शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय विधि विद्यापीठ यंदा नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2015 00:51 IST

नजीर शेख , औरंगाबाद येत्या जूनपासून (२०१५-१६) औरंगाबादेत राष्ट्रीय विधि विद्यापीठ सुरू होणार नाही, हे आता निश्चित झाले आहे.

नजीर शेख , औरंगाबादयेत्या जूनपासून (२०१५-१६) औरंगाबादेत राष्ट्रीय विधि विद्यापीठ सुरू होणार नाही, हे आता निश्चित झाले आहे. सरकारची मराठवाड्याबाबतची पावले लक्षात घेता हे विद्यापीठ पुढील शैक्षणिक वर्षापासूनही (२०१६-१७) सुरू होते किंवा नाही, याबाबत शंकाच आहे. राष्ट्रीय विधि विद्यापीठाची मागणी ही मराठवाड्याने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे केली होती. स्वत: वकील असलेल्या विलासराव देशमुख यांनी हे विद्यापीठ औरंगाबाद येथे स्थापन करण्याबाबत निर्णयही घेतला. मात्र, त्यानंतर आधी मुंबई आणि नंतर नागपूर येथेही विधि विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारने घेऊन या विषयाचे त्रांगडे केले. त्यामुळे प्रत्यक्षात २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणारे हे विद्यापीठ २०१५-१६ लाही सुरू होणार नाही आणि पुढील शैक्षणिक वर्षाचाही भरवसा नाही, असे चित्र आहे. औरंगाबादेत विधि विद्यापीठ सुरू करण्याबाबत वाळूज परिसरात जागाही निश्चित करण्यात आली होती. यापूर्वीच्या सरकारमधील उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी २०१५-१६ पासून हे विद्यापीठ औरंगाबादेत सुरू होणार असल्याचे खात्रीपूर्वक सांगितले होते. विद्यापीठासाठी प्राथमिक स्तरावर औरंगाबादच्या शासकीय बी. एड. महाविद्यालय परिसरातील जागाही निश्चित झाल्याचे ते म्हणाले होते. मात्र, त्यांचे सरकार गेले आणि प्रक्रिया पुन्हा थंड बस्त्यात गेली. 1 देशभरातील चौदा राष्ट्रीय विद्यापीठांतर्गत प्रवेशासाठी होणारी ‘कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट’ (क्लॅट) ही १० मे रोजीच घेण्यात आली. त्यामध्ये राज्यातील कोणत्याही विधि विद्यापीठाचे नाव अंतर्भूत नव्हते. त्यामुळे यंदा जूनपासून औरंगाबादसह राज्यात विधि विद्यापीठ सुरू होऊ शकले नाही.2 मागच्या शासन काळात इच्छाशक्ती नव्हती. आता या सरकारनेही मराठवाड्याकडे दुर्लक्ष केले आहे. विधि विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया ही दरवर्षी जानेवारी महिन्यातच सुरू होते. त्यासाठी ‘क्लॅट’ मध्ये विद्यापीठाच्या नावाचा समावेश अंतर्भूत असावा लागतो. त्यामुळे आता सत्तेवर आलेल्या सरकारला विधि विद्यापीठ २०१६-१७ पासून सुरू करावयाचे झाल्यास सर्व प्रक्रिया ही डिसेंबरअखेर पूर्ण करावी लागेल.3 मात्र, सरकारच्या कामाची गती आणि मराठवाड्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहता एवढ्या लवकर ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईल याची औरंगाबादेतील विधि क्षेत्रातील तज्ज्ञांनाही खात्री नाही.