शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

औरंगाबादेत शनिवारी राष्ट्रीय कार्यशाळा

By admin | Updated: July 7, 2015 00:55 IST

औरंगाबाद : संपूर्ण देशभरात शालेय पोषण आहार योजनेत एकवाक्यता असावी, या हेतूने केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने ११ जुलै रोजी या योजनेसंबंधी एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

औरंगाबाद : संपूर्ण देशभरात शालेय पोषण आहार योजनेत एकवाक्यता असावी, या हेतूने केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने ११ जुलै रोजी या योजनेसंबंधी एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाचे दोन सचिव, ८ राज्यांचे सचिवस्तरीय अधिकारी आणि महाराष्ट्रातील ३४ शिक्षणाधिकारी सहभागी होणार आहेत. जालना रोडवरील हॉटेल ‘लेमन ट्री’मध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी केंद्र तसेच विविध राज्यांचे सचिवस्तरीय अधिकारी हे ९ जुलैपासूनच औरंगाबादेत दाखल होतील. शिवाय या कार्यशाळेत महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर, शिक्षण संचालक तसेच शिक्षण उपसंचालक सुधाकर बानाटे हेदेखील सहभागी होणार आहेत. केंद्रीय समितीमध्ये सहभागी असलेले ८ राज्य व मानव संसाधन मंत्रालयाचे सचिव यांच्या या कार्यशाळेत पोषण आहारासंबंधी अंमलात आणल्या जाणाऱ्या नवीन धोरणावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. समितीच्या सदस्यांना औरंगाबाद हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे याठिकाणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे अधिकारी सांगत असले तरी, कार्यशाळेच्या निमित्ताने समिती सदस्यांना औरंगाबादलगत अजिंठा, वेरूळ या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांना भेट देणे सहज सोपे होईल. या उद्देशाने ही कार्यशाळा औरंगाबादेत ठेवली असावी, असा अंदाज काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, कार्यशाळेच्या तीन दिवस अगोदरच जिल्हा परिषद शाळांचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, खाजगी अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना शालेय पोषण आहारासंबंधीचे अभिलेखे अद्ययावत करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी दिल्या आहेत.४ शिवाय मानधन वाटप, स्वयंपाकी, मदतनिसांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, शालेय परिसर, किचन शेड, स्वच्छतागृह, वर्गखोल्यांची स्वच्छता, पोषण आहाराचा साठा स्वच्छ ठिकाणी ठेवला जावा, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सुविधा, विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी हँडवॉश, पोषण आहाराचे वाटप स्वच्छ ताटामध्ये करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.