शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

औरंगाबाद खंडपीठात राष्ट्रीय लोकअदालत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:20 IST

सर्वोच्च न्यायालयापासून ते तालुका पातळीपर्यंत सर्वच न्यायालयांमध्ये दाखल प्रकरणाची संख्या लक्षात घेता, काही प्रकरणांमध्ये तरी सर्वसामान्यांना तात्काळ आणि समाधानकारक न्याय मिळवून देण्यासाठी लोकन्यायालय ही आदर्श संकल्पना आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयापासून ते तालुका पातळीपर्यंत सर्वच न्यायालयांमध्ये दाखल प्रकरणाची संख्या लक्षात घेता, काही प्रकरणांमध्ये तरी सर्वसामान्यांना तात्काळ आणि समाधानकारक न्याय मिळवून देण्यासाठी लोकन्यायालय ही आदर्श संकल्पना आहे. गेल्या काही वर्षांत त्याच्या प्रभावी वापराने लाखो लोकांना वेळेत न्याय मिळाला, हजारो कोटी रुपयांचे दावे निकाली निघाले, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया कापसे ताहीलरमानी यांनी केले.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (दि.९ डिसेंबर) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती ताहीलरमानी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या लोकन्यायालयाचे उद्घाटन झाले.यावेळी मंचावर औरंगाबाद खंडपीठाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती न्या. आर. एम. बोर्डे तसेच खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश देशमुख उपस्थित होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा उपसमितीचे चेअरमन न्या. आर. एम. बोर्डे यांच्या आदेशावरून या लोकन्यायालयाने आयोजन करण्यात आले होते. न्या. ताहीलरमानी यांनी लोकन्यायालयाचे महत्त्व विशद करताना, सामंजस्याने, परस्पर संमतीने आणि तडजोडीने निकाली निघणाºया, लोकन्यायालयात प्रकरणांमुळे सर्वच पक्षांना खरा न्याय मिळाल्याचे समाधान मिळते, असे सांगितले.या प्रसंगी न्या. आर. एम. बोर्डे यांनी लोकन्यायालय आयोजन आणि त्याला मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. आजपर्यंत आयोजित चार लोकन्यायालयांत एकंदर २५६३ प्रकरणे दाखल होऊन एक हजार २५६ प्रकरणे निकाली निघाल्याची माहिती त्यांनी दिली. येथील आयोजनाने राष्ट्रीय पातळीवर उच्चांक केल्याचेही त्यांनी सांगितले. आज झालेल्या लोकन्यायालयात मोटार अपघात प्रकरणे तसेच भूसंपादन केल्यापोटी व शेतकºयांना मोबदला मिळण्यासाठी दाखल प्रकरणावर सुनावणी झाली. कार्यक्रमाला खंडपीठात कार्यरत न्यायमूर्ती, लोकन्यायालयात आज सहभागी झालेले निवृत्त न्यायाधीश, वकील संघाचे पदाधिकारी, वकील वर्ग, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.