शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
3
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
4
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
5
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
6
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
7
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
9
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
10
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
11
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
12
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
13
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
14
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
15
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
16
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
17
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
19
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
20
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

‘बाणगंगा’च्या आखाड्यात राष्ट्रवादी-सेना आमने सामने!

By admin | Updated: May 23, 2015 00:39 IST

उस्मानाबाद : भूम तालुक्यातील ईडा जवळा येथील बाणगंगा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे.

उस्मानाबाद : भूम तालुक्यातील ईडा जवळा येथील बाणगंगा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. चाचणी गळीत हंगाम झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही प्रमुख पक्ष आमने- सामने आहेत. सतरा जागांसाठी राष्ट्रवादीकडून २१ तर शिवसेनेकडून २७ नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत. १० जूनपर्यंत उमेदवारी मागे घेण्यासाठी मुदत असल्याने प्रमुख लढतींचे चित्र यानंतरच स्पष्ट होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. राहुल मोटे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या बाणगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. कारखाना ताब्यात घेण्यासाठी शिवसेनाही सरसावली आहे. राष्ट्रवादीकडून सर्वच्या सर्व १७ जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. २१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. राहुल मोटे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य मधुकर मोटे आदी पदाधिकारी ठाण मांडून होते. शिवसेनेनेही १७ पैकी १६ जागांवर उमेदवार उतरविले आहेत. जवळपास २७ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा बँकेचे संचालक संजय देशमुख, जि.प. गटनेते दत्ता साळुंके, अ‍ॅड. सुभाष मोरे, सभापती दत्ता मोहिते, माजी सभापती धनंजय सावंत, गौतम लटके, काकासाहेब चव्हाण, बाळासाहेब उंदरे आदींची उपस्थिती होती. तसेच काही मतदार संघातून भाजपानेही उमेदवार उतरविले आहेत. त्यामुळे बाणगंगा कारखान्याची ही पहिलीच निवडणूक रंगतदार होणार असल्याचे सध्यातरी चित्र आहे. २५ मे पर्यंत उमेदवारी अर्जांची छाननी करून पात्र, अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल. तर १० जूनपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र माघारी घेता येणार आहेत. त्यानंतर १७ जून रोजी मतदान होईल. तर १९ जून रोजी मतमोजनी होणार आहे. दरम्यान, अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बाणगंगा साखर कारखान्याचा पहिला चाचणी गळीत हंगाम २०१३-२०१४ मध्ये घेण्यात आला. त्यानंतर हा कारखाना सुरळीत चालेल, अशी अपेक्षा ऊसउत्पादक शेतकरी, सभासदांना होती. परंतु, तसे झाले नाही. त्यामुळेच हक्काचा कारखाना असतानाही परिसरातील शेतकऱ्यांना अन्य कारखान्यांना ऊस घालावा लागल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. याच नाराजीचा फायदा शिवसेनापुरस्कृत भैरवनाथ शेतकरी विकास पॅनलकडून उचलू शकतो. त्यामुळे राष्ट्रवादीकडून या नाराजीचा फटका बसू नये, म्हणून कुठल्या प्रकारची व्यूहरचना आखली जाते, हे येणाऱ्या काळातच दिसून येणार आहे. (प्रतिनिधी)रोहकल आनाळा गट : दादासाहेब पाटील, भाऊसाहेब खरसडे (राष्ट्रवादी), अमर सुभाषराव मोरे, दत्तात्रय औताडे (सेना), लुगडे दादासाहेब महादेवराव (--).४उत्पादक संस्था गट : आ. राहुल मोटे. ४अ.जा/अ.ज. गट : गौरिशंकर साठे (राष्ट्रवादी), मस्तूद मारूती आंबू, अर्जुन ठोसर, काशीनाथ कांबळे (शिवसेना). ४महिला गट : वैशालीताई मोटे, आशाबाई जाधव, मायावती कोकाटे (राष्ट्रवादी), गंगाविठ्ठल जनाबाई दासा, चौधरी रजियाबी शेख मैनोद्दीन, विजया खैरे (सेना), नलवडे काशिबाई दासराव, हौसाबाई विश्वनाथ जाधव (--). ४इतर गट : विष्णू शेवाळे (राष्ट्रवादी), बाळासाहेब शेवाळे , शिवाजी सुतार (शिवसेना). ४व्हीजे/एनटी गट : मारूती हरिदास मासाळ (राष्ट्रवादी), माणिक शिंदे, बळीराम मारकड (शिवसेना).वाशी गट : अरूणोजीराव देशमुख, कल्याण आखाडे (राष्ट्रवादी), अशोक आटोळे, सतीश गव्हाणे, युवराज सावंत, बबन कोल्हे (सेना). ४गिरवली गट : आ. राहुल मोटे, वैशालीताई मोटे, मधुकर मोटे, संजय गाढवे (राष्ट्रवादी), भाऊसाहेब लिमकर, वसंत कांबळे, रामकिशन चौधरी, गोकूळ मस्के, निळकंठ भोरे (सेना). ४ईडा जवळा (नि) : तात्यासाहेब गोरे, महादेव खैरे, शशिकला खैरे (राष्ट्रवादी), माणिक शिंदे, अभिमान सांगडे, शशिकांत लटके (सेना), अनिल देशमुख (बीजेपी). ४परंडा पाचपिंपळा गट : विश्वनाथ खुळे, दशरथ घोगरे (राष्ट्रवादी), राजकुमार जैन, अशोक खैरे, गौतम लटके (सेना), भालचंद्र नेटके, किशन व्यंकटेश गाढवे (--).