शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

नाथ सुपरमार्केट ठेवणार गहाण

By admin | Updated: November 27, 2014 01:10 IST

औरंगाबाद : महापालिकेने समांतर जलवाहिनीसाठी १००, महावितरणची थकबाकी देण्यासाठी १००, असे २०० कोटी रुपयांचे कर्ज २०११-१२ मध्ये काढले आहे

औरंगाबाद : महापालिकेने समांतर जलवाहिनीसाठी १००, महावितरणची थकबाकी देण्यासाठी १००, असे २०० कोटी रुपयांचे कर्ज २०११-१२ मध्ये काढले आहे. या कर्जासाठी अब्जावधी किमतीची मालमत्ता आयडीबीआय बँकेकडे गहाण ठेवण्याचा करार मनपाने केला आहे. त्यासाठी औरंगपुऱ्यातील नाथ सुपरमार्केट, गारखेडा रिलायन्स मॉलमधील मनपा मालकीची जागा, झांशी की राणी उद्यान परिसर आणि पदमपुऱ्यातील फायर ब्रिगेड कॉम्प्लेक्ससह १३ मोक्याच्या ठिकाणांवरील मालमत्ता आयडीबीआय बँकेकडे गहाण ठेवण्यात येणार आहेत. बाजारभावानुसार या मालमत्तांची किंमत काही अब्जावधी रुपयांत जाते. यापूर्वी मनपाने १७ मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवल्या आहेत. मात्र, मनपाने गहाण ठेवलेल्या मालमत्तेचे मूल्यांकन बँकेने १७० कोटी रुपये काढले आहे. त्यामुळे पालिकेला दरमहाच्या व्याज व मुद्दल फेडीच्या रकमेत १ टक्का अतिरिक्त जास्तीचे व्याज भरावे लागत आहे. १६ लाख रुपये दरमहा जास्तीचे जात आहेत. २०० कोटींच्या परतफेडीसाठी मनपा ३ कोटी ६६ लाख रुपये अदा करीत आहे. मनपाकडे समांतर योजनेसाठी ९३ कोटी रुपये ‘एएसओजी’ खात्यावर ठेवण्यासाठी नव्हते. त्यामुळे बँकेकडून कर्जरूपाने ती रक्कम उभी करण्यात आली, तसेच महावितरणची ३५० कोटी रुपयांची थकबाकी मनपाकडे होती. वन टाईम सेटलमेंटने थकबाकीतील १०० कोटी भरण्यात आले. कर्ज काढून १०० कोटी रुपये मनपा सत्ताधाऱ्यांनी अदा केले. १३ मालमत्ता गहाण ठेवण्याबाबत कुणाला आक्षेप असेल, तर ७ दिवसांत बँकेकडे अथवा मनपाकडे नोंदविता येतील. वेदांतनगर, रेल्वेस्टेशन १८३४९/१/९९ ४०५७ चौ.मी.रेल्वेस्टेशन, व्यापारी संकुल१९२५९/११४४४ चौ.मी.रेल्वेस्टेशन, व्यापारी संकुल१९२५९४५१.४३ चौ.मी.पदमपुरा, फायर ब्रिगेड कॉम्प्लेक्स१९६४५६१६.९० चौ.मी.गारखेडा१५७३५/१६२९५ चौ.मी.विश्वभारती कॉलनी सर्व्हे नं.६१/५१५७३५/१०३८७६ चौ.मी.शहानूरवाडी१६३२१/१४०४२.१६ चौ.मी.शहानूरवाडी१६३२१/३१५६३.१७ चौ.मीशहानूरवाडी१६३२१/२३९०५.१७ चौ.मीपदमपुरा१९६६०१५६८ चौ.मी.कांचनवाडीगट क्र.४७/३४४६१.०४ चौ.मीनाथ सुपर मार्केटसर्व्हे नं.८०क्षेत्रफळ दिले नाहीक्रांतीचौकसर्व्हे नं.५४८५०९.३४ चौ.मी.मनपा हद्दीतीतील फायर ब्रिगेड हे विभागीय आयुक्तालयाच्या कक्षेत नेऊन ते सक्षम करण्यात येणार आहे. त्यासाठी पदमपुरा येथे मुख्यालय बांधण्याचे काम सुरू आहे. ४त्याचे काम अजून बाल्यावस्थेतच असताना ते कॉम्प्लेक्स गहाण ठेवण्याचा पालिकेने निर्णय घेतला आहे. हे केंद्र होण्यापूर्वीच गहाण राहण्याची आपत्ती त्याच्यावर आली आहे.