शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

विद्यार्थ्यांना वाव देणारे नांदेड विद्यापीठ देशात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:50 IST

कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करणारे नांदेड विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देवून रोजगाराभिमुख शिक्षण देणारे नांदेड विद्यापीठ हे देशात अव्वल असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करणारे नांदेड विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देवून रोजगाराभिमुख शिक्षण देणारे नांदेड विद्यापीठ हे देशात अव्वल असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.आखाडा बाळापूर येथील नारायणराव वाघमारे महाविद्यालयात २६ सप्टेंबर रोजी एक दिवसीय कौशल्य विकास ‘एसईसी’ अभ्यासक्रमावर आधारीत कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष कृष्णराव पाटील जरोडेकर तर उद्घाटक म्हणून विद्यापीठाचे कुलगूरू डॉ. पंडित विद्यासागर यांची उपस्थिती होती. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. विठ्ठल एरंडे, प्राचार्य डॉ. पी.यू. गवई, प्रा. डॉ. कैलास पाटील, प्रा.डॉ. सचिन पवार, प्रा. डॉ. नरेश पिनमकर, प्राचार्य डॉ. निवृत्ती कौसल्ये उपस्थित होते.पुढे बोलताना ते म्हणाले, जगातील ६६ टक्के विदरान, शास्त्रज्ञ, विचारवंत हे प्रतिकूल परिस्थितींवर मात करून तयार झाले आहेत. संकटाला संधी समजून आपला विकास करण्याची मानसिकता तयार झाली पाहिजे. ग्रामीण भाग हा आपला मागासलेपणाचा निकष ठरवू नये, कारण गुणवत्तेला जात, धर्म किंवा भौगोलिक क्षेत्राची मर्यादा असू शकत नाही. त्यामुळे न्यूनगंड सोडून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळविण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.गुणवत्तापूर्ण शिक्षणाला आता विद्यापीठाने कौशल्य विकासाची जोड दिली आहे. कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करणारे नांदेड विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ आहे. आता नांदेड विद्यापीठ देशातील विद्यापीठांचे नेतृत्व करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.ग्रामीण विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजे. कठोर परिश्रमाला पर्याय नाही, असेही ते म्हणाले अध्यक्षीय समारोप करताना कृष्णराव पाटील जरोडेकर यांनी महाविद्यालयाचा शैक्षणिक विकास व ग्रामीण भागातील माणसिकता या विषयावर विचार मांडले.प्रास्ताविक प्राचार्य डॉ. निवृत्ती कौसल्ये यांनी केले. यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या विविध विकासाचा आलेख मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी.आर. देशमुख यांनी केले.