शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

विद्यार्थ्यांना वाव देणारे नांदेड विद्यापीठ देशात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:50 IST

कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करणारे नांदेड विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देवून रोजगाराभिमुख शिक्षण देणारे नांदेड विद्यापीठ हे देशात अव्वल असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करणारे नांदेड विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देवून रोजगाराभिमुख शिक्षण देणारे नांदेड विद्यापीठ हे देशात अव्वल असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.आखाडा बाळापूर येथील नारायणराव वाघमारे महाविद्यालयात २६ सप्टेंबर रोजी एक दिवसीय कौशल्य विकास ‘एसईसी’ अभ्यासक्रमावर आधारीत कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष कृष्णराव पाटील जरोडेकर तर उद्घाटक म्हणून विद्यापीठाचे कुलगूरू डॉ. पंडित विद्यासागर यांची उपस्थिती होती. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. विठ्ठल एरंडे, प्राचार्य डॉ. पी.यू. गवई, प्रा. डॉ. कैलास पाटील, प्रा.डॉ. सचिन पवार, प्रा. डॉ. नरेश पिनमकर, प्राचार्य डॉ. निवृत्ती कौसल्ये उपस्थित होते.पुढे बोलताना ते म्हणाले, जगातील ६६ टक्के विदरान, शास्त्रज्ञ, विचारवंत हे प्रतिकूल परिस्थितींवर मात करून तयार झाले आहेत. संकटाला संधी समजून आपला विकास करण्याची मानसिकता तयार झाली पाहिजे. ग्रामीण भाग हा आपला मागासलेपणाचा निकष ठरवू नये, कारण गुणवत्तेला जात, धर्म किंवा भौगोलिक क्षेत्राची मर्यादा असू शकत नाही. त्यामुळे न्यूनगंड सोडून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळविण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.गुणवत्तापूर्ण शिक्षणाला आता विद्यापीठाने कौशल्य विकासाची जोड दिली आहे. कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करणारे नांदेड विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ आहे. आता नांदेड विद्यापीठ देशातील विद्यापीठांचे नेतृत्व करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.ग्रामीण विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजे. कठोर परिश्रमाला पर्याय नाही, असेही ते म्हणाले अध्यक्षीय समारोप करताना कृष्णराव पाटील जरोडेकर यांनी महाविद्यालयाचा शैक्षणिक विकास व ग्रामीण भागातील माणसिकता या विषयावर विचार मांडले.प्रास्ताविक प्राचार्य डॉ. निवृत्ती कौसल्ये यांनी केले. यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या विविध विकासाचा आलेख मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी.आर. देशमुख यांनी केले.