शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

नारेगावच्या शेतकर्‍यांचे मनपाला अल्टिमेटम; महापौरांनी मागितली 2 महिन्यांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 12:43 IST

नारेगाव भागातील शेतकर्‍यांनी १६ जानेवारीनंतर कचरा येऊ देणार नाही, असा इशारा शुक्रवारी महापालिकेला दिला. यापूर्वी महापालिकेने कचरा टाकण्यासाठी तीन महिन्यांची मुदत मागितली होती. ही मुदत संपण्यास काही दिवस शिल्लक आहेत. मनपा प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना कराव्यात, अशी विनंतीही शिष्टमंडळाने महापौरांकडे केली.

औरंगाबाद : नारेगाव भागातील शेतकर्‍यांनी १६ जानेवारीनंतर कचरा येऊ देणार नाही, असा इशारा शुक्रवारी महापालिकेला दिला. यापूर्वी महापालिकेने कचरा टाकण्यासाठी तीन महिन्यांची मुदत मागितली होती. ही मुदत संपण्यास काही दिवस शिल्लक आहेत. मनपा प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना कराव्यात, अशी विनंतीही शिष्टमंडळाने महापौरांकडे केली. मनपाकडून उपाययोजना झाल्या नाहीत, आणखी दोन महिने मुदतवाढ द्यावी, अशी विनंती महापौरांतर्फे करण्यात आली.

मागील वर्षी ऐन दिवाळीत कचर्‍याच्या गाड्या शेतकर्‍यांनी अडविल्या होत्या. तीन दिवस जोरदार आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणात विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी हस्तक्षेप करून शेतकर्‍यांना आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली होती. आंदोलकांनी महापालिकेला तीन महिन्यांचा अवधी दिला होता. १६ जानेवारी रोजी शेतकर्‍यांनी दिलेली मुदत संपत आहे. शुक्रवारी नारेगाव, मांडकी व आसपासच्या शेतकर्‍यांचे एक शिष्टमंडळ शुक्रवारी महापालिकेत दाखल झाले. आयुक्त नसल्यामुळे शिष्टमंळाने महापौर नंदकुमार घोडेले, सभापती गजानन बारवाल, उपमहापौर विजय औताडे यांची संयुक्त भेट घेतली.

कचरा डेपो हटाव आंदोलन कृती समितीचे प्रमुख पुंडलिक (अप्पा) अंभोरे, मनोज गायके, रवी गायके, विष्णू चौथे, शाईनाथ चौथे, परमेश्वर भुमे, कल्याण औटे यांच्यासह आता नारेगाव कचरा डेपोत टाकणे थांबवा. १६ जानेवारीपासून कचर्‍याचे ट्रक डेपोत येऊ देणार नाही, असा इशारा दिला. कचर्‍यामुळे या भागातील नागरिकांना कोणता त्रास होतोय, याची जाणीव मनपाला अजिबात नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. महापौर घोडेले यांनी कचरा डेपोसाठी नवीन जागा उपलब्ध करून प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्याची विनंती केली. नारेगावातील कचर्‍याचा डोंगर नष्ट करण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याचेही सांगितले.

आमच्यामुळे चीन दौराशहरातील कचर्‍यावर प्रक्रिया करणे, नारेगाव येथील कचरा नष्ट करणे यासाठी मनपा अधिकारी व पदाधिकार्‍यांनी चीन दौरा केल्याचे शिष्टमंडळाला सांगण्यात आले. यावर शिष्टमंडळातील ज्येष्ठ नागरिक पुंडलिक अंभोरे यांनी नमूद केले की, आमच्यामुळे तुमचे सर्व दौरे चालू आहेत. घ्या एकदाचे फिरून म्हणत पदाधिकार्‍यांना टोला लगावला.

ठोस निर्णयच नाहीमागील तीन महिन्यांत मनपातील अधिकारी व पदाधिकार्‍यांनी शहरातील कचर्‍यावर प्रक्रिया करण्याबाबत ठोस असा कोणताच निर्णय घेतला नाही. विविध शहरांमध्ये प्रकल्प पाहणी, महापालिकेत येणार्‍या कंपन्यांचे डेमो पाहणे यातच अधिक वेळ वाया घालविण्यात येत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद