शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नाथ सुपरमार्केट ठेवणार गहाण

By admin | Updated: November 27, 2014 01:10 IST

औरंगाबाद : महापालिकेने समांतर जलवाहिनीसाठी १००, महावितरणची थकबाकी देण्यासाठी १००, असे २०० कोटी रुपयांचे कर्ज २०११-१२ मध्ये काढले आहे

औरंगाबाद : महापालिकेने समांतर जलवाहिनीसाठी १००, महावितरणची थकबाकी देण्यासाठी १००, असे २०० कोटी रुपयांचे कर्ज २०११-१२ मध्ये काढले आहे. या कर्जासाठी अब्जावधी किमतीची मालमत्ता आयडीबीआय बँकेकडे गहाण ठेवण्याचा करार मनपाने केला आहे. त्यासाठी औरंगपुऱ्यातील नाथ सुपरमार्केट, गारखेडा रिलायन्स मॉलमधील मनपा मालकीची जागा, झांशी की राणी उद्यान परिसर आणि पदमपुऱ्यातील फायर ब्रिगेड कॉम्प्लेक्ससह १३ मोक्याच्या ठिकाणांवरील मालमत्ता आयडीबीआय बँकेकडे गहाण ठेवण्यात येणार आहेत. बाजारभावानुसार या मालमत्तांची किंमत काही अब्जावधी रुपयांत जाते. यापूर्वी मनपाने १७ मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवल्या आहेत. मात्र, मनपाने गहाण ठेवलेल्या मालमत्तेचे मूल्यांकन बँकेने १७० कोटी रुपये काढले आहे. त्यामुळे पालिकेला दरमहाच्या व्याज व मुद्दल फेडीच्या रकमेत १ टक्का अतिरिक्त जास्तीचे व्याज भरावे लागत आहे. १६ लाख रुपये दरमहा जास्तीचे जात आहेत. २०० कोटींच्या परतफेडीसाठी मनपा ३ कोटी ६६ लाख रुपये अदा करीत आहे. मनपाकडे समांतर योजनेसाठी ९३ कोटी रुपये ‘एएसओजी’ खात्यावर ठेवण्यासाठी नव्हते. त्यामुळे बँकेकडून कर्जरूपाने ती रक्कम उभी करण्यात आली, तसेच महावितरणची ३५० कोटी रुपयांची थकबाकी मनपाकडे होती. वन टाईम सेटलमेंटने थकबाकीतील १०० कोटी भरण्यात आले. कर्ज काढून १०० कोटी रुपये मनपा सत्ताधाऱ्यांनी अदा केले. १३ मालमत्ता गहाण ठेवण्याबाबत कुणाला आक्षेप असेल, तर ७ दिवसांत बँकेकडे अथवा मनपाकडे नोंदविता येतील. वेदांतनगर, रेल्वेस्टेशन १८३४९/१/९९ ४०५७ चौ.मी.रेल्वेस्टेशन, व्यापारी संकुल१९२५९/११४४४ चौ.मी.रेल्वेस्टेशन, व्यापारी संकुल१९२५९४५१.४३ चौ.मी.पदमपुरा, फायर ब्रिगेड कॉम्प्लेक्स१९६४५६१६.९० चौ.मी.गारखेडा१५७३५/१६२९५ चौ.मी.विश्वभारती कॉलनी सर्व्हे नं.६१/५१५७३५/१०३८७६ चौ.मी.शहानूरवाडी१६३२१/१४०४२.१६ चौ.मी.शहानूरवाडी१६३२१/३१५६३.१७ चौ.मीशहानूरवाडी१६३२१/२३९०५.१७ चौ.मीपदमपुरा१९६६०१५६८ चौ.मी.कांचनवाडीगट क्र.४७/३४४६१.०४ चौ.मीनाथ सुपर मार्केटसर्व्हे नं.८०क्षेत्रफळ दिले नाहीक्रांतीचौकसर्व्हे नं.५४८५०९.३४ चौ.मी.मनपा हद्दीतीतील फायर ब्रिगेड हे विभागीय आयुक्तालयाच्या कक्षेत नेऊन ते सक्षम करण्यात येणार आहे. त्यासाठी पदमपुरा येथे मुख्यालय बांधण्याचे काम सुरू आहे. ४त्याचे काम अजून बाल्यावस्थेतच असताना ते कॉम्प्लेक्स गहाण ठेवण्याचा पालिकेने निर्णय घेतला आहे. हे केंद्र होण्यापूर्वीच गहाण राहण्याची आपत्ती त्याच्यावर आली आहे.