यात घेण्यासाठी शिवसेनाही सरसावली आहे. राष्ट्रवादीकडून सर्वच्या सर्व १७ जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. २१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. राहुल मोटे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य मधुकर मोटे आदी पदाधिकारी ठाण मांडून होते. शिवसेनेनेही १७ पैकी १६ जागांवर उमेदवार उतरविले आहेत. जवळपास २७ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा बँकेचे संचालक संजय देशमुख, जि.प. गटनेते दत्ता साळुंके, अ‍ॅड. सुभाष मोरे, सभापती दत्ता मोहिते, माजी सभापती धनंजय सावंत, गौतम लटके, काकासाहेब चव्हाण, बाळासाहेब उंदरे आदींची उपस्थिती होती. तसेच काही मतदार संघातून भाजपानेही उमेदवार उतरविले आहेत. त्यामुळे बाणगंगा कारखान्याची ही पहिलीच निवडणूक रंगतदार होणार असल्याचे सध्यातरी चित्र आहे. २५ मे पर्यंत उमेदवारी अर्जांची छाननी करून पात्र, अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. तर १० जूनपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र माघारी घेता येणार आहेत. त्यानंतर १७ जून रोजी मतदान होईल. तर १९ जून रोजी मतमोजनी होणार आहे. दरम्यान, अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बाणगंगा साखर कारखान्याचा पहिला चाचणी गळीत हंगाम २०१३-२०१४ मध्ये घेण्यात आला. त्यानंतर हा कारखाना सुरळीत चालेल, अशी अपेक्षा ऊसउत्पादक शेतकरी, सभासदांना होती. परंतु, तसे झाले नाही. त्यामुळेच हक्काचा कारखाना असतानाही परिसरातील शेतकऱ्यांना अन्य कारखान्यांना ऊस घालावा लागल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. याच नाराजीचा फायदा शिवसेनापुरस्कृत भैरवनाथ शेतकरी विकास पॅनलकडून उचलू शकतो. त्यामुळे राष्ट्रवादीकडून या नाराजीचा फटका बसू नये, म्हणून कुठल्या प्रकारची व्यूहरचना आखली जाते, हे येणाऱ्या काळातच दिसून येणार आहे. (प्रतिनिधी)रोहकल आनाळा गट : दादासाहेब पाटील, भाऊसाहेब खरसडे (राष्ट्रवादी), अमर सुभाषराव मोरे, दत्तात्रय औताडे (सेना), लुगडे दादासाहेब महादेवराव (--).४उत्पादक संस्था गट : आ. राहुल मोटे. ४अ.जा/अ.ज. गट : गौरिशंकर साठे (राष्ट्रवादी), मस्तूद मारूती आंबू, अर्जुन ठोसर, काशीनाथ कांबळे (शिवसेना). ४महिला गट : वैशालीताई मोटे, आशाबाई जाधव, मायावती कोकाटे (राष्ट्रवादी), गंगाविठ्ठल जनाबाई दासा, चौधरी रजियाबी शेख मैनोद्दीन, विजया खैरे (सेना), नलवडे काशिबाई दासराव, हौसाबाई विश्वनाथ जाधव (--). ४इतर गट : विष्णू शेवाळे (राष्ट्रवादी), बाळासाहेब शेवाळे , शिवाजी सुतार (शिवसेना). ४व्हीजे/एनटी गट : मारूती हरिदास मासाळ (राष्ट्रवादी), माणिक शिंदे, बळीराम मारकड (शिवसेना).वाशी गट : अरूणोजीराव देशमुख, कल्याण आखाडे (राष्ट्रवादी), अशोक आटोळे, सतीश गव्हाणे, युवराज सावंत, बबन कोल्हे (सेना). ४गिरवली गट : आ. राहुल मोटे, वैशालीताई मोटे, मधुकर मोटे, संजय गाढवे (राष्ट्रवादी), भाऊसाहेब लिमकर, वसंत कांबळे, रामकिशन चौधरी, गोकूळ मस्के, निळकंठ भोरे (सेना). ४ईडा जवळा (नि) : तात्यासाहेब गोरे, महादेव खैरे, शशिकला खैरे (राष्ट्रवादी), माणिक शिंदे, अभिमान सांगडे, शशिकांत लटके (सेना), अनिल देशमुख (बीजेपी). ४परंडा पाचपिंपळा गट : विश्वनाथ खुळे, दशरथ घोगरे (राष्ट्रवादी), राजकुमार जैन, अशोक खैरे, गौतम लटके (सेना), भालचंद्र नेटके, किशन व्यंकटेश गाढवे (--).