शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
4
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
5
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
6
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
7
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
8
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
9
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
10
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
11
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
12
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
13
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
14
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
15
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
16
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
17
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
18
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
19
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
20
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ

मनपा कर्मचाऱ्यांना १ एप्रिलपासून राष्ट्रीय निवृत्ती योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:15 IST

औरंगाबाद : महापालिकेतील तब्बल १,३०० अधिकारी- कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०२१ पासून राष्ट्रीय निवृत्ती योजना (एनएसडीएल) लागू करण्याची प्रक्रिया सुरू ...

औरंगाबाद : महापालिकेतील तब्बल १,३०० अधिकारी- कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०२१ पासून राष्ट्रीय निवृत्ती योजना (एनएसडीएल) लागू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आस्थापना, विधि आणि लेखा विभागाचा अभिप्राय घेऊन संचिकेला मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांची मान्यता घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

राज्य सरकारने १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी अंशदायी परिभाषित पेन्शन योजना लागू केली आहे. या योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून परस्पर रक्कम कपात केली जाते. सेवानिवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेचा लाभ मिळेल. मागील पंधरा वर्षांमध्ये महापालिकेने कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू केली नाही. २००५ नंतर महापालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीचा कोणताही लाभ मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. वृद्धापकाळात कर्मचाऱ्यांची परवड होऊ नये याकरिता मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू करण्यासाठी पूणे येथील एनएसडीएल या संस्थेसोबत करार केला.

या संस्थेचे समन्वयक दीपक मराठे यांच्याशी मुख्य लेखापरीक्षक डॉ. देवीदास हिवाळे यांनी चर्चा केली. त्यानुसार राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू करण्यासाठी आस्थापना, विधि, लेखा विभागाचा अभिप्राय घेऊन प्रशासक पाण्डेय यांची संचिकेला मंजुरी घेण्यात येईल. राष्ट्रीय पेन्शन योजनेचे ऑनलाइन फॉर्म भरून घेतले जातील. हे फॉर्म तपासून त्यांच्यातील त्रुटी दूर केल्या जातील. त्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी असलेले एन-१, एन-२ फॉर्म भरून घेण्यात येईल. हे फॉर्म पुण्याला तपासणीसाठी पाठवून तेथून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवले जातील. या सर्व प्रक्रियेसाठी साधारण दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्यामुळे १ एप्रिल २०२१ पासून १३०० कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू होणार असल्याचे मुख्य लेखापरीक्षक डॉ. देवीदास हिवाळे यांनी सांगितले.