शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

अरुंद पुलावरुन दुचाकी पडली

By admin | Updated: June 10, 2014 00:15 IST

येलदरी : जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाजवळील अरुंद पुलावरुन दुचाकीसह तिघेजण पुलावरुन खाली पडून गंभीर जखमी झाले. ९ जून रोजी सायंकाळी ६़४५ वाजता ही घटना घडली़

येलदरी : जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाजवळील अरुंद पुलावरुन दुचाकीसह तिघेजण पुलावरुन खाली पडून गंभीर जखमी झाले. ९ जून रोजी सायंकाळी ६़४५ वाजता ही घटना घडली़सोमवारी ज्ञानदेव सूर्यकांत अंभोरे (वय ३५), बबन हरिभाऊ मोरे (४०) व दादाराव आश्रोजी नवघरे (सर्व रा. रिसोड) हे तिघे एका दुचाकीवरुन येलदरी येथून रिसोडकडे निघाले. त्यांची दुचाकी येलदरी धरणाजवळील अरुंद पुलावर आल्यानंतर दुचाकीस्वाराचा गाडीवरील ताबा सुटला आणि तिघेही दुचाकीसह पुलावरून खाली पडले़ यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले़ ही घटना सोमवारी सायंकाळी ६़४५ वाजता घडली़या घटनेची माहितीे येलदरी येथील शेषराव चव्हाण व अनंत माकोडे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलाखाली पाण्यात पडलेल्या जखमींना बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले़ परंतु, त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याने जखमींना रुग्णवाहिकेतून जिंतूरच्या ग्रामीण रुग्णालयातात दाखल केले़ जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर ज्ञामदेव अंभोरे व बबन मोरे या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे़ (वार्ताहर)बळी घेतल्यानंतर पुलाचे काम होणार का ?जिंतूर- रिसोड महामार्गाला जोडणारा पूल येलदरी धरणाजवळ ४० ते ५० वर्षांपूर्वी बांधलेला आहे. हा पूल अरुंद आहे़ त्यामुळे या पुलावरुन जड वाहतूक होत नाही़ एका वेळी एकच मोठे वाहन पुलावरून जाते़ त्यामुळे या पुलावर दररोज छोटे-मोठे अपघात होत आहे़ गेल्यावर्षी या पुलावर बसचालकाचा ताबा सुटल्याने पुलावरून बस खाली पडली होती. यामध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाला़ त्यानंतर १७ मे रोजी एका ट्रेलरने या पुलावरील सगळे कठडे तोडून टाकले़ त्यामुळे हा पूल आणखीच अरुंद झाला आहे़ पुलाला कठडे नसल्याने दुचाकीस्वार पुलावरुन नदीत पडले़ पुलाखाली पाणी असल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही़ अशा घटना होऊनही बांधकाम विभागाला देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे़नवीन पुलाचे काम कधी होणार?येलदरी धरणाजवळी पूल अरुंद असल्याने जड वाहतूक करणे अवघड झाले आहे़ हा पूल मराठवाडा व विदर्भाला जोडणार असून या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे़ एखादी जीवित हानी झाल्यानंतरच नवीन पुलाचे काम सुरू होत की काय? असा प्रश्न ग्रामस्थांमधून केला जात आहे़